शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ

By admin | Updated: April 23, 2017 00:51 IST

बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे.

गराडा येथील भीम मेळावा: रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन भंडारा : बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संविधान हा ‘‘राष्ट्रीय ग्रंथ’’ असून त्याला शासनमान्यता मिळाली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार व कार्य सगळया समाजातील लोकांनी अंगिकारणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्गामुळे मानवाला शील, सदाचार, करुणा व मैत्रीची शिकवण देते, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड.़ रामचंद्र अवसरे यांनी केले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. चार दिवसीय कार्यक्रमादरम्यान गराडा (बु.) येथील पंचशिल बौध्द विहाराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. भंडारा तालुक्यातील गराडा (बु.) येथील पंचशील बुध्द विहार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते इंजि. रुपचंद रामटेके होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बि.सी. वानखेडे, अमरावती, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, प्रा. मनोज बागडे, मुलनिवासी महिला संघचे राष्ट्रीय प्रचारक शितल पिल्लेवान, पंचायत समिती सदस्य परसराम देशमुख, चन्नेश्वर रामटेके आदी विचारमंचावर उपस्थित होते. आमदार अ‍ॅड. अवसरे यांचे हस्ते इंजि. रुपचंद्र रामटेके व भारत गोंडाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंचा कुंदाताई मोहरकर, उपसरपंच पुरुषोत्तम गोंडाणे, भिमाई रामटेके, पोलीस पाटील दसाराम गाढवे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा सार्वे, निलीमा मेश्राम, नितेश गोंडाणे, पुरुषोत्तम गोंडाणे, हरिदास मेश्राम उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाकरिता मालता चव्हाण, सुनंदा मेश्राम, शर्मिला बन्सोड, चंद्रकला चव्हाण, निलम गोंडाणे, हेमलता मेश्राम, तृप्ती शेल्लारे, सुष्मा राऊ त, चित्रलेखा वासनिक यांनी विशेष प्रयत्न केले. संचालन भारत गोंडाणे व आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले. (नगर प्रतिनिधी)