शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ रथयात्रेत मोठी घटना टळली! १८ हत्तींचे नेतृत्व करणाराच हत्ती बिथरला, अन्...
2
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
3
Sonam Raghuvanshi : आरोपींनी पोलिसांसमोर गुन्हा कबुल केला, पण न्यायाधीशांसमोर वेगळंच सांगितलं; राजा रघुवंशी प्रकरणात नवा ट्विस्ट
4
Mumbai: पालकांनो लक्ष द्या! १ जुलैपासून तुमच्या मुलांना घ्यायला व सोडवायला शाळेची बस न येण्याची शक्यता
5
...म्हणून मुलांना जन्म देण्यास टाळाटाळ करताहेत भारतीय जोडपी, समोर आलं धक्कादायक कारण
6
मराठी समाज विभागलाय, मुंबईत उत्तर भारतीय महापौर बनवण्याची हीच वेळ; सुनील शुक्लानं मांडलं गणित
7
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
8
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
9
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
10
Maratha Reservation Supreme Court: मराठा आरक्षणावर आता जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात सुनावणी
11
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, Sensex १५० अंकांनी वधारला; Tata Motors, Reliance, HCL Tech मध्ये तेजी
12
९० खाजगी जेट, ३० वॉटर टॅक्सी... पण लग्नपत्रिकेवरुन ट्रोल! बेझोस-सांचेझ यांच्या लग्नाची पत्रिका व्हायरल!
13
Prada : कोल्हापुरी चप्पलसाठी संभाजीराजे मैदानात; फेसबुक पोस्ट करुन केली मोठी मागणी
14
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
15
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
16
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
17
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
18
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
19
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
20
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!

लग्नाच्या दिवशी नवरदेवाची मस्टरवर हजेरी

By admin | Updated: June 14, 2014 23:20 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या एका तरुणाची लग्नाच्या दिवशी मस्टरवर हजेरी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब आलेसूर येथे माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.

प्रकरण मग्रारोहयोचे : माहिती अधिकारात प्रकरण उघडकीसतुमसर : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या एका तरुणाची लग्नाच्या दिवशी मस्टरवर हजेरी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब आलेसूर येथे माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. आलेसूर येथे रोजगारानिमित्त बाहेरगावी राहणारे गावात असून कामावर न जाणाऱ्यांचीही नावे मस्टरवर आहेत. परंतु या अनियमिततेप्र्रकरणी तुमसर पंचायत समिती व जिल्हा प्रशासन गप्प आहे.तुमसर तालुक्यातील आलेसूर या आदिवासीबहुल गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दि. ११ मार्चपासून कामे सुरु झाली होती. या कामावर २५० ते ३०० मजूर होते. यापैकी ४० ते ५० मजुरांची नावे बोगस असल्याची माहिती आहे. दिनदयाल नरकंडे यांच्या शेतापासून ते टीसीएम नाली बांधकाम, पांदन नवीन रस्ता, माती खोदून रस्त्यावर टाकणे या कामांचा समावेश होता. आलेसूर या गावाची लोकसंख्या १,५०० असून ही गटग्रामपंचायत आहे.आलेसूर येथील गिरीधर देवलू सुखदेवे या तरुणाचे लग्न दि. २३ मार्च २०१४ ला मिटेवानी येथील मंगला लक्ष्मण मासुरकर हिचेशी होते. लग्नाची वेळ सकाळी ११ वाजता होती. परंतु त्या दिवशी हा युवक आलेसूर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीच्या कामावर हजर होता. मस्टरवर त्याची उपस्थिती दाखविण्यात आली. सहकाऱ्याचे लग्न असल्याने अन्य मजूरही लग्नाला गेले हे निश्चित आहे. येथे नवरदेवाचेच नाव मस्टरवर आहे तर दुसऱ्या मजुराचे नाव निश्चितच असणार हे नाकारता येणारे नाही. या गावातील सहा ते सात जण रोजागरानिमित्त बाहेर गेले आहेत. कारखान्यात काम करणारे, जलवितरण प्रणालीचे कामे करणारे, ट्रक चालविणे, म्हशी राखणे यानिमित्त बाहेर आहेत. त्यांची नावेसुद्धा मस्टरवर नियमित सुरु होती. त्यांची मजुरी राष्ट्रीयकृत बँकेतून होते.येथे नियमित कामावर जाणाऱ्या मजुरांना केवळ ७० ते ८० रुपये मजुरी मिळत होती. जे कामावरच गेले नाहीत त्यांना मात्र ८० ते १०० रुपये मजुरी मिळाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर दि. ९ जूनपासून कामे बंद करण्यात आली आहेत. या ठिकाणी कामावर सद्यस्थितीत केवळ १५ ते २० मजूर आहेत. पावसाळा सुरु होत असल्याने कामे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात पारदर्शकता व अनियमिततेबाबत कारवाई होते. परंतु येथे गंभीर प्रकार उघडकीस आल्यावरही पंचायत समिती व जिल्हा प्रशासन गप्प आहे. हजेरी घेण्याकरिता ग्रामरोजगार सेवक असतो. परंतु शासकीय कर्मचारी ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केला आहे. (तालुका प्रतिनिधी)