शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची कामे अडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:36 IST

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात असणाऱ्या गोंडीटोला, बिनाखी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. ...

बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रात असणाऱ्या गोंडीटोला, बिनाखी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आली आहे. महालगाव फाटा ते गोंडीटोला आणि ब्राह्मणटोला ते सुकळी नकुल असे गावांचे नियोजन आहे. या दोन्ही गावांचे मध्यंतरी गोंडीटोला गावांचे सीमांकन आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजुरी देण्यात आलेल्या रस्त्यावर मोरीचे बांधकाम कंत्राटदारानी केले आहेत. परंतु सिमेंट रस्ता, डांबरीकरणाची कामे अडली आहेत. ब्राह्मणटोला, बिनाखी, सुकळी गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर कामांना सुरुवात करण्यात आली नाही. या मार्गावर मोरीचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. डांबरीकरण व सिमेंट रस्ता, नाली बांधकाम करण्यात आले नाही. यामुळे मार्गावरून पायदळ चालणे कठीण होत आहे. मोरी बांधकामाचे पुलावरून साधे वाहन चालविताना अपघात होत आहे. मोरी बांधकामाच्या पुलावर खड्डे पडले आहेत. याच मार्गावरील पूल धोकादायक झाले आहेत. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्याचे कडेला मातीकाम झाले नाही. रस्त्याचे कडेला शेत शिवाराचे अतिक्रमण झाले आहे. झुडपे वाढल्याने नागमोडी वळणावरुन येणारी वाहने दिसत नाही. यामुळे रस्त्याचे कडेला असणारी झुडपे हटविण्याची मागणी सुरू झाली आहे. महालगाव ते गोंडीटोला गावांना जोडणाऱ्या ३ किमी अंतराच्या मार्गाची अवस्था वाईट झाली आहे. कंत्राटदारांनी रस्त्याचे कडेला डांबरीकरणासाठी गिट्टी घातली आहे. ही गिट्टी थेट रस्त्यावर आली असल्याने रोज अपघात वाढले आहेत. रस्त्यावर डबके तयार झाले आहेत. रस्त्यावर चिखलच चिखल तयार झाले आहेत. अपघाताच्या भीतीने रात्री प्रवास करताना जिकिरीचे ठरत आहे. गावात सिमेंट रस्त्याची कामे झाली नाहीत. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. गोंडीटोला गावाला जोडणारे दोन्ही रस्ते त्रासदायक झाले आहेत. या दोन्ही रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण व सिमेंट रस्ता बांधकाम करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

बॉक्स

वृक्षारोपणाचे औचित्य काय

भंडारा-बपेरा-बालाघाट राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आल्याचा उदोउदो करण्यात येत आहे. सोशल मीडिया, तथा श्रेय घेण्याचे मोठंमोठे होर्डिंग लावण्यात आले आहे. चौपदरीकरण होणार असल्याने परिसरातील नागरिक अपेक्षेने पाहत आहेत. रस्त्याचे कडेला असणाऱ्या अनेक घरांवर बुलडोझर धावणार आहेत. या भीतीने अनेकांचा रक्तदाब वाढला आहे. सत्य माहितीचा शोध घेण्याचा प्रयत्न होत आहे. निश्चितच या मार्गाचे चौपदरीकरण झाले पाहिजे असे बहुसंख्य नागरिकांचे मत आहे. दरम्यान, चौपदरीकरण रस्ता बांधकामात अनेक वृक्ष बळी जाणार आहेत. रस्त्याचे कडेला असणारे विजेचे खांब हटविले जाणार आहेत. शासकीय कार्यालयांना फटका बसणार आहेत. ही सर्व कल्पना असताना वीज वितरण कंपनी चुकली आहे. गेल्या वर्षात थ्री फेज विद्युत खांब रस्स्त्याचे कडेला उभे केले आहेत. हा भुर्दंड वीज ग्राहकांना बसणार आहे. सध्या स्थितीत वृक्षारोपण करण्यात येत आहे. रस्त्याचे कडेला बेधडक कामे सुरू आहेत. शासनाच्या निधीचे वारे न्यारे होत आहेत. यावरून चौपदरीकरण रस्ता बांधकाम मंजुरीवर शंका निर्माण झालेल्या आहेत.