शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
3
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
4
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
5
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
6
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
7
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
8
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
9
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
10
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
11
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
12
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
13
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
14
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
15
आंबटशौकिन अडचणीत...! केंद्राची उल्लू, ALTT सह २५ सॉफ्ट पॉर्न अ‍ॅपवर बंदी, पहा पूर्ण लिस्ट...
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

निसर्ग चक्रात खोळंबली रोवणी

By admin | Updated: July 28, 2016 00:31 IST

तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे.

बळीराजा चिंताग्रस्त : लाखांदूर तालुक्यात पावसाची हुलकावणी, वलमाझरी तलाव तुडूंब भरल्याने जलमयस्थितीलाखांदूर : तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवट शंभर टक्के रोवणी आटोपतात. मात्र यंदा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने व पऱ्ह्याची वाढ मर्यादा संपल्याने उशिरा रोवणी झाल्यास एकूण उत्पादनात मोठी घट येऊन नुकसानीचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. मागील पाच वर्षांची पावसाची टक्केवारी बघीतली असता मोठी तफावत दिसून येते. २५ जुलै २०११ पर्यत एकूण ६८३.५ मि.मी. २५ जुलै २०१२ पर्यंत एकूण ३७८.९ मि.मी., २५ जुलै २०१३ पर्यंत एकूण ११६२.९ मि.मी., २५ जुलै २०१४ पर्यंत एकूण ३५२.६ मि.मी., २५ जुलै २०१६ पर्यंत एकूण ३८२ मि.मी. पावसाची नोंद आहे. शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. या वर्षी १० जुलै ला केवळ सर्वाधिक ९० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.पऱ्हे घातल्यानंतर २० ते २५ दिवसाचे आत रोवणी आटोपली पाहिजे. परंतु तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोवणी खोळंबली आहे. महागडे बियाणे घेऊन शेती होऊ शकली नसल्याने दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास खरीप हंगाम कोरडा जाणार असल्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. रोवणी न झाल्याने कृषी केंद्र औषधी व खत विक्री बंद पडल्याने ओस पडली आहेत. (तालुका प्रतिनिधी)साकोली : वलमाझरी तलाव पाण्याने तुडूंब भरलेला असतानासुद्धा पाण्याअभावी वलमाझरी, पिंडकेपार परिसरातील रोवणी रखडलेली आहेत. वलमाझरी परिसरातील जमिन मुरमाड असल्यामुळे तलावातील पाण्याशिवाय रोवणी होत नाही, हा दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. दरवर्षी तलावातील पाणी सोडूनच या परिसरातील रोवणी केली जातात. यावर्षी सुरूवातीलच्या पावसानेच तलाव तुडूंब भरलेला आहे. परंतु पाणी वाटपाची जबाबदारी असलेल्या ल.पा.च्या अधिकाऱ्यांची अनास्था शेतकऱ्यांसाठी मारक ठरू पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी करूनसुद्धा तलावातील पाणी सोडण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी याबात लघु सिंचाई विभागाला लेखी निवेदन दिले, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. वेळेवर रोवणी न झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. रोवणी वेळेत होत नसल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे नेहमी सरकारच्या वतीने सांगितले जाते. परंतु येथील निगरगट्ट अधिकारी शेतकऱ्यांची कैफियत एैकायला तयार नाही. मग शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा बिकट प्रसंग आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तलावातील पाणी लवकर सोडून परिसरातील शेतकऱ्यांची खोळंबलेल्या रोवणीची समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे (शहर प्रतिनिधी)