शहरं
Join us  
Trending Stories
1
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
2
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
3
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
4
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
5
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
6
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
7
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
8
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
9
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
10
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
11
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
12
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
13
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
14
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
15
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
16
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
17
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
18
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
19
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
20
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!

निसर्ग चक्रात खोळंबली रोवणी

By admin | Updated: July 28, 2016 00:31 IST

तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे.

बळीराजा चिंताग्रस्त : लाखांदूर तालुक्यात पावसाची हुलकावणी, वलमाझरी तलाव तुडूंब भरल्याने जलमयस्थितीलाखांदूर : तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवट शंभर टक्के रोवणी आटोपतात. मात्र यंदा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने व पऱ्ह्याची वाढ मर्यादा संपल्याने उशिरा रोवणी झाल्यास एकूण उत्पादनात मोठी घट येऊन नुकसानीचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. मागील पाच वर्षांची पावसाची टक्केवारी बघीतली असता मोठी तफावत दिसून येते. २५ जुलै २०११ पर्यत एकूण ६८३.५ मि.मी. २५ जुलै २०१२ पर्यंत एकूण ३७८.९ मि.मी., २५ जुलै २०१३ पर्यंत एकूण ११६२.९ मि.मी., २५ जुलै २०१४ पर्यंत एकूण ३५२.६ मि.मी., २५ जुलै २०१६ पर्यंत एकूण ३८२ मि.मी. पावसाची नोंद आहे. शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. या वर्षी १० जुलै ला केवळ सर्वाधिक ९० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.पऱ्हे घातल्यानंतर २० ते २५ दिवसाचे आत रोवणी आटोपली पाहिजे. परंतु तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोवणी खोळंबली आहे. महागडे बियाणे घेऊन शेती होऊ शकली नसल्याने दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास खरीप हंगाम कोरडा जाणार असल्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. रोवणी न झाल्याने कृषी केंद्र औषधी व खत विक्री बंद पडल्याने ओस पडली आहेत. (तालुका प्रतिनिधी)साकोली : वलमाझरी तलाव पाण्याने तुडूंब भरलेला असतानासुद्धा पाण्याअभावी वलमाझरी, पिंडकेपार परिसरातील रोवणी रखडलेली आहेत. वलमाझरी परिसरातील जमिन मुरमाड असल्यामुळे तलावातील पाण्याशिवाय रोवणी होत नाही, हा दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. दरवर्षी तलावातील पाणी सोडूनच या परिसरातील रोवणी केली जातात. यावर्षी सुरूवातीलच्या पावसानेच तलाव तुडूंब भरलेला आहे. परंतु पाणी वाटपाची जबाबदारी असलेल्या ल.पा.च्या अधिकाऱ्यांची अनास्था शेतकऱ्यांसाठी मारक ठरू पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी करूनसुद्धा तलावातील पाणी सोडण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी याबात लघु सिंचाई विभागाला लेखी निवेदन दिले, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. वेळेवर रोवणी न झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. रोवणी वेळेत होत नसल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे नेहमी सरकारच्या वतीने सांगितले जाते. परंतु येथील निगरगट्ट अधिकारी शेतकऱ्यांची कैफियत एैकायला तयार नाही. मग शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा बिकट प्रसंग आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तलावातील पाणी लवकर सोडून परिसरातील शेतकऱ्यांची खोळंबलेल्या रोवणीची समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे (शहर प्रतिनिधी)