शहरं
Join us  
Trending Stories
1
चांगली बातमी! राज्यात सरासरीच्या ९९% पाऊस; कोकण, नाशिक, पुणे आणि अमरावती विभागात जाेरदार जलधारा
2
मराठी माणसांना आम्ही पोसतोय, महाराष्ट्र आमच्या पैशांवर जगतो; भाजपा खासदारानं उधळली मुक्ताफळे
3
देशातील प्रत्येक भाषा ही राष्ट्रीय भाषा, प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच हवे; संघाची भूमिका
4
२५ कोटी कर्मचारी करणार उद्या देशव्यापी संप; सरकारी धोरणांचा विरोध करण्यासाठी भारत बंदची हाक
5
ऑफिसच्या वेळा बदला, लोकलची गर्दी कमी करा; ८००  कार्यालयांना मध्य रेल्वेचे विनंतीपत्र
6
कोर्लई समुद्रात संशयित बोट?; कोस्ट गार्ड, नेव्हीच्या हेलिकॉप्टरने घेतला शोध, हाती काही नाही
7
कुजबुज: महायुतीच्या चर्चेचे किलकिले दार; शिंदेसेनेची भूमिका अन् राज ठाकरेंचे 'ते' आदेश
8
डॉ. नरेंद्र जाधव समिती रद्द करा, दादा भुसेंना हटवा; शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितीची मागणी
9
पर्यूषण काळात कत्तलखान्यांना बंदी घातली तर इतर समुदायांचाही मार्ग मोकळा होईल? - उच्च न्यायालय
10
वर्सोवा-घाटकोपर मेट्रोवर लवकरच ६ डब्यांची गाडी?; अतिरिक्त डबे खरेदीसाठी मागितली परवानगी
11
मुंबई विमानतळावर गांजा, सोने, प्राण्यांच्या तस्करीचा पर्दाफाश; आतापर्यंत ४ जणांना अटक
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा

By admin | Updated: January 17, 2015 22:53 IST

गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो.

भंडारा : गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो. ज्यांना आधी जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावले त्यांची फक्त 'घर वापसी' होत आहे. त्याला आम्ही धर्मांतरण मानत नाही. आपल्या धर्माला मानणे हा काही दोष नाही. अयोध्येत राममंदिर उभारणारच याला कोणताही धर्म रोखू शकत नाही. प्रत्येक हिंदूच्या मनात अयोद्धेबाबत एकच कल्पना आहे, ती म्हणजे रामललाचा मंदिर उभारणे होय. कुणाचीही निंदा कधी करू नये. उत्तम संस्कारातून चरित्रवान पिढी निर्माण करण्यावर भर दिला गेला पाहिजे, असेही महाराज म्हणाले. रविदास खाकी महाराज म्हणाले, गोहत्या थांबविण्यासाठी प्रत्येकाने विडा उचला पाहिजे. गोमातेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूमध्ये जागृती झालीच पाहिजे, जेणे करून येणाऱ्या पिढीला त्याचा वारसा जपता येईल. बाल वैदेही साध्वी बालिका सरस्वती यांनी महिला व युवतींना सशक्त होण्याचे आवाहन केले. जो महिलेची छेड काढतो त्याला त्याचवेळी धडा शिकविला पाहिजे. महिला अबला नसून सबला आहे. बाहेर देशातील शत्रू आपल्या देशात शिरून आपल्याला ललकारत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवायलाच हवा. यावेळी भदंत रावजी पिंडे, प्रा. व्यंकटेश आबदेव, अन्नाजी हांडे यांनीही मार्गदर्शन केले. संमेलनाची सुरूवात महाराजांच्या हस्ते गोमातेचे पूजन व भारत माता यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात होण्यापुर्वी दुर्गा वाहिणीच्या सदस्यांनी तलवारबाजी व सुरक्षा संदर्भात प्रदर्शन सादर केले. संचालन सुभाष आजबले यांनी तर प्रास्ताविक विहिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय एकापुरे यांनी केले. यावेळी उपस्थित हजारो बांधवांनी 'अन्नरक्षण' बाबत प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)