शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

मान्सून रूसला, पेरण्या खोळंबल्या

By admin | Updated: June 24, 2017 00:25 IST

लहरी निसर्गामुळे शेती बेभरोवशाची व तोट्याची झाली आहे. मान्सूनवरच शेती हंगाम अवलंबून असल्याने शेतकरी दररोजच चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे.

आद्रा नक्षत्रास आरंभ : पेरणीकरिता तयारी पूर्णलोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : लहरी निसर्गामुळे शेती बेभरोवशाची व तोट्याची झाली आहे. मान्सूनवरच शेती हंगाम अवलंबून असल्याने शेतकरी दररोजच चातकाप्रमाणे पावसाची वाट बघत आहे. मात्र मान्सून वाऱ्यांचा वेग मंदावल्याने आणखी किती दिवस मान्सून सक्रिय व्हायला वेळ लागेल हे अनिश्चित असल्याने शेतकरी चिंतातूर झाला आहे.मागील पाच-दहा वर्षापासून निश्चितच वेळेत मान्सून हजेरी लावतच नाही. हवामान खातेही दररोज नव्या नव्या अभ्यासाच्या आधारे नवेनवे शोध घेतो तरी मात्र हवामान खाते नापास होत आहे. यामुळे शेतकरी सावध पवित्रा घेत पावसाची वास्तवास्थिती बघूनच पेरणीचा निर्णय घेत आहे. आजपर्यंत केवळ पाच ते दहा टक्केच पेरणी आटोपली असून स्वतंत्र सिंचन व्यवस्थेतच पेरणी आटोपली आहे. मान्सूनची गती वाढल्यास पेरणीला गती येईल अन्यथा पेरण्या थांबलेल्याच आहेत. शेतकरीही वर्तमानपत्र, दूरदर्शनच्या आधाराने माहिती घेत खरीपाची शेती कसताना दिसत आहे. पुढच्या हप्त्यापासून मान्सून सक्रीय होणार असल्याचे भाकित वर्तवले जात आहे. मान्सून रूसल्याने उष्णता कायम असून पारा ४२ ते ४५ अंशाच्या घरात खेळत आहे.पाऊसच नसल्याने जमिन तहानली आहे. जमिनीला भेगा मोठ्या असल्याने पेरणी शक्य नाही. जमिनीतील तणसुद्धा उगवला नसल्याने पेरणी केलीच नाही. -दुधराम पराते, धान उत्पादक शेतकरी पालांदूर.नर्सरी तयार झाली आहे. परंतु पाऊस अपेक्षित नसल्याने महागाचे बियाणे वाया जाऊ देण्यापेक्षा अपेक्षित पाऊस आल्यावरच पेरणी करायची आहे. कृषिमंडळ कार्यालयातूनही सुचना मिळाल्याने पेरणी थांबली आहे.-कृष्णा जांभुळकर, प्रगत शेतकरी पालांदूर.