शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

आईची काळजी वाढली, काळजावर दगड ठेवून मुलांना पाठवितात शाळेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST

भंडारा : १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाल्य ...

भंडारा : १५ जुलैपासून राज्यात इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले असले तरी पालकवर्गात चिंतेचे वातावरण आहे. पाल्य शाळेत जात असताना आईची काळजी वाढली असून, काळजावर दगड ठेवून मुलांना शाळेत पाठवीत असल्याची प्रतिक्रियाही व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोनामुळे गत सहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. दिवाळीनंतर शाळा उघडल्या तरी त्या अल्पावधीसाठीच राहिल्या. दुसऱ्या लाटेत शाळा पूर्णतः बंद होत्या. मात्र, आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. कोरोनाकाळात पाळले जाणारे नियम इमानेइतबारे पाळली जात असल्याचे पालकांनी सांगितले.

बॉक्स

शाळेतून घरी येताच कपडे बदला, आंघोळ करा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपले जवळचे नातेवाईक गमावले. अशा स्थितीत पाल्यांची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. पाल्य शाळेतून घरी येताच पूर्ण कपडे बदलायचे, स्वच्छता ठेवायची किंबहुना आंघोळ करावी, असा उपक्रम सुरू झाला आहे. विशेष म्हणजे काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातून पालकही हा सर्व खटाटोप करीत आहे. याशिवाय वर्गात असताना कधीही मास्क काढू नये तोंडाला वारंवार हाताचा स्पर्श होऊ नये, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, घरी आल्यावर कपडे धुवायला टाकावेत आणि आंघोळ करावी, असे नियमही पाळले जात आहेत.

बॉक्स

काळजी आहे; पण शिक्षणही महत्त्वाचे आहे

गुरुवारपासून शाळा सुरू झाली. माझा मुलगा नवव्या वर्गात आहे. पुढील वर्षी दहावीत जाईल. कोरोना संकट असले तरी मुलाचे शिक्षणही तेवढेच महत्त्वाचे आहे. आधीच गत दीड वर्षापासून अभ्यास तेवढ्या गांभीर्याने झाला नाही.

ललिता कोरे

माझी मुलगी इयत्ता आठवीत आहे. ती गुरुवारपासून नियमितपणे शाळेत जात आहे; परंतु ती शाळेत जात असताना तिच्या बॅगेत सॅनिटायझर, अतरिक्त मास्क आहे किंवा नाही याची काळजी घेत असते. याशिवाय सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही मी तिला सांगितले आहे.

मनीषा लांजेवार

शासनाने अटी व नियमांच्या आधारावर शाळा सुरू केल्या. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबतीत लक्ष देणे गरजेचे आहे. शिक्षण महत्त्वाचे असले तरी आरोग्य आणि तेवढेच महत्त्वाचे आहे, वरून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

- सरिता कोल्हे