शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांपूर्वी सक्रिय होता नागझिरा दलम

By admin | Updated: December 30, 2014 23:27 IST

राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील २२ तालुके नक्षलमुक्त करण्यात आले ेअसून तिथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, २० वर्षांपूर्वी साकोली

संजय साठवणे - साकोलीराज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील २२ तालुके नक्षलमुक्त करण्यात आले ेअसून तिथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, २० वर्षांपूर्वी साकोली तालुक्यात नागझिरा दलम सक्रीय होता, अशी पोलीस प्रशासनाच्या दप्तरी नोंद आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात भंडारा जिल्ह्यताीतील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्याचाही नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. आता नवीन सरकार सत्तारुढ झाल्यानंतर भंडारा जिल्ह्याला नक्षलमुक्त केले आहे. नागझिरा अभयारण्य पुर्वीपासून घनदाट जंगलाने आणि टेकड्यांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे ‘रेस्ट झोन’ होते. २० वर्षांपुर्वी म्हणजे भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे एक असताना या अभयारण्यात नागझिरा नामक दलम सक्रीय होते. त्यावेळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती. त्यावेळी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक पोलिस कर्मचारी शहीद झाला होता. साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक कर्मचारी चकमकीत जखमी झाल्याचीही नोंद आहे. त्या काळात नक्षल कारवाया मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्याच्या गृह मंत्रालयाने नक्षलवाद्यांच्या कारवायावर नजर ठेवण्यासाठी देवरी उपविभागाची स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्यानंतर या विभागामधूनच पोलिसांकडून नक्षलग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत होती.कालांतराने भंडारा जिल्ह्याची विभागणी झाली. आणि हा भाग गोंदिया जिल्ह्यात समाविष्ट झाला. परंतु नागझिरा अभयारण्य हा साकोली तालुक्याचा एक भाग आहे. नागझिरा अभयारण्यलगत असलेली गावांचा समावे, अतिसंवेदनशिल गावे असा प्रशासनाच्या दप्तरी करण्यात आला आहे. या कारवाईशिवाय साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यात घटनेची नोंद नसली तरी नागझिरा अभयारण्य आणि लगतच्या भागात उन्हाळ्यात तेंदूपत्ता हंगामाच्या वेळी नक्षलवादी येत असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी हिंम्मत जाधव यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता नागझिरा अभयारण्यात नक्षल्यांच्या कुठल्याही हालचाली नसल्याचे स्पष्ट केले. साकोली-लाखनी तालुक्यात ३३ गावेसाकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरझरी, चांदोरी, शिवनटोला, पिटेझरी व आतेगाव ही अतिसंवेदनशिल गावे आहेत. सोनेगाव, मक्कीटोला, निप्परटोला, तुडमापुरी, खांबा, जांभळी, मालुटोला, वडेगाव व पळसपाणी ही संवेदनशिल गावे आहेत. केसलवाडा, सालई, पापडा, सिरेगांवटोला, येडगाव व सालेबर्डी ही साधारण गावे आहेत. लाखनी तालुक्यातील ११ गावांचा नक्षलग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता.रात्रीचे भारनियमन सुरु होऊ शकतेसाकोली लाखनी, लाखांदूर ही तीन तालुके नक्षलग्रसत घोषित असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता आता मिळणार नाही. यापुर्वी हा भत्ता या कर्मचाऱ्यांना मिळत होता. आता हा भत्ता मिळणार नाही. नक्षलमुक्त झाले असले तरी भविष्यात अशा कारवाया होऊ नये यासाठी पोलिस विभाग सज्ज आहे व या नक्षल कारवाई सुक्ष्म नजर ठेवणे पोलिसांचे काम असून जनतेच्या सुरक्षेचीही काळजी घेऊ, असे उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.