शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

राज्य मार्गावरील शाळांसमोर हवेत गतिरोधक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 23:02 IST

भंडारा - तुमसर या राज्य मार्गावर अनेक शाळा आहेत. या शाळांसमोर गतिरोधक नाहीत. शाळा समोर आहेत, असे फलकही रस्त्यावर नाहीत. त्यामुळे बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे.

ठळक मुद्देविद्यार्थ्यांचा जीव धोक्यात : बांधकाम विभागाने सूचना फलकही लावलेले नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : भंडारा - तुमसर या राज्य मार्गावर अनेक शाळा आहेत. या शाळांसमोर गतिरोधक नाहीत. शाळा समोर आहेत, असे फलकही रस्त्यावर नाहीत. त्यामुळे बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागत आहे. तथापि, बांधकाम विभाग बालकांचे जीव घेण्याची प्रतिक्षा करीत आहे का? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे.राज्य मार्गावरच्या शाळा अपघात प्रवणस्थळ बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे लक्ष नाही. चार दिवसापूर्वी नवस फेडायला आलेल्या बालकाचा दहेगाव येथे मृत्यू झाला. कदाचित गतिरोधक असता तर त्या बालकाचा जीव वाचू शकला असता. दहेगाव येथील पाटीलबाबा मंदिरासमोर अंगणवाडी, जिल्हा प्राथमिक शाळा, ग्रामपंचायत कार्यालयही आहे. प्राथमिक शाळेचे आवार मोठे असल्याने गावातील सर्व सामूहिक कार्यक्रम तिथेच होतात. सकाळ झाल्यापासून विद्यार्थी, पालक व अनेकांना रस्ता ओलांडावा लागतो. परंतु या रस्त्यावर गतिरोधक नसल्याने बालकांना जीव मुठीत घेऊन रस्ता ओलांडावा लागतो.मोहगावदेवी येथील टोलीवरही अंगणवाडी, प्राथमिक शाळा तसेच महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक शाळा आहे. येथेही बालकांना रस्ता पार करून शाळा गाठावी लागते. बोथली येथील प्राथमिक शाळा, मोहाडी येथील सरस्वती कन्या विद्यालय या शाळेसमोर गतिरोधक नाही. भंडारा-तुमसर राज्यमार्गावरून वाहने वेगाने धावत असतात. भरधाव वाहनामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.बोथली, मोहगावटोली, दहेगाव या ठिकाणी अपघात झाले आहेत. काही जणांचे जीव गेले तर काहींना जखमी व्हावे लागले. सार्वजनिक बांधकाम विभाग बालकांच्या जिवांची पर्वा करीत नसल्याचे दिसून येते.राज्य मार्गावरच्या शाळांमधील बालक सुरक्षित नाहीत. कारण, पुढे शाळा आहे, असे संकेत देणारे सूचनाफलक कोणत्याही शाळेसमोर नाही. सूचना देणारे फलक असते तर संवेदनशिल वाहक वाहनाचा वेग कमी करतात.सार्वजनिक बांधकाम खात्याने शाळांशेजारी सूचना फलक लावण्याचे सौजन्य दाखविले नाही. मोहगाव टोली, बोथली, वरठीचा टी-पाइंट या ठिकाणी एक वर्षापूर्वी प्लॉस्टिकचे गतिरोधक लावण्यात आले होते. हे गतिरोधक दोन महिन्यात उखडून गेले. आता ते दिसतही नाही. यावर लावलेला खर्च वाया गेला. त्यामुळे कायम टिकतील असे गतिरोधकाची गरज आहे.शाळेतून मुलगा घरी येईपर्यंत काळजी करणाऱ्या आईबाबांची संवेदना लक्षात घेऊन बांधकाम विभागाने शाळांसमोर गतिरोधक व सूचना फलक लावावे.- राजेश लेंडे, माजी सरपंच ग्रामपंचायत मोहगाव देवी.