शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

देशाला छत्रपतींच्या चरित्राची गरज

By admin | Updated: June 14, 2014 01:37 IST

ज्या वयात आपण कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही, त्या वयात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

भंडारा : ज्या वयात आपण कुठलेही निर्णय घेऊ शकत नाही, त्या वयात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संघटन कौशल्य, निर्णय क्षमता, जिगरबाज नेतृत्व, कुशल प्रशासन, शत्रुला अचुकपणे ओळखण्याची शक्ती, विविध जात पंथाच्या माणसांचा गोतावळा यामुळे शिवाजी राजे हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यात यशस्वी ठरले. या देशावर होत असलेल्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटनमंत्री अरुण नेटके यांनी केले.हिंदू रक्षा मंचच्या वतीने हिंदू साम्राज्य दिनाचे औचित्य साधुन शिवराज्यभिषेक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अतिथी म्हणून जिल्हा महामंत्री सुभाष आजबले, हिंदू रक्षा मंचाचे बंडू बारापात्रे, विहिंपचे जिल्हाध्यक्ष डॉ.संजय एकापुरे, भगीरथ धोटे मंचावर होते. प्रास्ताविकात डॉ. एकापुरे यांनी हिंदू रक्षा मंचची भूमिका मांडली. सुभाष आजबले यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याची पुनरावृत्ती करण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.यावेळी नेटके म्हणाले, शिवाजी महाराजांचे अल्पावधीतील आयुष्य या मातृभूमिला अनेक गोष्टी देऊन गेले. महाराजांनी चार गोष्टींच्या माध्यमातून स्वत:ला सिद्ध केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. संघटनकौशल्य, निर्णयक्षमता, शत्रुला ओळखण्याची शक्ती आणि दुरदृष्टी ही त्यांची खरी ताकद होती. संघटन कौशल्याच्या जोरावर त्यांनी कर्मठ मावळ्यांची ताकद उभी केली. त्यातूनच तानाजी माालुसुरे, बाजीप्रभु देशपांडे यांसारखे असंख्य सैनिक त्यांना शोधता आले. शत्रुला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत उत्तर देण्याच्या नितीमुळे त्यांनी अशक्य गोष्टी शक्य करुन दाखविल्या. या देशातील धर्मांतरण, आतंकवाद, गोहत्या अशा अनेक समस्यांना जर संपवायचे असेल तर या देशातील शिव चरित्रातून प्रेरणा घेऊन पुढे येण्याची गरज आहे.यावेळी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीते गोल्डी हुमणे या गायकाने गायली. याप्रसंगी आमदार निधीतून मंजूर झालेल्या हायमास्ट लाईटच्या बांधकामाचे भूमिपूजन भगीरथ धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी हिंदू रक्षा मंचचे बंडू बारापात्रे, सुधीर धकाते, अजय भोंगाडे, आशिष मोहबे, मंगेश राऊत, दीपक पराते, शशांक सोनेकर, गणेश निनावे, अमित गिऱ्हेपुंजे, सारंग जोशी, राजन त्रिवेदी, बजरंग दलाचे चेतन भंडारी, युथ फॉर नॅॅशनचे उमेश निपाने, आदित्य मोटघरे, समीर मानापुरे, मोहित वडतकर व हिंदू रक्षा मंचचे कार्यकर्ते उपस्थित होते. आभारप्रदर्शन अतुल मानकर यांनी केले. (शहर प्रतिनिधी)