शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
तुमच्या नावावरही दोन मतदार कार्ड आहेत का? असं तपासा आणि पुढच्या अडचणी टाळा
4
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
5
मतचोरीविरोधात काँग्रेसची "वोट चोरी के खिलाफ मैं राहुल गांधी के साथ" स्वाक्षरी मोहीम 
6
TCS, इन्फोसिससह टॉप IT कंपन्यांचे शेअर्स २६% पर्यंत कोसळले; ७ महिन्यांत कोट्यवधी रुपये पाण्यात; कारण आलं समोर
7
क्रूझ कंट्रोल, ३६०-डिग्री कॅमेरा... जे नव्हते तेच आणले...! Citroen C3X लाँच झाली, १५ नवीन इंटेलिजंट फिचर्स...
8
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
9
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
10
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
11
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
12
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
13
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
14
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
15
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
16
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
17
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
18
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
19
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
20
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...

भारतीय संविधान हा राष्ट्रीय ग्रंथ

By admin | Updated: April 23, 2017 00:51 IST

बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे.

गराडा येथील भीम मेळावा: रामचंद्र अवसरे यांचे प्रतिपादन भंडारा : बाबासाहेबांनी लिहिलेल्या संविधानामुळे संपूर्ण देशातील प्रत्येक व्यक्तीला समान न्याय मिळाला आहे. त्यामुळे भारतीय संविधान हा ‘‘राष्ट्रीय ग्रंथ’’ असून त्याला शासनमान्यता मिळाली पाहिजे. बाबासाहेबांचे विचार व कार्य सगळया समाजातील लोकांनी अंगिकारणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे तथागत गौतम बुद्ध यांच्या मार्गामुळे मानवाला शील, सदाचार, करुणा व मैत्रीची शिकवण देते, असे प्रतिपादन आमदार अ‍ॅड.़ रामचंद्र अवसरे यांनी केले. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त भीम मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. चार दिवसीय कार्यक्रमादरम्यान गराडा (बु.) येथील पंचशिल बौध्द विहाराचे उद्घाटन करण्यात आले. त्याप्रसंगी ते बोलत होते. भंडारा तालुक्यातील गराडा (बु.) येथील पंचशील बुध्द विहार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते इंजि. रुपचंद रामटेके होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बि.सी. वानखेडे, अमरावती, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष गोपाल सेलोकर, प्रा. मनोज बागडे, मुलनिवासी महिला संघचे राष्ट्रीय प्रचारक शितल पिल्लेवान, पंचायत समिती सदस्य परसराम देशमुख, चन्नेश्वर रामटेके आदी विचारमंचावर उपस्थित होते. आमदार अ‍ॅड. अवसरे यांचे हस्ते इंजि. रुपचंद्र रामटेके व भारत गोंडाणे यांचा शाल, पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन नागरी सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सरपंचा कुंदाताई मोहरकर, उपसरपंच पुरुषोत्तम गोंडाणे, भिमाई रामटेके, पोलीस पाटील दसाराम गाढवे, ग्रामपंचायत सदस्य प्रतिमा सार्वे, निलीमा मेश्राम, नितेश गोंडाणे, पुरुषोत्तम गोंडाणे, हरिदास मेश्राम उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी बाबासाहेबांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमाकरिता मालता चव्हाण, सुनंदा मेश्राम, शर्मिला बन्सोड, चंद्रकला चव्हाण, निलम गोंडाणे, हेमलता मेश्राम, तृप्ती शेल्लारे, सुष्मा राऊ त, चित्रलेखा वासनिक यांनी विशेष प्रयत्न केले. संचालन भारत गोंडाणे व आभार प्रदर्शन विलास चव्हाण यांनी केले. (नगर प्रतिनिधी)