शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
2
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
3
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
4
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
5
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
6
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
7
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
8
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
9
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
10
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
11
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
12
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
13
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
14
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
15
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
16
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!
17
मराठ्यांचा इतिहास लोकांपर्यंत पुरेसा पोहचला नाही, इंग्रजांसह स्वकीयही जबाबदार- मुख्यमंत्री फडणवीस
18
“कोकणच्या हिताचे चांगले काम करा, टीकेत अडकून राहू नका”; भास्कर जाधवांचा योगेश कदमांना सल्ला
19
Maharashtran Rains: दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता 
20
तब्बल ५ लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी घेतला ‘ST पास थेट शाळेत’ योजनेचा लाभ: प्रताप सरनाईक

स्तुपाच्या विकासासाठी सहकार्य गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 22:56 IST

अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे.

ठळक मुद्देप्रशांत सोनवाने यांचे आवाहन : सम्राट अशोक जयंतीनिमित्त कार्यक्रम

आॅनलाईन लोकमतपवनी : अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे. या प्राचीन पवनी शहरात सम्राट अशोक येवून गेल्याची नोंद आहे. येथील प्राचीन स्तुपाचे उत्खनन करुन विकास केल्यास पवनी एक मोठे आंतरराष्ट्रीय स्तराचे केंद्र बनेल. यासाठी जनतेने सहकार्य करण्याचे आवाहन पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत सोनवाने यांनी केले.डॉ.सोनवाने सम्राट अशोक जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ‘पवनीचे प्राचीन महत्व’ या विषयावरील पॉवर पार्इंट हाईटेक सादरीकरणात बोलत होते. अध्यक्षस्थानी रायदीघीचे भदंत ज्ञानज्योती, उद्घाटक भदंत संघरत्न मानके तर प्रमुख उपस्थितीत वडसाचे इंजि. डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, माजी न्यायाधीश अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी, लाखांदुरचे प्रा. अनिल कानेकर, प्राचार्य उध्दव रंगारी, सत्यजीव मौर्य उपस्थित होते. डॉ. ज्ञानज्योती यांनी त्रिशरण, पंचशील देवुन मार्गदर्शनात सांगितले की, भारतात व विदेशात बौध्द धर्म वाढविण्याचे काम हजारो वर्षापुर्वी सम्राट अशोका ने केले आहे. त्यामुळे सम्राट अशोकांना कोणत्या करणामुळे राजत्याग करावा लागला याचा विचार करुन जनतेने आज सम्राट अशोकांच्या बुध्दाच्या मार्गावर चालण्याची गरज आहे. भदंत संघरत्न मानके यांनी आपल्या धम्मदेशनेत सांगितले की, सम्राट अशोक व त्यांची कन्या संघमित्रा पवनी ला येवून गेल्याची इतिहासात नोंद असल्यामुळे पवनीला फार महत्व आहे. येथील प्राचीन स्तुपाचा सरकारने विकास करण्याची गरज आहे.अ‍ॅड. महेंद्र गोस्वामी यांनी येथील स्तुपांचा विकास सरकार करत नसेल बौध्द राष्ट्राची मदत घेण्याचे आवाहन केले. याप्रसंगी डॉ. विजय मेश्राम, अशोक पारधी, डॉ. राजेश नंदुरकर, प्रा. अनिल कानेकर, उध्दव रंगारी यांनी अशोकाच्या जीवनावर प्रकाश टाकला. सत्यजीत मौर्य यांनी अशोकाच्या अनेक पैलुवर मार्गदर्शन केले.याप्रसंगी मान्यवरांना राष्ट्रीय सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मीकांत तागडे, संचालन डॉ. चंद्रशेखर कौशल बांबोळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आनंदविलास रामटेके, रमेश मोटघरे, सुरेखा जनबंधू, अंजीरा भाजीखाये, विनायक ढोक, गुलाम रामटेके, ईश्वर रामटेके, नवनाथ आकरे, भक्तराज गजभिये, गुलाब मेश्राम, विपुल रामटेके, प्रमीला टेंभुर्णे, आनंद वाहणे, रत्नमाला रामटेके, अजय रामटेके आदीनी विशेष सहकार्य केले.