शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाने झोडपले, किडींनी संपविले धानपिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:40 IST

अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते.

ठळक मुद्देउभ्या पिकाला लागलेली अगणित किड यामुळे येथील बळीराजा पुन्हा 'घायाळ' झालेला दिसतो.

लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : अड्याळ आणि परिसरातील जास्तीत जास्त शेतकरी आज चिंताग्रस्त स्थितीत आहेत. दवर्षी एका पाण्याने जाणारे शेतपिक शनिवारला झालेल्या एका पाण्यानेच गेल्याचे सांगण्यात येते. त्यात पुन्हा भर म्हणजे उभ्या पिकाला लागलेली अगणित किड यामुळे येथील बळीराजा पुन्हा 'घायाळ' झालेला दिसतो. जखमेवर मिठ चोळण्याचे काम निसर्गाने केले आहे. सगळीकडे शेतकरी हाहाकार करीत असतानाही मात्र कुठलेही अधिकारी किंवा कर्मचारी पिक पाहणीला आले नाही. त्यामुळे शेतकºयांत कृषी विभागाविरोधात असंतोष व्यक्त केला जात आहे.अड्याळ आणि परिसरातील शेतकºयांच्या शेतात कशा पद्धतीचे पीक आहे हे तरी अधिकाºयांना माहित राहणार तरी कसे. कारण सुट बुटातील एसी गाडीतील आधिकाºयांना फार कमी शेतकरी ओळखतात. शेतातील पीक कापण्यापेक्षा जाळलेला बरा असेही शेतकरी म्हणतात. शेतातील सोनपिकाची राखरांगोळी जर होत असेल तर काय करावे त्या शेतकºयांनी, शेतातील शेतपिकाचा अड्याळ व परिसरातल शेकडो ग्रामस्थांनी पिकविमा काढला. त्याचा आता उपयोग होणार नसेल तर काय उपयोग त्या पिकविम्याचा.यावर्षी अड्याळ व परिसरातील शेतकरी वेगवेगळ्या कारणांनी संकटात आले. त्यात एका पाण्याची कमतरता, रोगाची लागण, निसर्गाची अवकृपा अणि किडनाशक औषधी फवारणीला रक्कमेची कमतरता अशा एक ना अनेक कारणांनी येथील शेतकरी हवालदिल झाला आहे, मात्र शासन- प्रशासनाला जाग येत नाही म्हणजे काय, शेतकºयाच्या हिताच्या बाता सांगणारे, लढा देणारे, मोर्चे काढणारे, स्वत:ला शेतकºयाचे हितचिंतक म्हणवणारे नेते, कार्यकर्ते मंडळी आता आहेत तरी कुठे?अड्याळ व परिसरातील शेतकरी दरवर्षी पिकविमा काढतात. आता उभ्या सोन्यासारख्या पिकाची दुर्दशा झाली आहे. पिकविमा घेणारे मात्र गप्प आहेत, मग त्या शेतकºयांनी करायचे तरी काय, पिकविमा काढला तरी एखादीवेळीच कवडीमोल मोबदला मिळतो. त्यानंतर शेतकºयांना पिकविमा रक्कम भरायची सक्ती कशाला, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अड्याळ मधून यावर्षी अड्याळ आणि सालेवाडा येथील अंदाजे ६५० शेतकºयांकडून पिकविमा घेण्यात आला आणि यापैकी अंदाजे ८० टक्के शेतकºयांचे धानाची फसल विविध कारणांनी गेल्याची ओरड गावात आहे. पिकविमा काढला तर आता त्या पिकविम्याचा लाभ मिळणे आवश्यक आहे की नाही, असा सवाल येथील शेतकरी करताना दिसत आहे.गावातील शेतकºयांकडून प्रति एकर ३०० ते ३५० रूपये कर्ज घेणाºया प्रत्येकाला पिकविमा म्हणून रक्कम घेतली. कर्ज पाहिजे तर मग पिकविमा काढावाच लागेल आणि कर्ज घेणाºया प्रत्येक शेतकºयांनी तो काढला सुद्धा. आता वेळ आली आहे पिकविमा घेण्याची, परंतु पिकविमा मिळणार तरी कसा, शेतकरी सध्या एवढा हतबल आहे की दिवाळी विसरली आणि त्यात विरजन म्हणजे कोणाचीही साथ नाही, अशास्थितीत करायचे तरी काय?शासन, प्रशासन संबंधित विभागाने आतापर्यंत पाहणी न करण्याचे कारण म्हणजे काय असणार, तापल्या तव्यावर पोळी शेकायला हजारो येथे म्हणतात, पण शेतकºयांचे दुर्देव असे की जेव्हा शेतकºयांवर वेळ येते तेव्हा भलतेच चित्र समोर येते. आतातरी जास्त वेळ घालवण्यापेक्षा अड्याळ व परिसरातील पिकांची पाहणी होणे गरजेचे आहे. नुसती पाहणी करूनही उपयोग नाही तर संबंधित शेतकºयांना पिकविम्याचा लाभ मिळावा, अशीही मागणी येथील शेतकºयांकडून होताना दिसत आहे. याविषयी गंभीर आणि खंबीर कोण भूमिका घेणार, याकडे आता अडयाळ व परिसरातील शेतकºयांचे लक्ष लागले आहे.