शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
4
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
5
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
6
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
7
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
8
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
9
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
10
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
11
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
12
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
13
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
14
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
15
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
16
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
17
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
18
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
19
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
20
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवितात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाल्य ...

भंडारा : १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाल्य शाळेत जात असताना आईची काळजी वाढली असून, काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामुळे गत सहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. दिवाळीनंतर शाळा उघडल्या तरी त्या अल्पावधीसाठीच राहिल्या. दुसऱ्या लाटेत शाळा पूर्णतः बंद होत्या. मात्र, आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात पाळले जाणारे नियम इमानेइतबारे पाळली जात असल्याचे पालकांनी सांगितले.

बॉक्स

शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. अशा स्थितीत पाल्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाल्य शाळेतून घरी येताच पूर्ण कपडे बदलायचे, स्वच्छता ठेवायची किंबहुना आंघोळ करावी, असा उपक्रम सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पालकही हा सर्व खटाटोप करीत आहे. याशिवाय वर्गात असताना कधीही मास्क काढू नये तोंडाला वारंवार हाताचा स्पर्श होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घरी आल्यावर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघोळ करावी, असे नियमही पाळले जात आहेत.

बॉक्स

काळजी आहे; पण शिक्षणही महत्त्वाचे आहे

गुरुवारपासून शाळा सुरू झाली. माझा मुलगा नवव्या वर्गात आहे. पुढील वर्षी दहावीत जाईल. कोरोना संकट असले तरी मुलाचे शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे. आधीच गत दीड वर्षापासून अभ्यास तेवढ्या गांभीर्याने झाला नाही.

ललिता कोरे

माझी मुलगी इयत्ता आठवीत आहे. ती गुरुवारपासून नियमितपणे शाळेत जात आहे; परंतु ती शाळेत जात असताना तिच्या बॅगेत सॅनिटायझर, अतरिक्त मास्क आहे किंवा नाही याची काळजी घेत असते. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही मी तिला सांगितले आहे.

मनीषा लांजेवार

शासनाने अटी व नियमांच्या आधारावर शाळा सुरू केल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचे असले तरी आरोग्य आणि तेवढेच महत्त्वाचे आहे, वरून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- सरिता कोल्हे