शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

कोका अभयारण्यामुळे पर्यटनाला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2017 22:51 IST

महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपºयात असणारा भंडारा जिल्ह्याची ११ लाखांच्यावर लोकसंख्या आहे.

ठळक मुद्देडबल सफारीचा आनंद : ४६ किमीचा मार्ग, निसर्गाचे सौंदर्य बघायला मिळणार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महाराष्ट्राच्या नकाशावरील अगदी पूर्वेकडच्या कोपºयात असणारा भंडारा जिल्ह्याची ११ लाखांच्यावर लोकसंख्या आहे. नैसर्गिक सौंदर्यासोबतच, नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध असा हा जिल्हा आहे. एवढ्या छोट्या जिल्ह्यात भौगोलिक क्षेत्रापैकी १/३ क्षेत्र जंगलाने व्यापलेला आहे. या जिल्ह्यात असलेल्या भंडारा तालुक्यातील कोका अभयारण्य पर्यटकांना भुरळ पाडू लागला आहे. मागील काही दिवसात येथील पर्यटकांच्या संख्येत वाढ झाल्याने वनविभागाच्या महसुलात वाढ होत आहे.भंडारा - गोंदिया जिल्ह्यात पसरलेल्या न्यू नागझिरा व नागझिरा अभयारण्याला लागून असलेल्या १० हजार १३ हेक्टर वनक्षेत्र शासनाने २०१३ मध्ये अभयारण्य म्हणून घोषित केले. या अभयारण्याला कोका अभयारण्य असे नाव देण्यात आहे. ब्रिटीश काळात ‘ओल्ड रिझर्व्ह फॉरेस्ट’ म्हणून जे जंगल ओळखले जात होते त्याच भागाला आता अभयारण्याचा दर्जा देण्यात आला आहे.अभयारण्यातील प्राणी येथील पर्यटकांसाठी आकर्षक ठरले आहे. यासोबतच येथील निसर्गसानिध्याची भुरळ पर्यटकांना कोका अभयारण्यात वारंवार येण्यासाठी आकर्षित करीत आहे. हे अभयारण्य वन्यजीवांसाठी उत्कृष्ट अधिवास असल्याचे निदर्शनास आल्यामुळे या जंगलाला वन्यप्राण्यांसाठी संरक्षित केले आहे. या अभयारण्याच्या क्षेत्रात वाघ, बिबट, गवा, अस्वल, काळवीट, निलगाय, सांबर, रानकुत्रे, चितळ, रानडुक्कर आदींचा अधिवास आहे. त्याचबरोबर अनेक पक्ष्यांच्या अधिवासाने व जैवविविधतेने येथील निसर्ग सानिध्य नटलेला आहे.या अभयारण्याचा विकास डिसेंबर २०१३ पासून सुुरु झाला. येथे २५ नैसर्गिक पानवठे आहेत. ज्या ठिकाणी वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध नाही त्या ठिकाणी विंधन विहिरी बांधण्यात आल्या असून पाणी पिण्यासाठी सिमेंट टाकी तयार करण्यात आली आहे. टाकीत सतत पाणी राहावे म्हणून सौर उर्जेवर चालणारे पंप बसविण्यात आले आहे. या अभयारण्यात जाण्यासाठी चंद्रपूर या गावी प्रवेशद्वार करण्यात आले आहे. पर्यटकांना जंगल सफारीसाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. गावातीलच १२ वी पास विद्यार्थ्यांना येथील पर्यटकांना गाईड करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.अभयारण्यातील डबल सफारीचा मार्ग ४६.५ कि.मी. चा आहे. या अभयारण्यात वन्यप्राण्यांचे दर्शन सातत्याने होत असल्यामुळे पर्यटकांचा ओढा या अभयारण्याकडे वाढत आहे.अभयारण्यासाठी मार्गनागपूर - भंडारा हे ६५ कि.मी. चे अंतर असून भंडाºयाहून चंद्रपूर हे प्रवेशद्वार १९ कि.मी. चे आहे. चंद्रपूर प्रवेशद्वारापासून तीन जीप्सीची व्यवस्था आहे. तसेच स्वत:चे वाहनही जंगल सफारीसाठी वापरता येते. या जंगल सफारीची वेळ पहाटे ५ ते सकाळी ९.३० पर्यंत आणि दुपारी ३ ते सायंकाळी ६.४५ पर्यंत ठरविण्यात आली आहे.आॅनलाईन बुकींगअभयारण्याला भेट देण्यासाठी आॅनलाईन बुकींगची व्यवस्था आहे. तसेच स्पॉट बुकींग चंद्रपूर प्रवेशद्वारावर उपलब्ध आहे. एकावेळी पाच ते सात गाड्या सोडण्यात येतात. येथे पर्यटकांच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. अभयारण्यात इको डेव्हलपमेंट कमीटीचे दोन टेंट आहेत. यामध्ये निवास व भोजनाची व्यवस्था आहे.