शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
4
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
5
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
6
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
7
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट
8
विरोधकांच्या हल्ल्यात ऐन तारुण्यात दोन पाय गमावले, पण समाजकार्य नाही सोडले, आता राज्यसभेवर नियुक्ती, कोण आहेत सदानंदन मास्टर
9
शेअर बाजारात नुकसान होतंय? '५५:२३:२२' चा फॉर्म्युला वापरा, पोर्टफोलिओ सुरक्षित ठेवून नफा कमवा!
10
आता 'चलाखी' चालणार नाही! कारच्या काचेवर FASTag शी छेडछाड केल्यावर होईल कारवाई...
11
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
12
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
13
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
14
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
15
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
16
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
17
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
18
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
19
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
20
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती

माळरानातील बहुगणी पळस झाला दुर्मिळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2019 21:18 IST

औषधीय गुणामुळे आयुर्वेदात अनेक वृक्षांना कल्पवृक्ष मानले आहे. त्यात पळसवृक्षाचाही समावेश आहे. शितलतेच्या गुणामुळे इतर कल्पवृक्षांपेक्षा ग्रामीण भागात पळसवृक्षाचा ग्रामीणांशी प्रत्यक्ष जवळचा संबंध होता. अनेक संतांनी या वृक्षाची महती सांगितली आहे.

ठळक मुद्देनवीन पिढीला माहितीची गरज : -तर हजारो लोकांना उपलब्ध होऊ शकतो रोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : औषधीय गुणामुळे आयुर्वेदात अनेक वृक्षांना कल्पवृक्ष मानले आहे. त्यात पळसवृक्षाचाही समावेश आहे. शितलतेच्या गुणामुळे इतर कल्पवृक्षांपेक्षा ग्रामीण भागात पळसवृक्षाचा ग्रामीणांशी प्रत्यक्ष जवळचा संबंध होता. अनेक संतांनी या वृक्षाची महती सांगितली आहे.आता नविन पिढीला त्याचे महत्व ध्यानात येत नसल्याने या वृक्षाची सरपणासाठी सर्रास कत्तल होत असल्याने या वृक्षवल्लीचे अस्तित्व धोक्यात येऊ पाहत आहे. अशीच स्थिती राहिली तर येत्या ५-१० वर्षात पळस नामशेष झाल्यास आश्चर्य वाटायला नको. काही वषार्पूवी परिसरातील जंगलात पळसाच्या प्रचंड संख्येमुळे फुललेले पळस जंगलात आगल्यासारखे भासायचे. परंतु आता जंगलातही हे वृक्ष एकट्यादूकट्या संख्येतच दिसत आहेत. शेतातील पळस वृक्षांची संख्याही कमी झाली आहे. लोकसंख्या वाढीमुळे गावांचे क्षेत्रफळ फूगत चालले आहे. त्यामुळे गावाजवळ असलेली पळसवृक्ष पूर्णपणे नामशेष झाले आहेत. होळीच्या दिवशी पळसफुलाच्या पाण्यात घालून आंघोळ केल्याने चर्मरोग होत नाही, असा समज ग्रामीण क्षेत्रात असल्याने ग्रामीण लोक स्वत: व आपल्या पाल्यांना याने आंघोळ घालतात.वाळलेल्या फुलांचा शरबत शितलता प्रदान करतो म्हणून उन्हाळ्याच्या दिवसात ग्रामीण आजही वाळलेल्या पळसफुलांचा शरबताकरीता उपयोग करतात. हे शरबत देऊन पाहूण्यांचे पाहूनचार करतात. संशोधक डॉ.शांतीलाल कोठारी यांनी त्यावर बरेच संशोधन करून पळसफुलाच्या शरबताचा प्रचारप्रसार करीत आहेत. धुळवळीच्या दिवशी पळसफुलांचा रंग खेळण्याची प्रथा आहे. तर होळीपूर्वी दहा पंधरा दिवसाआधीपासून खेळला जाणारा 'घानमाकड' नावाचा झूला याच पळसफुलाच्या लाकडाने तयार करण्यात येत होते.होळीपर्यंत घानमाकड खेळून त्यानंतर त्याच लाकडाची होळी केल्या जात होते. पळसाच्या पानाचा वापर पत्रावळी तयार करण्याकरीताही होत असे. हजारो लोकांना यामुळे रोजगार मिळत होते. पण आता कागदी व प्लास्टिक पत्रावळीमुळे पळस पानाच्या पत्रावळी निकामी झाल्या आहेत. पळसाच्या बियांपासून निघणारे तेल आयुवेर्दीक औषधी व साबण आदी तयार करण्याकरीता वापरले जात होते.