शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

भंडारा जिल्ह्यात कोका अभयारण्यामुळे पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 13:41 IST

जिल्ह्यात असलेल्या भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्य पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. मागील काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने वनविभागाच्या महसुलात वाढ होत आहे.

ठळक मुद्देडबल सफारीचा आनंद४६ किमीचा सफारीचा मार्ग

आॅनलाईन लोकमतभंडारा : महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपऱ्यात असणारा भंडारा जिल्हा ११ लाखांच्यावर लोकसंख्या आहे. नैसर्गिक सौंदर्यासोबतच, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्या जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्रापैकी १/३ क्षेत्र जंगलाने व्यापलेला आहे. या जिल्ह्यात असलेल्या भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्य पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. मागील काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने वनविभागाच्या महसुलात वाढ होत आहे.भंडारा - गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या १० हजार १३ हेक्टर वनक्षेत्र शासनाने २०१३ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला कोका अभयारण्य असे नाव देण्यात आहे. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला आता अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.अभयारण्यातील प्राणी येथील पर्यटकांसाठी आकर्षक ठरले आहे. यासोबतच येथील निसर्गसानिध्याची भुरळ पर्यटकांना कोका अभयारण्यात वारंवार येण्यासाठी आकर्षित करीत आहे. हे अभयारण्य वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी संरक्षित केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळवीट, निलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुक्कर आदींचा अधिवास आहे. त्याचबरोबर अनेक पक्ष्यांच्या अधिवासाने व जैवविविधतेने येथील निसर्ग सानिध्य नटलेला आहे.या अभयारण्याचा विकास डिसेंबर २०१३ पासून सुुरु झाला. येथे २५ नैसर्गिक पाणवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाकी तयार करण्यात आली आहे. टाकीत सतत पाणी राहावे म्हणून सौर उर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातीलच १२ वी पास विद्यार्थ्यांना येथील पर्यटकांना गाईड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.अभयारण्यातील डबल सफारीचा मार्ग ४६.५ कि.मी. चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वाढत आहे.अभयारण्यासाठी मार्गनागपूर - भंडारा हे ६५ कि.मी. चे अंतर असून भंडाऱ्याहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार १९ कि.मी. चे आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून तीन जिप्सीची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. या जंगल सफारीची वेळ पहाटे ५ ते सकाळी ९.३० पर्यंत आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६.४५ पर्यंत ठरविण्यात आली आहे.आॅनलाईन बुकींगअभयारण्याला भेट देण्यासाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था आहे. तसेच स्पॉट बुकींग चंद्रपूर प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी पाच ते सात गाड्या सोडण्यात येतात. येथे पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमीटीचे दोन टेंट आहेत. यामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था आहे.