शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

राज्य मार्गावरील शाळांसमोर हवेत गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:02 IST

भंडारा - तुमसर या राज्य मार्गावर अनेक शाळा आहेत. या शाळांसमोर गतिरोधक नाहीत. शाळा समोर आहेत, असे फलकही रस्त्यावर नाहीत. त्यामुळे बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : बांधकाम विभागाने सूचना फलकही लावलेले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : भंडारा - तुमसर या राज्य मार्गावर अनेक शाळा आहेत. या शाळांसमोर गतिरोधक नाहीत. शाळा समोर आहेत, असे फलकही रस्त्यावर नाहीत. त्यामुळे बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. तथापि, बांधकाम विभाग बालकांचे जीव घेण्याची प्रतिक्षा करीत आहे का? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.राज्य मार्गावरच्या शाळा अपघात प्रवणस्थळ बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष नाही. चार दिवसापूर्वी नवस फेडायला आलेल्या बालकाचा दहेगाव येथे मृत्यू झाला. कदाचित गतिरोधक असता तर त्या बालकाचा जीव वाचू शकला असता. दहेगाव येथील पाटीलबाबा मंदिरासमोर अंगणवाडी, जिल्हा प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयही आहे. प्राथमिक शाळेचे आवार मोठे असल्याने गावातील सर्व सामूहिक कार्यक्रम तिथेच होतात. सकाळ झाल्यापासून विद्यार्थी, पालक व अनेकांना रस्ता ओलांडावा लागतो. परंतु या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.मोहगावदेवी येथील टोलीवरही अंगणवाडी, प्राथमिक शाळा तसेच महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शाळा आहे. येथेही बालकांना रस्ता पार करून शाळा गाठावी लागते. बोथली येथील प्राथमिक शाळा, मोहाडी येथील सरस्वती कन्या विद्यालय या शाळेसमोर गतिरोधक नाही. भंडारा-तुमसर राज्यमार्गावरून वाहने वेगाने धावत असतात. भरधाव वाहनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.बोथली, मोहगावटोली, दहेगाव या ठिकाणी अपघात झाले आहेत. काही जणांचे जीव गेले तर काहींना जखमी व्हावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभाग बालकांच्या जिवांची पर्वा करीत नसल्याचे दिसून येते.राज्य मार्गावरच्या शाळांमधील बालक सुरक्षित नाहीत. कारण, पुढे शाळा आहे, असे संकेत देणारे सूचनाफलक कोणत्याही शाळेसमोर नाही. सूचना देणारे फलक असते तर संवेदनशिल वाहक वाहनाचा वेग कमी करतात.सार्वजनिक बांधकाम खात्याने शाळांशेजारी सूचना फलक लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. मोहगाव टोली, बोथली, वरठीचा टी-पाइंट या ठिकाणी एक वर्षापूर्वी प्लॉस्टिकचे गतिरोधक लावण्यात आले होते. हे गतिरोधक दोन महिन्यात उखडून गेले. आता ते दिसतही नाही. यावर लावलेला खर्च वाया गेला. त्यामुळे कायम टिकतील असे गतिरोधकाची गरज आहे.शाळेतून मुलगा घरी येईपर्यंत काळजी करणाऱ्या आईबाबांची संवेदना लक्षात घेऊन बांधकाम विभागाने शाळांसमोर गतिरोधक व सूचना फलक लावावे.- राजेश लेंडे, माजी सरपंच ग्रामपंचायत मोहगाव देवी.