शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा

By admin | Updated: July 2, 2016 00:26 IST

पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे.

नाना पटोले यांचे आवाहन : जिल्ह्यात ८ लाख ३४ हजार रोपट्यांची लागवडभंडारा : पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे. केवळ शासनाने पुढाकार घेऊन चालणार नाही तर लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी ७ ते १० वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करण्याचे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात आयोजित मुख्य वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी हे होते. आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, सहाय्य धर्मदाय आयुक्त जयश्री पुनावाला, उपवनसंरक्षक एन. आर. प्रविण, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक नरेंद्र कावळे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते.जिल्हा क्रीडा संकुलात खासदार व आमदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे वृक्षारोपण करून वनमहोत्सव साजरा केला. जिल्हाभरात एकाच दिवशी ८ लाख ३४ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यानिमित्ताने नागरिकांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. वनविभागाच्या २ कोटी वृक्ष लागवड मोहीमेमुळे जिल्ह्याच्या वनक्षेत्रात निश्चित वाढ होणार आहे.यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, मानवी जीवनाच्या कल्याणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज आहे. महाराष्ट्र हिरवागार करण्याच्या दृष्टिने हे पहिले पाऊल असून वृक्ष जगविण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे खेळासाठी खासदार चषक स्पर्धा आयोजित केली जायची. त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा घेतली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. जलयुक्त शिवार या योजनेप्रमाणे वनयुक्त शिवार राबवून जिल्हा हिरवागार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. जास्तीत जास्त वृक्ष लावून संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकांनी घेतल्यास जिल्हा येत्या तीन वर्षात हिरवागार होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम वर्षभर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)