शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

मोबाईलधारकांनी ‘लोटा’ सोडावा

By admin | Updated: March 15, 2017 00:21 IST

शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे.

सुधाकर आडे : देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी साधला संवादभंडारा : शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. परंतु त्याच हातात ग्रामीण भागात उघडयावर शौचास जाण्यासाठी टमरेलचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी केले. तुमसर तालुक्यातील देव्हाडी ग्रामपंचायत येथे हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सरपंच रिता मसरके, ग्राम विकास अधिकारी व्ही. बी. बावनकुळे, उपसरपंच विरेंद्र दमाहे, सदस्य सुधीर मसरके, संजय बिरनवारे, मुकेश मुटकूरे, रंजना नागपूरे, आशा दमाहे, इंदू लिल्हारे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, रोजगारसेवक किरण दमाहे, आशा सेविका लिना बघोले, आॅपरेटर सुनिल लिल्हारे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आडे यांनी, तालुक्यात इतर गावांपेक्षा देव्हाडीची आदर्श म्हणून वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्याकरिता विचारसरणी स्विकारावी लागेल. मोबाईलच्या द्वारे जगाला हातात धरण्याची क्षमता ज्या नागरिकांच्या हातात आहे, त्याच हातात टमरेल दिसून येणे हे मानवांसाठी दुर्देवाची बाब आहे. गावातील उघड्या हागणदारीचे चित्र नाहिसे करणे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. जिवनात एखाद्या शब्दानेही बदल घडविता येते परंतु तो शब्द मानवांच्या अंतकरणाला भिडला पाहिजे. त्याकरिता सामजिक दबाव महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला समाज जिवन घडविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ते घडविता येवू शकते. नागरिकांना मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कुटुंबाशी जुळावे लागेल. संवाद साधून संधीचे सोने करावे लागेल असे सांगितले व २० मार्च २०१७ पर्यंत वॉर्ड व गाव हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम गावाबाबतची शौचालय बांधकामाची स्थिती जाणून घेतली व सदस्य, वॉर्ड, दिवस निहाय नियोजन करून ग्रामपंचायत सदस्यांनी अंमलबजावणी करावी व उघड्या हागणदारीचे समुह उच्चाटन करावे, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रश्न विचारुन शंकांचे निरसन केले. हागणदारीमुक्त गाव करून तुमसर तालुक्यात देव्हाडीची वेगळी ओळख निर्माण करण्याचे अभिवचन यावेळी उपस्थितांनी दिले. (शहर प्रतिनिधी)