शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

जिल्हाधिकारी साहेब, तस्करांचा डाव हाणून पाडणार काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:40 IST

लाखांदूर तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदी काठावरुन गत काही महिन्यांपासून स्थानिक तालुका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध ...

लाखांदूर तालुक्यातील चुलबंद व वैनगंगा नदी काठावरुन गत काही महिन्यांपासून स्थानिक तालुका प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षाने मोठ्या प्रमाणात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक केली जात आहे. या नदीघाटांमध्ये दिघोरी, साखरा, चिकणा, तावशी, खोलमारा, तई, धर्मापुरी, कोच्छी, मांढळ, भागडी, आथली, आसोला, चप्राड, सोनी, आवळी, टेंभरी, विहीरगाव, गवराळा, दोनाड व ईटान आदींचा समावेश आहे.

दरम्यान, तालुक्यातील नांदेड येथील लिलावीत रेटीघाटाअंतर्गत गत १० जूनपासून उपसा बंद करण्यात आल्याने स्थानिक नांदेड गावातीलच काही रेती तस्करांनी रेतीघाट परीसरात रेतीचा अवैध उपसा व वाहतूक चालविल्याची ओरड आहे. या गैरप्रकाराची माहिती रेतीघाट चालकास होताच लिलावीत रेतीघाट परीसरात नाल्या खोदुन नदीपात्रातील अवैध रेती वाहतुकदारांचा रस्ता बंद पाडला. तथापि, काही तस्करांनी खोदलेल्या नाल्या बुजवुन बेकायदेशीरपणे रेतीचा अवैध उपसा चालविल्याची तक्रार रेतीघाट मालकाने जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे.

दरम्यान, गत दोन महिण्यापुर्वी तालुक्यातील टेंभरी - विहीरगाव येथे स्थानिक लाखांदूर तहसीलदारांनी जवळपास २०० ते २५० ब्रॉस रेतीचा अवैध साठा जप्त केला आहे. मात्र रेतीसाठा जप्त करुन तब्बल दोन महिण्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला असतांना अवैध रेतीसाठा प्रकरणी एकाही तस्कराविरोधात कायदेशीर कार्यवाही करण्यात न आल्याने सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

तथापि, विहीरगाव येथील अवैध रेतीसाठा प्रकरणी तस्करांची नावे उघड होऊनही दबावापोटी सबंधितांचे विरोधात कारवाई न करता प्रकरण दडपल्याचा आरोप देखील जनतेत केला जात आहे. एकंदरीत तालुक्यात गत काही महिण्यापासून सुरु असलेली रेतीची अवैध तस्करी नांदेड येथील लिलावीत रेतीघाटामुळे प्रशासनाच्या कारवाईत बंद पडण्याची भिती तस्करांत व्यक्त केली जात असल्याची चर्चा आहे.

सदर भितीपोटीच स्थानिक नांदेड येथील काही रेती तस्करांसह तालुक्यातील काही तस्करांनी संगणमताने लिलावीत रेतीघाट बंद पाडण्यासाठी धडपड चालविल्याची जोरदार चर्चा असुन जिल्हाधिकारी साहेब , तस्करांचा डाव हाणून पाडणार काय ? असा सवाल जनतेत केला जात आहे.