शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

नेहमी सावध राहाणे ही काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 23:28 IST

अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात.

ठळक मुद्देसंजय देशमुख यांचे प्रतिपादन : वरठीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी: अधिकार आणि कर्तव्य हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. अधिकाराची पायमल्ली होत असेल तर संविधानाच्या कायद्यातील तरतुदीनुसार हक्क मिळू शकतात. कायद्याने अधिकार व हक्क सुरक्षित राहू शकतात. कर्तव्याची जाणीव ठेवून वागलो तर अधिकराची पायमल्ली होऊ शकत नाही. म्हणून प्रत्येकाने अधिकार मागताना मानवी मूल्याचे जतन करण्यासाठी कर्तव्य पाळणे गरजेचे आहे. मानवी प्रवृत्तीतील राक्षस जागा झाला की सर्व घोळ निर्माण होतो. मानवी प्रवृत्तीतील राक्षस केव्हा जागा होईल याचा अंदाज लावणे कठीण आहे. म्हणून सभोवताल घडणाºया घटनांपासून बचावासाठी अखंड सावधान असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भंडारा व स्वर्गीय पार्वताबाई मदनकर कला व वाणिज्य महाविद्यालय वरठीच्यावतीने आयोजित कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.यावेळी ते म्हणाले, आजूबाजूला घडणाºया अनेक अनुचित घटना या आपल्या परिचितांकडून केल्या जातात. लैगिक अत्याचारासारख्या घडणाºया सर्वाधिक घटना या परिचितांमार्फत झाल्याचे अनेक उदाहरण आहेत. लैंगिक अत्याचारापासून सावधानता म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे नसून त्याबाबत सजग राहणे आहे. सुरक्षेकरिता नियमित सावध राहणे आहे.अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा न्यायाधीश -१ आर पी पांडे, जिल्हा न्यायाधीश -२ एन. व्ही. जिवने, जिल्हा न्यायाधीश -३ एस. बी. भन्साली, सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. के. साबळे, सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) डी. एम. धालीवाल, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. बी. येर्लेकर, तिसरे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) एस. एच राठी, चौथे सहदिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) पी. डी. मेंढे, नवनिर्माण संस्थेचे सचिव अ‍ॅड. कैलास भुरे, अध्यक्ष मिलिंद मदनकर उपस्थित होते.सहदिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) एस. जे. भट्टाचार्य यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधताना अनेक उदाहरण देऊन यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबीची माहिती दिली. जीवनात अनेक रहस्यमय घडामोडी घडतात, पण त्यावर मात करणे हे शेवटी आपल्या हातात असल्याचे त्यांनी सांगितले. आजच्या युगातील मांजर आडवी गेल्याच्या म्हणजे आपण आपल्या सभोवताल असणाºया सुविधांचा जास्त प्रमाणात वापर केल्यास आयुष्यात अडथळे येतात असे सांगितले. म्हणून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक प्रमाणात करून शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले. संचालन प्रा.आशिष बोरकर यांनी केले. कार्यक्रमाला प्रा अविनाश नवखरे , प्रा रजनी भुरे, प्रा मधुकर गोमासे, संगीता वखालकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे डी आर. भुरे उपस्थित होते.