शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

गरज चार हजार मेट्रिक टन खताची, मिळते फक्त बाराशे टन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2021 05:00 IST

रासायनिक खत कंपन्या स्वत:हून दरवाढ करीत असताना त्यांना अभय कुणाचे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकंदरीत या दरवाढीचा व शासकीय एजन्सींना खत पुरवठा योग्य प्रमाणात न करण्याचा सरळ सरळ फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खताच्या प्रत्येक पोत्यामागे जवळपास शंभर ते दीडशे रुपयांची दरवाढ होत असते. यात भरीस भर म्हणून ऐन हंगामात रासायनिक खत कंपन्यांनी पुन्हा दरवाढ केल्याचे समजते. रासायनिक खताच्या या व्यवहारात अनेक कंपन्या आपलं चांगभल करून घेत आहेत.

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कृषी आयुक्तांच्या निर्देशानंतरही खत वितरण करणाऱ्या शासकीय एजन्सींना रासायनिक खत कंपन्यांमार्फत खताचा पुरवठा योग्य प्रमाणात होत नसल्याची बाब उघड झाली आहे. उल्लेखनीय म्हणजे एकट्या भंडारा जिल्ह्याला चार हजार मेट्रिक टन खताची गरज शासकीय एजन्सीमार्फत होण्याची गरज असताना फक्त बाराशे मेट्रिक टन पेक्षा कमी खताचा पुरवठा होत आहे.   खत वितरणात शासकीय एजन्सींना नियमानुसार ३० टक्के खत वितरित करण्यात यावे असे स्पष्ट निर्देश खरीप हंगामापूर्वी झालेल्या आढावा बैठकीत कृषी आयुक्तांनी दिले होते. राज्यस्तरीय सूचना निर्गमित व त्याची अंमलबजावणी मात्र रासायनिक खत कंपन्या करीत नसल्याचे समोर आले आहे. कृषी आयुक्तांच्या निर्णयाला तिलांजली देण्याचा सर्रास प्रकार होत आहे. यात महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मर्यादित महामंडळाच्या अध्यक्षांनीही याबाबत पत्र निर्गमित केले होते. एकट्या पूर्व विदर्भातील भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत जवळपास खताच्या तीन रॅकची आवश्यकता असते. यात एकट्या भंडारा जिल्ह्याला चार हजार मेट्रिक टन खत नियमानुसार शासकीय एजन्सीला मिळायला हवी; मात्र त्यापैकी फक्त बाराशे मेट्रिक टन खत मिळत आहे. विदर्भातील सहा जिल्ह्यांचा आढावा घेतल्यास २४ हजार मेट्रिक टन खतांची खेप शासकीय एजन्सींना मिळायला हवी. मात्र, फक्त बाराशे मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात येत असतो.  अधिकाऱ्यांच्या मूकसंमतीला पैशाचे बळ शासकीय एजन्सींना ३० टक्के वितरण नियमानुसार व्हावे, ही बाब सर्वश्रुत असताना असे मात्र होत नाही. नियमांना बगल देऊन अधिकारीही मूग गिळून आहेत. अधिकाऱ्यांच्या या मूकसंमतीला पैशाचे बळ आहे काय? असा प्रश्न आपसूकच निर्माण होत आहे. रासायनिक खत कंपन्या स्वत:हून दरवाढ करीत असताना त्यांना अभय कुणाचे? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. एकंदरीत या दरवाढीचा व शासकीय एजन्सींना खत पुरवठा योग्य प्रमाणात न करण्याचा सरळ सरळ फटका शेतकऱ्यांना बसत आहे. खताच्या प्रत्येक पोत्यामागे जवळपास शंभर ते दीडशे रुपयांची दरवाढ होत असते. यात भरीस भर म्हणून ऐन हंगामात रासायनिक खत कंपन्यांनी पुन्हा दरवाढ केल्याचे समजते. रासायनिक खताच्या या व्यवहारात अनेक कंपन्या आपलं चांगभल करून घेत आहेत.

रासायनिक कंपन्यांनी स्वतःहून केली दरवाढ

- कृषी आयुक्तांच्या, तसेच राज्य शासनाच्या निर्देशानुसार खताची किंमत १०५० यापेक्षा जास्त असू नये. मात्र, काही रासायनिक कंपन्यांनी स्वतःहून खताच्या किमतीत दरवाढ केली आहे. ऐन हंगामात खताच्या किमतीत वाढ करून बळिराजाची पिळवणूक करण्याचा सपाटा सुरू केला आहे. विशेष म्हणजे कृषी विभागाचा यावर वचक असायला हवा होता. मात्र, साप गेल्यावर काठी मारण्याचा प्रयत्न व उंटावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार कृषी विभागामार्फत करण्यात येत असतो. उल्लेखनीय म्हणजे या सर्व प्रकाराला कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची मूक संमतीच आहे, अशी चर्चाही रंगली आहे. शासनाने दर ठरवून दिल्यानंतरही खतांच्या किंमतीत स्वत:हून वाढ झाल्यानंतर कृषी विभागाने याबाबत कुठलीच कारवाई केली नाही. बैठकांच्या सत्रात कंपन्यांना फक्त निर्देश देण्यापलिकडे कुठलीही ठोस कारवाई केली नाही.

कृषी आयुक्तांच्या निर्देशाला ‘खो’- सहा महिन्यांपूर्वी झालेल्या राज्यस्तरीय आढावा बैठकीत कृषी आयुक्तांनी शासकीय एजन्सींना ३० टक्के खत द्यावे, असे स्पष्ट निर्देश रासायनिक खत कंपन्यांना दिले होते. मात्र, या आदेशाला राजरोसपणे ‘खो’ देण्यात आला आहे. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास मर्यादित महामंडळाचे अध्यक्ष यांच्या सूचनेनंतरही या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात आली नाही. राज्यस्तरीय आढावा बैठकीच्या सूचनांचे पालन होत नसेल तर ही बैठक म्हणजे फक्त औपचारिकता का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

 

टॅग्स :agricultureशेती