शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

माता, बालके कुपोषणाच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 21:34 IST

सन २०१४ ते २०१६ पर्यंतच्या जननी सुरक्षा व इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर दिल्या जाणाऱ्या अनुदानापासून तालुक्यातील १,२८० प्रसूत महिला लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता व बालके कुपोषीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून अनुदान नाही : जननी माता लाभापासून वंचित, २०१७ पासून मातृत्व योजनेच्या नावात बदल

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सन २०१४ ते २०१६ पर्यंतच्या जननी सुरक्षा व इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर दिल्या जाणाऱ्या अनुदानापासून तालुक्यातील १,२८० प्रसूत महिला लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता व बालके कुपोषीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शासनाने सन २००५ पासून जननी सुरक्षा योजना सुरु करुन मातांना १,५०० रुपये अनुदान देय केले होते. दरम्यानन २०१० मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरु करुन जननी सुरक्षा व मातृत्व योजनेचे मिळून एकुण सहा हजार रुपये ग्रामीण भागात राहणाºया दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, तसेच अनुसूचित जमातीच्या गर्भवती महिलांना प्रसुतीपुर्व म्हणजे गर्भामध्येच सुरु होणाºया कुपोषणाला दूर करण्याकरिता मातृत्वात पौष्टीक आजारासाठी व प्रसुतीनंतर बाळाच्या स्तनपानासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात येत होते. मात्र सन २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन होताच केंद्रासह शासनालाही या योजनेचा विसर पडला. परीणामी सन २०१४ ते सन २०१६ पर्यंत या योजनेत अनुदानच मिळाले नाही. परिणामी तालुक्यात १,२८० लाभार्थ्यांचे जवळपास ८५ लक्ष रुपये अडले आहेत.दरम्यान १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेच्या नावात बदल करुन प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरु करुन ती जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडे वर्ग केली व त्याचे अनुदानही प्राप्त आहे. परंतु २०१४ पासून ते २०१६ पर्यंतच्या लाभार्थ्यांचे काय, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.महिला व बालकल्याण तर्फे सुरु असलेल्या जननी सुरक्षा व मातृत्व योजनेत शासनाचे सन २०१४ पासूनचे अनुदान अप्राप्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देता आले नाही.- एम. एस. मोहाड, सीडीपीओ, महिला व बालक्याण विभागपैशाअभावी योग्य आहार न मिळाल्याने माता व बालके कुपोषित होत असतांना शासनाचे व अधिकाºयांचेही हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातीलच जर एवढे लाभार्थी वंचित असतील तर जिल्ह्याचे आकडेवारी किती असणार. याकडे शासनाच्या प्रतिनिधींंनी लक्ष देण्याची गरज आहे.- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य भंडारा