शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या दिवशी नवरदेवाची मस्टरवर हजेरी

By admin | Updated: June 14, 2014 23:20 IST

महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या एका तरुणाची लग्नाच्या दिवशी मस्टरवर हजेरी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब आलेसूर येथे माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.

प्रकरण मग्रारोहयोचे : माहिती अधिकारात प्रकरण उघडकीसतुमसर : महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर असलेल्या एका तरुणाची लग्नाच्या दिवशी मस्टरवर हजेरी लावण्यात आल्याची धक्कादायक बाब आलेसूर येथे माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. आलेसूर येथे रोजगारानिमित्त बाहेरगावी राहणारे गावात असून कामावर न जाणाऱ्यांचीही नावे मस्टरवर आहेत. परंतु या अनियमिततेप्र्रकरणी तुमसर पंचायत समिती व जिल्हा प्रशासन गप्प आहे.तुमसर तालुक्यातील आलेसूर या आदिवासीबहुल गावात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत दि. ११ मार्चपासून कामे सुरु झाली होती. या कामावर २५० ते ३०० मजूर होते. यापैकी ४० ते ५० मजुरांची नावे बोगस असल्याची माहिती आहे. दिनदयाल नरकंडे यांच्या शेतापासून ते टीसीएम नाली बांधकाम, पांदन नवीन रस्ता, माती खोदून रस्त्यावर टाकणे या कामांचा समावेश होता. आलेसूर या गावाची लोकसंख्या १,५०० असून ही गटग्रामपंचायत आहे.आलेसूर येथील गिरीधर देवलू सुखदेवे या तरुणाचे लग्न दि. २३ मार्च २०१४ ला मिटेवानी येथील मंगला लक्ष्मण मासुरकर हिचेशी होते. लग्नाची वेळ सकाळी ११ वाजता होती. परंतु त्या दिवशी हा युवक आलेसूर येथील महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमीच्या कामावर हजर होता. मस्टरवर त्याची उपस्थिती दाखविण्यात आली. सहकाऱ्याचे लग्न असल्याने अन्य मजूरही लग्नाला गेले हे निश्चित आहे. येथे नवरदेवाचेच नाव मस्टरवर आहे तर दुसऱ्या मजुराचे नाव निश्चितच असणार हे नाकारता येणारे नाही. या गावातील सहा ते सात जण रोजागरानिमित्त बाहेर गेले आहेत. कारखान्यात काम करणारे, जलवितरण प्रणालीचे कामे करणारे, ट्रक चालविणे, म्हशी राखणे यानिमित्त बाहेर आहेत. त्यांची नावेसुद्धा मस्टरवर नियमित सुरु होती. त्यांची मजुरी राष्ट्रीयकृत बँकेतून होते.येथे नियमित कामावर जाणाऱ्या मजुरांना केवळ ७० ते ८० रुपये मजुरी मिळत होती. जे कामावरच गेले नाहीत त्यांना मात्र ८० ते १०० रुपये मजुरी मिळाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर दि. ९ जूनपासून कामे बंद करण्यात आली आहेत. या ठिकाणी कामावर सद्यस्थितीत केवळ १५ ते २० मजूर आहेत. पावसाळा सुरु होत असल्याने कामे बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामात पारदर्शकता व अनियमिततेबाबत कारवाई होते. परंतु येथे गंभीर प्रकार उघडकीस आल्यावरही पंचायत समिती व जिल्हा प्रशासन गप्प आहे. हजेरी घेण्याकरिता ग्रामरोजगार सेवक असतो. परंतु शासकीय कर्मचारी ग्रामसेवकाने कर्तव्यात कसूर केला आहे. (तालुका प्रतिनिधी)