शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा

By admin | Updated: July 2, 2016 00:26 IST

पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे.

नाना पटोले यांचे आवाहन : जिल्ह्यात ८ लाख ३४ हजार रोपट्यांची लागवडभंडारा : पर्यावरणाचा ऱ्हास मानव निर्मित असून मानवानेच पुढाकार घेऊन हा ऱ्हास थांबविण्याची गरज आहे. केवळ शासनाने पुढाकार घेऊन चालणार नाही तर लोकसहभागातूनच पर्यावरण संवर्धन शक्य होणार आहे. प्रत्येक नागरिकांनी ७ ते १० वृक्षसंवर्धन करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करण्याचे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले.छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा संकुलात आयोजित मुख्य वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी हे होते. आमदार रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, सहाय्य धर्मदाय आयुक्त जयश्री पुनावाला, उपवनसंरक्षक एन. आर. प्रविण, उपजिल्हाधिकारी सुनिल पडोळे, उपविभागीय अधिकारी संपत खिलारी, तहसिलदार सुशांत बनसोडे, सामाजिक वनिकरणाचे उपसंचालक नरेंद्र कावळे, जिल्हा क्रिडा अधिकारी सुभाष गांगरेड्डीवार उपस्थित होते.जिल्हा क्रीडा संकुलात खासदार व आमदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. विद्यार्थ्यांनी स्वयंस्फूर्तपणे वृक्षारोपण करून वनमहोत्सव साजरा केला. जिल्हाभरात एकाच दिवशी ८ लाख ३४ हजार वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रथमच होत आहे. यानिमित्ताने नागरिकांनी ठिकठिकाणी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धनाचा संकल्प केला. वनविभागाच्या २ कोटी वृक्ष लागवड मोहीमेमुळे जिल्ह्याच्या वनक्षेत्रात निश्चित वाढ होणार आहे.यावेळी खासदार नाना पटोले म्हणाले, मानवी जीवनाच्या कल्याणासाठी व पर्यावरण संतुलनासाठी मोठया प्रमाणात वृक्ष लागवड व संवर्धन काळाची गरज आहे. महाराष्ट्र हिरवागार करण्याच्या दृष्टिने हे पहिले पाऊल असून वृक्ष जगविण्याची जबाबदारी सर्वांनी घेतली पाहिजे. ज्याप्रमाणे खेळासाठी खासदार चषक स्पर्धा आयोजित केली जायची. त्याचप्रमाणे वृक्ष संवर्धनासाठी खासदार चषक स्पर्धा घेतली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. जलयुक्त शिवार या योजनेप्रमाणे वनयुक्त शिवार राबवून जिल्हा हिरवागार करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. जास्तीत जास्त वृक्ष लावून संवर्धनाची जबाबदारी प्रत्येकांनी घेतल्यास जिल्हा येत्या तीन वर्षात हिरवागार होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. वृक्ष लागवडीचा हा उपक्रम वर्षभर राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)