शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
4
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
5
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
6
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
7
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
8
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
9
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
10
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
11
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
12
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
13
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
14
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
15
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
16
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
17
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
18
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
19
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
20
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  

राष्ट्रीय महामार्गाचे पाणी शिरले ठाणा गावात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 22:22 IST

राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे.

ठळक मुद्देव्यथा ठाणा येथील : मागीलवर्षी घरामध्ये शिरले होते चार फूट पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कजवाहरनगर : राष्ट्रीय महामार्ग पारडी (नाका) ते मुजबी (भंडारा) सिमेपर्यंत चौपदरीकरणाचे काम झाले. मात्र गावातील भौगोलिक परिस्थिती विरुध्द नाली बांधकाम अर्धवट केल्याने महामार्गावरील पावसाचे पाणी रहदारीच्या क्षेत्रात शिरकाव होत आहे. परिणामी रस्त्याचे नुकसान होत आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत रस्ता रुंदीकरणाचे कामे दिलीप बिल्डकॉम यांनी केले. रहदारी गावालगत चौपदरीकरण तर दोन गावादरम्यान दोन रस्ते तयार करण्यात आले. गावादरम्यान राष्ट्रीय महामार्ग लगत बंदिस्त दोन ते तीन फुट खोल तीन फुट रुंदीची नाली बांधकाम करण्यात आले. नाली बांधकाम करीत असतांना गावाचे भौगोलिक वातावरण विचारात न घेता किंवा गावाबाहेर पावसाचे पाणी वाहून न जाता रहदारीत उतार करण्यात आला. दुसरी बाब म्हणजे नाली बांधकामाला कसलाही अडथळा नसतानाही ठाणा टी पांईट स्थित नागपूरकडे जाणाऱ्या प्रवाशी बसस्थानकाजवळ अर्धवट नाली बांधकाम करण्यात आले. जवाहरनगर आयुध निर्माण गेटच्या दोन्ही बाजुला अर्धवट नाली तयार करण्यात आली. मात्र गेटच्या जवळून नाली बांधकाम करण्यात आलेली नाही. परिणामी सोनामाता नगर महामार्गापासून अर्धा किलोमिटर नाल्याचे पावसाचे पाणी ठाणा टी-पांईट बसस्थानकापासून अर्धवट नाल्याद्वारे जवाहरनगर रस्त्याने ठाणा रहदारीत शिरकाव होत आहे. यामुळे ठाणा येथील रस्त्याची नासधुस होत आहे. खासगी विहिरीत दुषीत पाण्याचा शिरकाव होत आहे. त्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता बळावली आहे. ठाणा येथील कॉर्पोरेशन बँकेसमोर डॉ.मणी यांच्या दवाखान्याजवळ, आयुध निर्माणी पतसंस्थाचे पेट्रोलपंप जवळ, जुन्या राष्ट्रीय महामार्ग केशव लेंडे यांच्या घराजवळ, अर्धवट नाली बांधकाम केले आहे. दहा वर्ष लोटूनही प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे लोकप्रतिनिध्ीांच्या वेळकाढू वृत्तीमुळे गावातील नागरिकांचे बेहाल होत आहे. मागीलवर्षी पावसाचे पाणी राष्ट्रीय महामार्गालगतच्या घरामध्ये तीन ते चार फुट पाणी शिरलेले होते. याची जाणीव कुणालाही नाही.