शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

शेतातील वृक्षांची सर्रास कत्तल

By admin | Updated: June 5, 2017 00:18 IST

एकेकाळी जिल्ह्यातील दाट आणि प्राणीसंपदा असलेली विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली जंगले बहुतांश उजाड झाली आहेत.

पक्षी होत आहेत लुप्त : सिमेंटच्या जंगलाचे सुशोभीकरणपुरूषोत्तम डोमळे । लोकमत न्यूज नेटवर्कसानगडी : एकेकाळी जिल्ह्यातील दाट आणि प्राणीसंपदा असलेली विविध प्रकारच्या वृक्षांनी बहरलेली जंगले बहुतांश उजाड झाली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतातही मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची मौल्यवान जातीची झाडे होती. मात्र अस्मानी संकटामुळे सतत होणाऱ्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला आणि कुटुंबाचा निर्वाह चालवण्यासाठी कंत्राटदाराना शेतात असलेली झाडे विकू लागला. त्यामुळे एकेकाळी हिरवीगार दिसणारी शेती आज वृक्षाविना उजाड होताना दिसून येत आहे.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी महत्वाचा घटक असलेली वनसंपदा नष्ठ केली जात आहे. वृक्षतोडीचा मानवी जिवनावर जसा परिणाम होत आहे तसाच परिणाम पशुपक्ष्यावरही झाला आहे. या मुख्य कारणामुळे निसर्गाने मुक्त वावरणाऱ्या पक्ष्याच्या प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत तर काही प्रजाती कायमच्या लुप्त होत चालल्या आहेत.अन्न, वस्त्र व निवाऱ्यासोबत मानवतासह प्राणीमात्रांना जगण्यासाठी शुद्ध वातावरणाची गरज आहे. शुद्ध वातावरण निर्मिती वृक्षामुळेच होते. वातावरणात शुद्धता मिळत नसल्याने निसर्गाच्या सौंदर्यात भर पाडणाऱ्या पक्षांच्या संख्येत घट होत चाललेली आहे. वनविभागाच्या दुर्लक्षित धोरणामुळे लाकूड कंत्राटदारावर मेहरनजर राखण्यात येत असल्यामुळे वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे. त्यामुळे वृक्ष हाच आधार असलेली पक्षी सहजच लुप्त होत आहेत. काही शेतात अल्पप्रमाणात वृक्ष उरलेली आहेत. त्यांनाही वाचविण्याचे प्रयत्न होत नाही. नव्याने लावलेली वृक्ष लवकर मोठे होत नाही. जनतेमध्ये नवीन झाडे लावून झाडे जगविण्याचा अभाव आहे. याच कारणामुळे निसर्गाचा समतोल निवडला आहे. पुर्वी लोकसंख्या फार होती. गावात तसेच शेतात मोठमोठी वृक्ष होती. पुर्वी लोक वृक्ष पुजन करायचे. जागोजागी विविध वृक्षांची लागवड होत होती. याच झाडावर पक्ष्यांचे वास्तव्य असायचे मात्र सद्यस्थितीत वृक्षांची संख्या कमी होत चालली आहे. सिमेंटची जंगले कमी होवू लागली आहे. या सिमेंटच्या जंगलाना सुशोभित करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची कत्तल केली जात आहे. एकीकडे वृक्षतोडीमुळे पक्ष्यांच्या संख्येत घट होत आहे तर दुसरीकडे समाजामध्ये मांसाहाराचे प्रमाण वाढल्यामुळे विविध प्रकारच्या प्रजातीचे पक्ष्यांची शिकार केली जात आहे. त्यामुळे पक्ष्यांचे अस्तीत्व धोक्यात आले आहे. विविध सामाजिक संस्था, राजकीय नेते, शासन प्रशासनामार्फत गाजावाजा करून वृक्षरोपण केले जाते. कोट्यावधी रूपये खर्च केले जातात. वर्तमानपत्रात फोटो छापून प्रसिद्धी दिली जाते. नंतर त्याकडे कुणीच ढुंकूनही पाहत नाही. वृक्षरोपण केल्यानंतर झाडे जगविण्याची हमी प्रत्येक नागरिकांनी तसेच संबंधित वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे. दरवर्षी कोट्यवधी झाडे लावली जातात मात्र जिवंत झाडे किती आहेत याचा आढावा कोणताच अधिकारी घेत नाही. हे योग्य नाही. सध्या लाकडी वस्तु न वापरण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे. मात्र आज सर्वत्र फर्निचर मार्ट गल्लोगल्लीत पाहावयाच मिळत आहेत.