शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

शेतातील वृक्षांची सर्रास कत्तल

By admin | Updated: June 5, 2017 00:18 IST

एकेकाळी जिल्ह्यातील दाट आणि प्राणीसंपदा असलेली विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली जंगले बहुतांश उजाड झाली आहेत.

पक्षी होत आहेत लुप्त : सिमेंटच्या जंगलाचे सुशोभीकरणपुरूषोत्तम डोमळे । लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : एकेकाळी जिल्ह्यातील दाट आणि प्राणीसंपदा असलेली विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली जंगले बहुतांश उजाड झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातही मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची मौल्यवान जातीची झाडे होती. मात्र अस्मानी संकटामुळे सतत होणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि कुटुंबाचा निर्वाह चालवण्यासाठी कंत्राटदाराना शेतात असलेली झाडे विकू लागला. त्यामुळे एकेकाळी हिरवीगार दिसणारी शेती आज वृक्षाविना उजाड होताना दिसून येत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ठ केली जात आहे. वृक्षतोडीचा मानवी जिवनावर जसा परिणाम होत आहे तसाच परिणाम पशुपक्ष्यावरही झाला आहे. या मुख्य कारणामुळे निसर्गाने मुक्त वावरणाऱ्या पक्ष्याच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत तर काही प्रजाती कायमच्या लुप्त होत चालल्या आहेत.अन्न, वस्त्र व निवाऱ्यासोबत मानवतासह प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुद्ध वातावरणाची गरज आहे. शुद्ध वातावरण निर्मिती वृक्षामुळेच होते. वातावरणात शुद्धता मिळत नसल्याने निसर्गाच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या पक्षांच्या संख्येत घट होत चाललेली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे लाकूड कंत्राटदारावर मेहरनजर राखण्यात येत असल्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्ष हाच आधार असलेली पक्षी सहजच लुप्त होत आहेत. काही शेतात अल्पप्रमाणात वृक्ष उरलेली आहेत. त्यांनाही वाचविण्याचे प्रयत्न होत नाही. नव्याने लावलेली वृक्ष लवकर मोठे होत नाही. जनतेमध्ये नवीन झाडे लावून झाडे जगविण्याचा अभाव आहे. याच कारणामुळे निसर्गाचा समतोल निवडला आहे. पुर्वी लोकसंख्या फार होती. गावात तसेच शेतात मोठमोठी वृक्ष होती. पुर्वी लोक वृक्ष पुजन करायचे. जागोजागी विविध वृक्षांची लागवड होत होती. याच झाडावर पक्ष्यांचे वास्तव्य असायचे मात्र सद्यस्थितीत वृक्षांची संख्या कमी होत चालली आहे. सिमेंटची जंगले कमी होवू लागली आहे. या सिमेंटच्या जंगलाना सुशोभित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. एकीकडे वृक्षतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे तर दुसरीकडे समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण वाढल्यामुळे विविध प्रकारच्या प्रजातीचे पक्ष्यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते, शासन प्रशासनामार्फत गाजावाजा करून वृक्षरोपण केले जाते. कोट्यावधी रूपये खर्च केले जातात. वर्तमानपत्रात फोटो छापून प्रसिद्धी दिली जाते. नंतर त्याकडे कुणीच ढुंकूनही पाहत नाही. वृक्षरोपण केल्यानंतर झाडे जगविण्याची हमी प्रत्येक नागरिकांनी तसेच संबंधित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात मात्र जिवंत झाडे किती आहेत याचा आढावा कोणताच अधिकारी घेत नाही. हे योग्य नाही. सध्या लाकडी वस्तु न वापरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र आज सर्वत्र फर्निचर मार्ट गल्लोगल्लीत पाहावयाच मिळत आहेत.