शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

श्रमयोगी योजनेतून लागणार पैसे बचतीची सवय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:38 IST

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.

ठळक मुद्देरवींद्र्र जगताप : लाभार्थ्यांना मानधन योजनेचे नोंदणी कार्ड वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.केंद्र सरकारच्या वतीने अर्थ संकल्पात ६० वर्ष वयाच्या असंघटीत कामगारांसाठी मासिक तीन हजार रुपए निवृत्ती वेतनाची हमी देणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, हया योजनेचा शुभारंभ मंगळवारला करण्यात जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अवघ्या काही दिवसातच या योजनेसाठी भंडारा जिल्हयात आठ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून ही नोंदणी प्रक्रीया अशीच सुरू ठेवून नागरिकांना पेन्शन मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सीएससी व आपले सरकार सेवा केंद्राचे माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य) मंजूषा ठवकर, प्रवर्तन अधिकारी (भविष्य निर्वाह निधी) अमित आहूजा, संतोष पोळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनिषा कुरसंगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पाच्छापूरे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी नितीन फुके, उप कार्यक्रम व्यवस्थापक खोब्रागडे, आपले सरकार केंद्र (पंचायत) जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले आदींची उपस्थिती होती.जगताप म्हणाले, महिलांमध्ये पैसे बचत करण्याच्या अजूनही विविध पध्दती आहेत, त्या पध्दतीचा फायदा त्यांच्या कुटुंबियांना होतो. परंतु ज्या कामगारांचे पंधरा हजाराचे आत उत्पन्न आहे अशा, असंघटीत कामगारांसाठी अशा प्रकारची योजना नव्हती, परंतु केंद्र शासनाचे पुढाकारातून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही योजना सर्वांना उपयोगी पडेल अशी महत्वाची आहे. ग्रामीण भागात रोजी रोटी करणाऱ्या महिला अजूनही पगार, मजूरी आपल्या नवऱ्याच्या हातात देतात. परंतु कुटूंबात पैसाबाबत एखादी अडचण निर्माण झाली तर त्या पैशाचा मात्र पुरूषांकडे हिशोब नसतो, विविध कामांवर तो खर्च झालेला असतो. अशा वेळी आर्थिक मदतीसाठी कुणीही धावून येत नाहीत, असे अनेक प्रसंग ऐकायला मिळतात. त्यामुळे अशा परिस्थतीत या योजनेचा फायदा कामगारांना बहुमौलाचा ठरणार आहे.