शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
6
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
7
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
8
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
9
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
10
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
11
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
12
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
13
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
14
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
15
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
16
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
17
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
18
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
19
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
20
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!

निसर्गाची अवकृपा; भातशेती धोक्यात

By admin | Updated: October 27, 2015 00:45 IST

तालुक्यात भात शेतीवर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अवलंबून आहे.

शेतकरी संकटात : पवनी तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी पवनी : तालुक्यात भात शेतीवर शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अवलंबून आहे. जुलै ते आॅक्टोबर दरम्यान अपुरा पाऊस झाल्याने भातशेती अडचणीत सापडलेली होती. त्यावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी नदी, नाले, तलाव व गोसेखुर्दचे कालवे यामधून पाणी लिफ्ट करून शेतीला दिले. परंतु आॅक्टोबरच्या सुरुवातीपासून भातशेतीवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला व हातात येणारे थोडेफार पिक सुद्धा नष्ट झाले.भातपिकाला शेवटपर्यंत पाणी मिळाले तर भातपिकानंतर त्याच जमिनीमध्ये रब्बीचेपिक घेण्यात येते. गहू, हरभरा, चना, डाळवर्गीय पिकासाठी जमीन ओली असते. परंतु अपुऱ्या पावसामुळे व आॅक्टोबर महिन्यात पाऊस न पडल्याने शेतजमीन पूर्णत: वाळलेली आहे. त्यामुळे रब्बीचे पिकसुद्धाघेता येत नाही. खरीप व रब्बी दोन्ही पिक घेवू न शकणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती गंभीर होणार आहे. तरी देखील तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आलेली नाही.अपुरा पाऊस व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांनी भातपिक वाचविण्यासाठी कर्जबाजारी होऊन इंजीनद्वारे पाणी व रासायनिक खते व कीटकनाशक फवारणी यासाठी मोठी रक्कम खर्च केली. परंतु पिक झाले नाही. परिणामी कर्जाची परतफेड करणे व कुटुंबाची जबाबदारी स्वीकारणे हे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे आहे. लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांची व्यथा शासनदरबारी मांडावी अशी त्यांची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)