शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
बुलढाणा मतदारसंघातील मतांच्या फेरमोजणीची मागणी, पराभूत उमेदवार जयश्री शेळकेंचा हायकोर्टात अर्ज
3
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
4
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
5
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
6
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
7
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
8
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
9
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
10
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
11
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
12
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
13
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
14
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
15
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
16
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
17
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
18
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
19
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
20
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!

निसर्गाची अवकृपा; भातशेती धोक्यात

By admin | Updated: October 27, 2015 00:45 IST

तालुक्यात भात शेतीवर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अवलंबून आहे.

शेतकरी संकटात : पवनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी पवनी : तालुक्यात भात शेतीवर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अवलंबून आहे. जुलै ते आॅक्टोबर दरम्यान अपुरा पाऊस झाल्याने भातशेती अडचणीत सापडलेली होती. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाले, तलाव व गोसेखुर्दचे कालवे यामधून पाणी लिफ्ट करून शेतीला दिले. परंतु आॅक्टोबरच्या सुरुवातीपासून भातशेतीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला व हातात येणारे थोडेफार पिक सुद्धा नष्ट झाले.भातपिकाला शेवटपर्यंत पाणी मिळाले तर भातपिकानंतर त्याच जमिनीमध्ये रब्बीचेपिक घेण्यात येते. गहू, हरभरा, चना, डाळवर्गीय पिकासाठी जमीन ओली असते. परंतु अपुऱ्या पावसामुळे व आॅक्टोबर महिन्यात पाऊस न पडल्याने शेतजमीन पूर्णत: वाळलेली आहे. त्यामुळे रब्बीचे पिकसुद्धाघेता येत नाही. खरीप व रब्बी दोन्ही पिक घेवू न शकणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर होणार आहे. तरी देखील तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेली नाही.अपुरा पाऊस व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी भातपिक वाचविण्यासाठी कर्जबाजारी होऊन इंजीनद्वारे पाणी व रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी यासाठी मोठी रक्कम खर्च केली. परंतु पिक झाले नाही. परिणामी कर्जाची परतफेड करणे व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे हे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची व्यथा शासनदरबारी मांडावी अशी त्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)