शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवितात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाल्य ...

भंडारा : १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाल्य शाळेत जात असताना आईची काळजी वाढली असून, काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामुळे गत सहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. दिवाळीनंतर शाळा उघडल्या तरी त्या अल्पावधीसाठीच राहिल्या. दुसऱ्या लाटेत शाळा पूर्णतः बंद होत्या. मात्र, आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात पाळले जाणारे नियम इमानेइतबारे पाळली जात असल्याचे पालकांनी सांगितले.

बॉक्स

शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. अशा स्थितीत पाल्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाल्य शाळेतून घरी येताच पूर्ण कपडे बदलायचे, स्वच्छता ठेवायची किंबहुना आंघोळ करावी, असा उपक्रम सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पालकही हा सर्व खटाटोप करीत आहे. याशिवाय वर्गात असताना कधीही मास्क काढू नये तोंडाला वारंवार हाताचा स्पर्श होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घरी आल्यावर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघोळ करावी, असे नियमही पाळले जात आहेत.

बॉक्स

काळजी आहे; पण शिक्षणही महत्त्वाचे आहे

गुरुवारपासून शाळा सुरू झाली. माझा मुलगा नवव्या वर्गात आहे. पुढील वर्षी दहावीत जाईल. कोरोना संकट असले तरी मुलाचे शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे. आधीच गत दीड वर्षापासून अभ्यास तेवढ्या गांभीर्याने झाला नाही.

ललिता कोरे

माझी मुलगी इयत्ता आठवीत आहे. ती गुरुवारपासून नियमितपणे शाळेत जात आहे; परंतु ती शाळेत जात असताना तिच्या बॅगेत सॅनिटायझर, अतरिक्त मास्क आहे किंवा नाही याची काळजी घेत असते. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही मी तिला सांगितले आहे.

मनीषा लांजेवार

शासनाने अटी व नियमांच्या आधारावर शाळा सुरू केल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचे असले तरी आरोग्य आणि तेवढेच महत्त्वाचे आहे, वरून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- सरिता कोल्हे