शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
6
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
7
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
8
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
9
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
10
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
11
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
12
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
13
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
14
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
15
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
16
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
17
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
18
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
19
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
20
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आवळला पालिकेविरुद्ध रोष

By admin | Updated: May 25, 2014 23:22 IST

मागच्या २५ वर्षात मिळाला नाही इतका निधी गेल्या दोन वर्षात भंडारा नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला. परंतु अंतर्गत गटबाजी आणि उदासीनतेमुळे विकासकामे ठप्प झाली असून रखडलेली कामे

भंडारा : मागच्या २५ वर्षात मिळाला नाही इतका निधी गेल्या दोन वर्षात भंडारा नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला. परंतु अंतर्गत गटबाजी आणि उदासीनतेमुळे विकासकामे ठप्प झाली असून रखडलेली कामे तातडीने करा अन्यथा गंभीर दखल घेतली जाईल असा निर्वाणीचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेता धनंजय दलाल यांनी पदाधिकार्‍यांना दिला आहे.

भंडारा नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असून मागच्या अनेक वर्षात मिळाला नाही त्यापेक्षा कितीतरी पट अधिक निधी प्रफुल्ल पटेल यांच्या प्रयत्नाने मागील दोन वर्षात नगरपालिकेला उपलब्ध करून देण्यात आला.

पालिका पदाधिकार्‍यांची उदासीनता आणि अंतर्गत गटबाजी यामुळे निधीचा निवियोग होत नसून, विकासकामे ठप्प पडल्याचे दलाल यांनी म्हटले आहे.

अनेक कामांचे वर्क ऑर्डर जारी करूनही कामे सुरु करण्यात आली नाहीत. हे वर्क ऑर्डर रद्द करून नवे आदेश देण्यात यावे, नळांना दोन वेळ पिण्याचे मुबलक पाणी पुरवावे, शहरातील स्वच्छता आणि विद्युत व्यवस्था याकडे गांभीर्याने लक्ष पुरवावे, पावसाळ्याच्या आधीची कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना दलाल यांनी केल्या आहेत. शहरातील विकासाच्या कामांकडे लक्ष पुरवा अन्यथा पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल असे स्पष्ट करीत या पदाधिकार्‍यांना एक प्रकारे घरी बसविण्याचाच इशारा दलाल यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)