शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

श्रमयोगी योजनेतून लागणार पैसे बचतीची सवय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 21:38 IST

केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.

ठळक मुद्देरवींद्र्र जगताप : लाभार्थ्यांना मानधन योजनेचे नोंदणी कार्ड वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : केंद्र सरकारच्या श्रम व रोजगार मंत्रालयाच्या वतीने ^६० वर्ष वयानंतर असंघटीत कामगारांना मिळणाऱ्या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेच्या माध्यमातून गरीब कुटूंबांना पैसे बचत करण्याची सवय लागणार असून भविष्यात हया योजनेतील पैसाचा फायदा कुटूंबांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी होईल, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले.केंद्र सरकारच्या वतीने अर्थ संकल्पात ६० वर्ष वयाच्या असंघटीत कामगारांसाठी मासिक तीन हजार रुपए निवृत्ती वेतनाची हमी देणारी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेची घोषणा करण्यात आलेली होती, हया योजनेचा शुभारंभ मंगळवारला करण्यात जिल्हा परिषद सभागृहात करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अवघ्या काही दिवसातच या योजनेसाठी भंडारा जिल्हयात आठ हजार लाभार्थ्यांची नोंदणी करण्यात आली असून ही नोंदणी प्रक्रीया अशीच सुरू ठेवून नागरिकांना पेन्शन मानधन योजनेचा लाभ देण्यात येणार आहे. सीएससी व आपले सरकार सेवा केंद्राचे माध्यमातून आयोजित कार्यक्रमाला यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) बागडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य) मंजूषा ठवकर, प्रवर्तन अधिकारी (भविष्य निर्वाह निधी) अमित आहूजा, संतोष पोळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) मनिषा कुरसंगे, प्राथमिक शिक्षणाधिकारी पाच्छापूरे, जिल्हा पशुसवंर्धन अधिकारी नितीन फुके, उप कार्यक्रम व्यवस्थापक खोब्रागडे, आपले सरकार केंद्र (पंचायत) जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले आदींची उपस्थिती होती.जगताप म्हणाले, महिलांमध्ये पैसे बचत करण्याच्या अजूनही विविध पध्दती आहेत, त्या पध्दतीचा फायदा त्यांच्या कुटुंबियांना होतो. परंतु ज्या कामगारांचे पंधरा हजाराचे आत उत्पन्न आहे अशा, असंघटीत कामगारांसाठी अशा प्रकारची योजना नव्हती, परंतु केंद्र शासनाचे पुढाकारातून प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन निवृत्ती वेतन योजनेचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. ही योजना सर्वांना उपयोगी पडेल अशी महत्वाची आहे. ग्रामीण भागात रोजी रोटी करणाऱ्या महिला अजूनही पगार, मजूरी आपल्या नवऱ्याच्या हातात देतात. परंतु कुटूंबात पैसाबाबत एखादी अडचण निर्माण झाली तर त्या पैशाचा मात्र पुरूषांकडे हिशोब नसतो, विविध कामांवर तो खर्च झालेला असतो. अशा वेळी आर्थिक मदतीसाठी कुणीही धावून येत नाहीत, असे अनेक प्रसंग ऐकायला मिळतात. त्यामुळे अशा परिस्थतीत या योजनेचा फायदा कामगारांना बहुमौलाचा ठरणार आहे.