शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

राष्ट्रीय महामार्गावरील नाल्या भुईसपाट

By admin | Updated: March 31, 2017 00:28 IST

मुंबई व कलकत्ता या दोन महानगरांना जोडणारा मार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आहे.

राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष : रस्ता चौपदरीकरणाचा प्रस्तावही थंडबस्त्यातइंद्रपाल कटकवार  भंडारामुंबई व कलकत्ता या दोन महानगरांना जोडणारा मार्ग म्हणजे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आहे. हा महामार्ग भंडारा जिल्ह्यातून गेला असल्याने शहरासह जिल्ह्यातील बाजारपेठेला महत्व वाढले आहे. परंतु याच महामार्गावरील सुविधांना मात्र गळती लागली आहे. शहरातून गेलेल्या महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांची दुरवस्था झाली असून काही ठिकाणी या नाल्या भुईसपाट झाल्या आहे. भंडारा जिल्ह्यातून गेलेल्या महामार्गाची लांबी ७० कि़मी. आहे. १५ लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या मुख्यालयातून जवळपास ३.३० कि़मी. लांबीचा महामार्ग गेला आहे. या महामार्गाच्या दुतर्फा नालीचे बांधकाम होणे अगत्याचे आहे. दशकभरापुर्वी महामार्ग चौपदरीकरणांतर्गत पहिल्या टप्प्यात शिंगोरी फाटा ते देवरीपर्यंतच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात बेला ते पारडी नाकापर्यंत रस्त्याचे विस्तारीकरण करण्यात आले. परंतु शिंगोरी फाटा ते बेला पर्यंतच्या या १० कि़मी. रस्त्याचे विस्तारीकरण अजूनही रखडलेले आहे. शहरातून उड्डाणपुल होणार की नाही ही बाब अजूनही स्पष्ट झाली नाही. उल्लेखनीय म्हणजे या १० कि़मी. रस्ता विस्तारीकरणाचा प्रस्ताव अजूनही थंडबस्त्यात आहे. नाल्यांमध्ये वाढली झाडी-झुडपेशहरातील उपमुख्य तथा गल्ली बोळीच्या रस्त्यामध्ये एका बाजूला नालीचे बांधकाम केले जाते. मात्र राष्ट्रीय महामार्ग असल्याने रस्त्याच्या दुतर्फा नालीचे बांधकाम होणे महत्त्वाचे आहे. भंडारा नगरपालिकेच्या हद्दीनुसार शहराची सीमा नागपूर नाक्यापासून सुरूवात होऊन आॅफिसर क्लबपर्यंत असणाऱ्या रस्त्यापर्यंत (वैनगंगानदी काठ) आहे. शहरातून गेलेल्या महामार्गाच्या दुतर्फा नाली बांधकामासाठी खोदकाम केलेली ही नाली दिसून येत असली तरी ती पक्क्या स्वरूपात नाही. सद्यस्थितीत या नालींमध्ये मोठ्या प्रमाणात केरकचरा व झाडी झुडपे वाढली आहेत.महामार्गावर पेट्रोलपंप, शाळा, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती, तहसिल कार्यालय, जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, प्रशासकीय भवन यासह हॉटेल्स, प्रवाशी थांबा, मोटार गॅरेज व अन्य दुकाने आहेत. महामार्गावरील नाल्याची अशी दुरवस्था बघून बाहेरील जिल्हावासी काय बोध घेतील.