शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

निसर्ग चक्रात खोळंबली रोवणी

By admin | Updated: July 28, 2016 00:31 IST

तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे.

बळीराजा चिंताग्रस्त : लाखांदूर तालुक्यात पावसाची हुलकावणी, वलमाझरी तलाव तुडूंब भरल्याने जलमयस्थितीलाखांदूर : तालुक्यात यावर्षी पावसाच्या प्रमाणात घट झाल्याने रोवणी खोळंबली आहे. वेळ निघून गेल्याने एकूण उत्पादनात मोठी घट येणार असल्याने बळीराजा चिंताग्रस्त दिसत आहे. दरवर्षी जुलै महिन्याच्या शेवट शंभर टक्के रोवणी आटोपतात. मात्र यंदा दमदार पावसाने हजेरी न लावल्याने व पऱ्ह्याची वाढ मर्यादा संपल्याने उशिरा रोवणी झाल्यास एकूण उत्पादनात मोठी घट येऊन नुकसानीचा सामना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन पडली आहे. मागील पाच वर्षांची पावसाची टक्केवारी बघीतली असता मोठी तफावत दिसून येते. २५ जुलै २०११ पर्यत एकूण ६८३.५ मि.मी. २५ जुलै २०१२ पर्यंत एकूण ३७८.९ मि.मी., २५ जुलै २०१३ पर्यंत एकूण ११६२.९ मि.मी., २५ जुलै २०१४ पर्यंत एकूण ३५२.६ मि.मी., २५ जुलै २०१६ पर्यंत एकूण ३८२ मि.मी. पावसाची नोंद आहे. शेतकऱ्यांसाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. या वर्षी १० जुलै ला केवळ सर्वाधिक ९० मि.मी.पावसाची नोंद करण्यात आली.पऱ्हे घातल्यानंतर २० ते २५ दिवसाचे आत रोवणी आटोपली पाहिजे. परंतु तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने रोवणी खोळंबली आहे. महागडे बियाणे घेऊन शेती होऊ शकली नसल्याने दुष्काळाचे सावट शेतकऱ्यांपुढे निर्माण झाले आहे. येत्या काही दिवसात पाऊस न पडल्यास खरीप हंगाम कोरडा जाणार असल्याची भीती शेतकरी वर्गात निर्माण झाली आहे. रोवणी न झाल्याने कृषी केंद्र औषधी व खत विक्री बंद पडल्याने ओस पडली आहेत. (तालुका प्रतिनिधी)साकोली : वलमाझरी तलाव पाण्याने तुडूंब भरलेला असतानासुद्धा पाण्याअभावी वलमाझरी, पिंडकेपार परिसरातील रोवणी रखडलेली आहेत. वलमाझरी परिसरातील जमिन मुरमाड असल्यामुळे तलावातील पाण्याशिवाय रोवणी होत नाही, हा दरवर्षीचा रेकॉर्ड आहे. दरवर्षी तलावातील पाणी सोडूनच या परिसरातील रोवणी केली जातात. यावर्षी सुरूवातीलच्या पावसानेच तलाव तुडूंब भरलेला आहे. परंतु पाणी वाटपाची जबाबदारी असलेल्या ल.पा.च्या अधिकाऱ्यांची अनास्था शेतकऱ्यांसाठी मारक ठरू पाहत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी करूनसुद्धा तलावातील पाणी सोडण्यात आलेले नाही. शेतकऱ्यांनी याबात लघु सिंचाई विभागाला लेखी निवेदन दिले, अधिकाऱ्यांशी संपर्क साधला परंतु त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत आहे. वेळेवर रोवणी न झाल्यास त्याचा परिणाम उत्पन्नावर होतो. रोवणी वेळेत होत नसल्याने या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे नेहमी सरकारच्या वतीने सांगितले जाते. परंतु येथील निगरगट्ट अधिकारी शेतकऱ्यांची कैफियत एैकायला तयार नाही. मग शेतकऱ्यांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा बिकट प्रसंग आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे. तलावातील पाणी लवकर सोडून परिसरातील शेतकऱ्यांची खोळंबलेल्या रोवणीची समस्या दूर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे, असे न झाल्यास शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात आहे (शहर प्रतिनिधी)