शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एनआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी बनविली नॅनो कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 22:46 IST

शिस्तबद्ध वातावरणात, उत्तम मार्गदर्शनाला प्रयत्न व चिकाटीची जोड मिळाली तर कोणतेच काम कठीण नाही. स्थानीक मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय एनआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केवळ ३५ हजार रूपयात नॅनो कार बनवून या गोष्टीची साक्ष पटवून दिली आहे.

ठळक मुद्देसंघर्षाला मिळाले जिद्दीचे बळ : ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर झाले काम

लोकमत न्यूज नेटवर्कशहापूर : शिस्तबद्ध वातावरणात, उत्तम मार्गदर्शनाला प्रयत्न व चिकाटीची जोड मिळाली तर कोणतेच काम कठीण नाही. स्थानीक मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय एनआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केवळ ३५ हजार रूपयात नॅनो कार बनवून या गोष्टीची साक्ष पटवून दिली आहे.‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर कमी खर्चात बनणारी, कमी इंधनाचा वापर करणारी, सर्व प्रकारच्या रस्त्यावर, मैदानी प्रवेशात, शेतात धावू शकणारी ड्रायव्हींग न येणाऱ्या माणसालाही चालवता येण्याजोगी, अशी कार जी वजनाने हलकी असावी व चालवायला पूर्णत: सुरक्षित असावी.अशा प्रकारची गाडी बनविण्याचे स्वप्न आशिष कांबळे, महेश राऊत, तिर्थराज गोटेफोडे, स्वप्नील लाडे, सौरभ भुरे, पंकज पटले, समीर फारुखी, अविनाश जगनाडे, शुभम भाजीपाले आणि अंकीत गाडगे या एमआईईटी मध्ये यंत्र अभियांत्रिकी शाखेच्या अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमाची तयारी करणाºया विद्यार्थ्यांनी पाहिले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष नशिने यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वाखाली व प्रा.गिरीश भिवगडे, प्रा.अमीत नंदागवळी व प्रा.अमर भिवगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा महिन्यांच्या अविरत प्रयत्नांनी महाविद्यालयाच्या वर्कशॉपमध्ये या कारची निर्मिती करण्यात आलेली आहे.या कारमध्ये अ‍ॅक्टीवाचे इंजीन लावण्यात आले असून सर्व पार्टस् स्थानिक पातळीवरून खरेदी करून जोडण्यात आले आहेत. ३५ हजार रूपयांच्या अल्प खर्चात संपूर्ण कार तयार करण्यात आलेली आहे. ही कार तासी ४० ते ५० किलोमीटर वेगाने धावू शकते.सदर कारमध्ये चारही चाकात ‘हॉयड्रायुलीक ब्रेकींग सिस्टम’ लावण्यात आले असून पूर्णत: ट्युब्युलर फ्रेममध्ये याची रचना करण्यात आली असल्यामुळे ती चालवायला पूर्णत: सुरक्षित व वजनाने हलकी आहे.या कारची विशेषत: म्हणजे ती रस्त्यावर व रस्त्याबाहेर म्हणजे मैदानी, दगडी प्रदेशात शेती शिवारात कुठेही आरामात चालवता येवू शकते. ग्रामीण भागासाठी ही कार संजीवनी ठरू शकते. ती तिच्या कमी किमतीसोबत बहुउपयोगी वापरासाठी शेतात फवारणी करणे, पाहणी करणे, बीज फोकणे या कामांसाठी ही कार उपयोगात येवू शकते.किटनाशक फवारणी मुळे शेतकरी विषबाधीत होण्याचे प्रमाण मागील काही वर्षापासून खुप वाढले आहे. या कारद्वारे बंद द्वार किटनाशक फवारणी करून शेतकरी आपला वेळ, श्रम व अमोल जीवही वाचवू शकतात.याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आशिष नशिने यांनी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रासोबत अनुबंधाद्वारे विद्यार्थ्यांना स्वयंरोजगार व नवनवीन कल्पक प्रयोगाद्वारे स्टॉर्ट अप इंडियासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित व प्रोत्साहीत करण्याच्या हेतूने केल्या जात असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.सदर कारचे परीक्षण व चाचणी एमआईईटीच्या विविध प्रयोगशाळेत करण्यात आली व त्यात सर्व परिक्षणात विद्यार्थ्यांनी बनविलेली ही कार यशस्वी झाल्याबद्दल प्राचार्य डॉ.आशिष नशिने, डॉ.प्रल्हाद हरडे, मार्गदर्शक प्रा.गिरीश भिवगडे, प्रा.अमीत नंदागवळी, अमर भिवगडे तसेच शिक्षक गैर शिक्षक कर्मचाºयांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.