शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

माता, बालके कुपोषणाच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 21:34 IST

सन २०१४ ते २०१६ पर्यंतच्या जननी सुरक्षा व इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर दिल्या जाणाऱ्या अनुदानापासून तालुक्यातील १,२८० प्रसूत महिला लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता व बालके कुपोषीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देतीन वर्षांपासून अनुदान नाही : जननी माता लाभापासून वंचित, २०१७ पासून मातृत्व योजनेच्या नावात बदल

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सन २०१४ ते २०१६ पर्यंतच्या जननी सुरक्षा व इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेअंतर्गत महिलांना प्रसुतीपुर्व व प्रसूतीनंतर दिल्या जाणाऱ्या अनुदानापासून तालुक्यातील १,२८० प्रसूत महिला लाभार्थी वंचित आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील माता व बालके कुपोषीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे.शासनाने सन २००५ पासून जननी सुरक्षा योजना सुरु करुन मातांना १,५०० रुपये अनुदान देय केले होते. दरम्यानन २०१० मध्ये तत्कालीन प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजना सुरु करुन जननी सुरक्षा व मातृत्व योजनेचे मिळून एकुण सहा हजार रुपये ग्रामीण भागात राहणाºया दारिद्र्य रेषेखालील अनुसूचित जाती, तसेच अनुसूचित जमातीच्या गर्भवती महिलांना प्रसुतीपुर्व म्हणजे गर्भामध्येच सुरु होणाºया कुपोषणाला दूर करण्याकरिता मातृत्वात पौष्टीक आजारासाठी व प्रसुतीनंतर बाळाच्या स्तनपानासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत देण्यात येत होते. मात्र सन २०१४ मध्ये केंद्रात व राज्यात सत्ता परिवर्तन होताच केंद्रासह शासनालाही या योजनेचा विसर पडला. परीणामी सन २०१४ ते सन २०१६ पर्यंत या योजनेत अनुदानच मिळाले नाही. परिणामी तालुक्यात १,२८० लाभार्थ्यांचे जवळपास ८५ लक्ष रुपये अडले आहेत.दरम्यान १ जानेवारी २०१७ पासून केंद्र शासनाने इंदिरा गांधी मातृत्व सहयोग योजनेच्या नावात बदल करुन प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना सुरु करुन ती जिल्हा परिषदच्या आरोग्य विभागाकडे वर्ग केली व त्याचे अनुदानही प्राप्त आहे. परंतु २०१४ पासून ते २०१६ पर्यंतच्या लाभार्थ्यांचे काय, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.महिला व बालकल्याण तर्फे सुरु असलेल्या जननी सुरक्षा व मातृत्व योजनेत शासनाचे सन २०१४ पासूनचे अनुदान अप्राप्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना लाभ देता आले नाही.- एम. एस. मोहाड, सीडीपीओ, महिला व बालक्याण विभागपैशाअभावी योग्य आहार न मिळाल्याने माता व बालके कुपोषित होत असतांना शासनाचे व अधिकाºयांचेही हेतुपुरस्पर दुर्लक्ष केले आहे. तालुक्यातीलच जर एवढे लाभार्थी वंचित असतील तर जिल्ह्याचे आकडेवारी किती असणार. याकडे शासनाच्या प्रतिनिधींंनी लक्ष देण्याची गरज आहे.- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य भंडारा