शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

आदर्श समाजासाठी बुद्धांच्या विचारांची गरज - राऊत

By admin | Updated: May 17, 2014 23:30 IST

समाजाची प्रगती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मामुळे झाली. आत्म्याच्या शुद्धीपेक्षा मनाची शुद्धी करणे गरजेचे आहे.

आमगाव (दिघोरी) : समाजाची प्रगती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या बौद्ध धम्मामुळे झाली. आत्म्याच्या शुद्धीपेक्षा मनाची शुद्धी करणे गरजेचे आहे. आदर्श समाज निर्माण करण्यासाठी तथागत गौतम बुद्धांच्या विचारांची गरज आहे, असे प्रतिपादन समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सदस्य एम.आर. राऊत यांनी चांदोरी (मालीपार) येथे समता सैनिक दलाच्या शाखेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणातून केले. कार्यक्रमाचे उद्घाटक गजेंद्र गजभिये तर प्रमुख अतिथी प्रा.वासंती सरदार, प्रविण मेश्राम, आय.जी. बन्सोड, परमानंद बन्सोड, रमेश बन्सोड, अरुण मेश्राम, जनबंधू, देवनाथ बन्सोड, दिनेश रामटेके, महेश निंबार्ते, विजय नंदेश्वर हे होते. सैन्यातून निवृत्त झालेयांनी १९२० मध्ये भीम सेवा दलाची स्थापना केली होती. तेव्हापासून या दलाचे काम सुरु आहे. बाबासाहेबांनी त्याचे नामांतर करून समता सैनिक दल केले. बाबासाहेबांनी केलेल्या चळवळीमध्ये समता सैनिक दलांनी महत्वाची भूमिका बजावली व बजावत असल्याचे प्रतिपादन गजेंद्र गजभिये यांनी केले. यावेळी प्रा.वासंती सरदार यांनी धम्मामध्ये शिलाचे महत्व विशद केले. लोकमित्र प्रतिष्ठानाअंतर्गत समता सैनिक दलाचे सदस्य रंजना बन्सोड, शिला बन्सोड व प्रतिमा बन्सोड यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. भारती व स्नेहा यांनी गीत सादर केले. यावेळी गावामधून समता सैनिक दलाचे पथसंचालन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सरदार गुरुजी तर आभार प्रदर्शन प्रतिमा बन्सोड यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समता सैनिक दलाचे सदस्य व गावकरी उपस्थित होते. वैशाली नगरात कार्यक्रम भंडारा : वैशाली नगर भंडारा येथे बुद्ध पौर्णिमेला भगवान बुद्ध यांची २५५८ वी जयंती दि भंडारा बी.सी.सी. हाऊसिंग सोसायटीच्या वतीने साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्ता अमृत बन्सोड, हर्षल मेश्राम, डॉ.सच्चिदानंद फुलेकर, डॉ.प्रा.अनिल नितनवरे उपस्थित होते. त्यातच प्रत्येकाचे कल्याण आहे. अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता वामनराव मेश्राम होते. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष एम.यू. मेश्राम यांनी तर संचालन संस्थेचे सचिव मन्साराम दहिवले यांनी केले. आभार डॉ.रविंद्र ढोळे यांनी मानले. सकाळी ८.३० वाजता पंचशील ध्वजारोहण करण्यात आले. भगवान बुद्ध व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना माल्यार्पण व मेणबत्ती, अगरबत्ती प्रज्वलीत करून बौधाचार्य एच.जी. चंद्रिकापुरे यांचे हस्ते बुद्ध वंदना घेण्यात आली. सायंकाळी म्हाडा कॉलनीतून मोठ्या संख्येने कँडल मार्च काढण्यात आले. कार्यक्रमासाठी एम.यू. मेश्राम, सचिन दहिवले, सुरेंद्र सुखदेवे, रविंद्र ढोके, प्रा.मधुकर रुशेश्वरी, दिलीप चंद्रिकापुरे यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)