शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

२० वर्षांपूर्वी सक्रिय होता नागझिरा दलम

By admin | Updated: December 30, 2014 23:27 IST

राज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील २२ तालुके नक्षलमुक्त करण्यात आले ेअसून तिथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, २० वर्षांपूर्वी साकोली

संजय साठवणे - साकोलीराज्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील २२ तालुके नक्षलमुक्त करण्यात आले ेअसून तिथे नक्षलवाद्यांच्या कोणत्याही कारवाया अस्तित्वात नसल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, २० वर्षांपूर्वी साकोली तालुक्यात नागझिरा दलम सक्रीय होता, अशी पोलीस प्रशासनाच्या दप्तरी नोंद आहे. आघाडी शासनाच्या कार्यकाळात भंडारा जिल्ह्यताीतील साकोली, लाखनी व लाखांदूर तालुक्याचाही नक्षलग्रस्त तालुक्यांमध्ये समावेश करण्यात आला होता. आता नवीन सरकार सत्तारुढ झाल्यानंतर भंडारा जिल्ह्याला नक्षलमुक्त केले आहे. नागझिरा अभयारण्य पुर्वीपासून घनदाट जंगलाने आणि टेकड्यांनी व्यापलेला आहे. या ठिकाणी नक्षलवाद्यांचे ‘रेस्ट झोन’ होते. २० वर्षांपुर्वी म्हणजे भंडारा आणि गोंदिया हे दोन जिल्हे एक असताना या अभयारण्यात नागझिरा नामक दलम सक्रीय होते. त्यावेळी पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली होती. त्यावेळी डुग्गीपार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक पोलिस कर्मचारी शहीद झाला होता. साकोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक कर्मचारी चकमकीत जखमी झाल्याचीही नोंद आहे. त्या काळात नक्षल कारवाया मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे राज्याच्या गृह मंत्रालयाने नक्षलवाद्यांच्या कारवायावर नजर ठेवण्यासाठी देवरी उपविभागाची स्वतंत्र व्यवस्था केली होती. त्यानंतर या विभागामधूनच पोलिसांकडून नक्षलग्रस्त भागाची पाहणी करण्यात येत होती.कालांतराने भंडारा जिल्ह्याची विभागणी झाली. आणि हा भाग गोंदिया जिल्ह्यात समाविष्ट झाला. परंतु नागझिरा अभयारण्य हा साकोली तालुक्याचा एक भाग आहे. नागझिरा अभयारण्यलगत असलेली गावांचा समावे, अतिसंवेदनशिल गावे असा प्रशासनाच्या दप्तरी करण्यात आला आहे. या कारवाईशिवाय साकोली, लाखनी आणि लाखांदूर या तालुक्यात घटनेची नोंद नसली तरी नागझिरा अभयारण्य आणि लगतच्या भागात उन्हाळ्यात तेंदूपत्ता हंगामाच्या वेळी नक्षलवादी येत असल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. यासंदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी हिंम्मत जाधव यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता नागझिरा अभयारण्यात नक्षल्यांच्या कुठल्याही हालचाली नसल्याचे स्पष्ट केले. साकोली-लाखनी तालुक्यात ३३ गावेसाकोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरझरी, चांदोरी, शिवनटोला, पिटेझरी व आतेगाव ही अतिसंवेदनशिल गावे आहेत. सोनेगाव, मक्कीटोला, निप्परटोला, तुडमापुरी, खांबा, जांभळी, मालुटोला, वडेगाव व पळसपाणी ही संवेदनशिल गावे आहेत. केसलवाडा, सालई, पापडा, सिरेगांवटोला, येडगाव व सालेबर्डी ही साधारण गावे आहेत. लाखनी तालुक्यातील ११ गावांचा नक्षलग्रस्त गावांमध्ये समावेश करण्यात आला होता.रात्रीचे भारनियमन सुरु होऊ शकतेसाकोली लाखनी, लाखांदूर ही तीन तालुके नक्षलग्रसत घोषित असल्यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारा प्रोत्साहन भत्ता आता मिळणार नाही. यापुर्वी हा भत्ता या कर्मचाऱ्यांना मिळत होता. आता हा भत्ता मिळणार नाही. नक्षलमुक्त झाले असले तरी भविष्यात अशा कारवाया होऊ नये यासाठी पोलिस विभाग सज्ज आहे व या नक्षल कारवाई सुक्ष्म नजर ठेवणे पोलिसांचे काम असून जनतेच्या सुरक्षेचीही काळजी घेऊ, असे उपविभागीय पोलिस अधिकारी हिम्मत जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.