शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

स्तुपाच्या विकासासाठी सहकार्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:56 IST

अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे.

ठळक मुद्देप्रशांत सोनवाने यांचे आवाहन : सम्राट अशोक जयंतीनिमित्त कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतपवनी : अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे. या प्राचीन पवनी शहरात सम्राट अशोक येवून गेल्याची नोंद आहे. येथील प्राचीन स्तुपाचे उत्खनन करुन विकास केल्यास पवनी एक मोठे आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनेल. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत सोनवाने यांनी केले.डॉ.सोनवाने सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पवनीचे प्राचीन महत्व’ या विषयावरील पॉवर पार्इंट हाईटेक सादरीकरणात बोलत होते. अध्यक्षस्थानी रायदीघीचे भदंत ज्ञानज्योती, उद्घाटक भदंत संघरत्न मानके तर प्रमुख उपस्थितीत वडसाचे इंजि. डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, माजी न्यायाधीश अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी, लाखांदुरचे प्रा. अनिल कानेकर, प्राचार्य उध्दव रंगारी, सत्यजीव मौर्य उपस्थित होते. डॉ. ज्ञानज्योती यांनी त्रिशरण, पंचशील देवुन मार्गदर्शनात सांगितले की, भारतात व विदेशात बौध्द धर्म वाढविण्याचे काम हजारो वर्षापुर्वी सम्राट अशोका ने केले आहे. त्यामुळे सम्राट अशोकांना कोणत्या करणामुळे राजत्याग करावा लागला याचा विचार करुन जनतेने आज सम्राट अशोकांच्या बुध्दाच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. भदंत संघरत्न मानके यांनी आपल्या धम्मदेशनेत सांगितले की, सम्राट अशोक व त्यांची कन्या संघमित्रा पवनी ला येवून गेल्याची इतिहासात नोंद असल्यामुळे पवनीला फार महत्व आहे. येथील प्राचीन स्तुपाचा सरकारने विकास करण्याची गरज आहे.अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी येथील स्तुपांचा विकास सरकार करत नसेल बौध्द राष्ट्राची मदत घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, प्रा. अनिल कानेकर, उध्दव रंगारी यांनी अशोकाच्या जीवनावर प्रकाश टाकला. सत्यजीत मौर्य यांनी अशोकाच्या अनेक पैलुवर मार्गदर्शन केले.याप्रसंगी मान्यवरांना राष्ट्रीय सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत तागडे, संचालन डॉ. चंद्रशेखर कौशल बांबोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आनंदविलास रामटेके, रमेश मोटघरे, सुरेखा जनबंधू, अंजीरा भाजीखाये, विनायक ढोक, गुलाम रामटेके, ईश्वर रामटेके, नवनाथ आकरे, भक्तराज गजभिये, गुलाब मेश्राम, विपुल रामटेके, प्रमीला टेंभुर्णे, आनंद वाहणे, रत्नमाला रामटेके, अजय रामटेके आदीनी विशेष सहकार्य केले.