शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा

By admin | Updated: January 17, 2015 22:53 IST

गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो.

भंडारा : गोव्रत, गोहत्या थांबविणे व रक्षण करणे ही त्रिसूत्री अवलंबिल्यावरच गोमातेचे आपण खऱ्या अर्थाने रक्षण करू शकू. धर्मांतरणाच्या नावाखाली उगीचच बागुलबुवा केला जातो. ज्यांना आधी जबरदस्तीने धर्मांतरण करायला लावले त्यांची फक्त 'घर वापसी' होत आहे. त्याला आम्ही धर्मांतरण मानत नाही. आपल्या धर्माला मानणे हा काही दोष नाही. अयोध्येत राममंदिर उभारणारच याला कोणताही धर्म रोखू शकत नाही. प्रत्येक हिंदूच्या मनात अयोद्धेबाबत एकच कल्पना आहे, ती म्हणजे रामललाचा मंदिर उभारणे होय. कुणाचीही निंदा कधी करू नये. उत्तम संस्कारातून चरित्रवान पिढी निर्माण करण्यावर भर दिला गेला पाहिजे, असेही महाराज म्हणाले. रविदास खाकी महाराज म्हणाले, गोहत्या थांबविण्यासाठी प्रत्येकाने विडा उचला पाहिजे. गोमातेचे रक्षण करण्यासाठी प्रत्येक हिंदूमध्ये जागृती झालीच पाहिजे, जेणे करून येणाऱ्या पिढीला त्याचा वारसा जपता येईल. बाल वैदेही साध्वी बालिका सरस्वती यांनी महिला व युवतींना सशक्त होण्याचे आवाहन केले. जो महिलेची छेड काढतो त्याला त्याचवेळी धडा शिकविला पाहिजे. महिला अबला नसून सबला आहे. बाहेर देशातील शत्रू आपल्या देशात शिरून आपल्याला ललकारत असेल तर त्याला त्याच्याच भाषेत धडा शिकवायलाच हवा. यावेळी भदंत रावजी पिंडे, प्रा. व्यंकटेश आबदेव, अन्नाजी हांडे यांनीही मार्गदर्शन केले. संमेलनाची सुरूवात महाराजांच्या हस्ते गोमातेचे पूजन व भारत माता यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. कार्यक्रमाची सुरूवात होण्यापुर्वी दुर्गा वाहिणीच्या सदस्यांनी तलवारबाजी व सुरक्षा संदर्भात प्रदर्शन सादर केले. संचालन सुभाष आजबले यांनी तर प्रास्ताविक विहिपचे जिल्हाध्यक्ष डॉ. संजय एकापुरे यांनी केले. यावेळी उपस्थित हजारो बांधवांनी 'अन्नरक्षण' बाबत प्रतिज्ञा घेतली. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने करण्यात आली. परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. (प्रतिनिधी)