शहरं
Join us  
Trending Stories
1
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
2
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
3
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
4
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
5
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
6
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
7
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
8
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
9
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
10
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
11
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
12
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
13
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
14
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
15
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
16
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
17
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
18
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
19
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
20
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...

पावसामुळे जंगलात संचारले नवजीवन

By admin | Updated: July 13, 2015 00:47 IST

पावसामुळे जंगलातील अन्नसाखळी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. मुबलक खाद्यामुळे पक्षी, वन्यप्राणी व कीटकांची सुप्तावस्था संपली आहे.

पक्ष्यांसाठी खाद्य : वन्यप्राणी, कीटकांची सुप्तावस्था संपलीभंडारा: पावसामुळे जंगलातील अन्नसाखळी सुरळीत होण्यास सुरुवात झाली आहे. मुबलक खाद्यामुळे पक्षी, वन्यप्राणी व कीटकांची सुप्तावस्था संपली आहे. त्यामुळे जंगलातील जीवन सुखावले असून प्रफुल्लित वातावरण निर्माण झाले आहे. उन्हाळ्यात हिरवागार निसर्ग कोरडा पडू लागतो. तलाव व नैसर्गिक पाणवठ्यावरील पाणीसाठा संपुष्टात येतो. अशावेळी निसर्ग कात टाकत असल्याचे चित्र असते. मात्र, मान्सूनचा पाऊस पडताच निसर्ग पुन्हा हिरवागार दिसू लागतो. तसेच वन्यप्राणी व कीटकांच्या जीवनातील सुप्तावस्था संपायला लागते. आता मान्सूनचा पाऊस पडला असून पशू-पक्ष्यांसाठी अन्न व खाद्य मुबलक प्रमाणात मिळू लागले आहे. सुप्तावस्थेत गेलेल्या कीटकांनी पुन्हा जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. कीटकांपासून वन्य प्राण्यापर्यंतची अन्नसाखळी निर्माण झाल्याने पुन्हा जंगल समृध्द झाले आहे. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रजातीची संख्या अचानक वाढू लागली आहे. उन्हाळ्यात सुप्तावस्थेत गेलेल्या कीटकांनी पाणी पडताच जीवनाचा प्रवास सुरु केला आहे. त्यांचे कोष पुन्हा सक्रिय झाले आहेत. गवतावर अवलंबून असणऱ्या प्रजाती झपाट्याने वाढू लागल्या आहेत. मुंग्या, माकोडे व किड्यांची संख्या वाढल्याने पक्ष्यांनाही मुबलक प्रमाणात अन्न मिळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. उन्हाळ्यात बहुतांश पक्षी घरटी बांधतात व पावसाळा सुरु होताच त्यात अंडी देतात. पिल्ले निघाल्यानंतर त्यांनाही मुबलक अन्न मिळण्यास आता सुरुवात झाली आहे. फुलपाखरे, साप, बेडूक, सरडे, शेंद्री किडे, कोळी आदी कीटकांची संख्या वाढू लागली आहे. वृक्षवेली वाढू लागल्याने पक्षी व वन्यप्राण्यांनाही मुबलक अन्न मिळू लागले आहे. पावसामुळे जंगलातील जीवन प्रफुल्लीत झाल्याचा अनुभव अनेक निसर्गप्रेमींनी घेतला आहे. पावसामुळे जंगलातील जीवनाचा प्रवास सुरळीत होण्यास मदत होत आहे. कीटक, पक्षी व वन्यप्राण्यांना मुबलक अन्न मिळाल्यावर त्यांच्या प्रजाती वाढू लागल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रजातींमुळे जंगलाची सुप्तावस्था नाहीशी झाली आहे, असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले. पावसाने दडी मारल्यामुळे पावसाळ्यात संकटकालीन परिस्थिती निर्माण झाली होती. (नगर प्रतिनिधी)