शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलधारकांनी ‘लोटा’ सोडावा

By admin | Updated: March 15, 2017 00:21 IST

शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे.

सुधाकर आडे : देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी साधला संवादभंडारा : शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. परंतु त्याच हातात ग्रामीण भागात उघडयावर शौचास जाण्यासाठी टमरेलचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी केले. तुमसर तालुक्यातील देव्हाडी ग्रामपंचायत येथे हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सरपंच रिता मसरके, ग्राम विकास अधिकारी व्ही. बी. बावनकुळे, उपसरपंच विरेंद्र दमाहे, सदस्य सुधीर मसरके, संजय बिरनवारे, मुकेश मुटकूरे, रंजना नागपूरे, आशा दमाहे, इंदू लिल्हारे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, रोजगारसेवक किरण दमाहे, आशा सेविका लिना बघोले, आॅपरेटर सुनिल लिल्हारे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आडे यांनी, तालुक्यात इतर गावांपेक्षा देव्हाडीची आदर्श म्हणून वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्याकरिता विचारसरणी स्विकारावी लागेल. मोबाईलच्या द्वारे जगाला हातात धरण्याची क्षमता ज्या नागरिकांच्या हातात आहे, त्याच हातात टमरेल दिसून येणे हे मानवांसाठी दुर्देवाची बाब आहे. गावातील उघड्या हागणदारीचे चित्र नाहिसे करणे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. जिवनात एखाद्या शब्दानेही बदल घडविता येते परंतु तो शब्द मानवांच्या अंतकरणाला भिडला पाहिजे. त्याकरिता सामजिक दबाव महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला समाज जिवन घडविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ते घडविता येवू शकते. नागरिकांना मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कुटुंबाशी जुळावे लागेल. संवाद साधून संधीचे सोने करावे लागेल असे सांगितले व २० मार्च २०१७ पर्यंत वॉर्ड व गाव हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम गावाबाबतची शौचालय बांधकामाची स्थिती जाणून घेतली व सदस्य, वॉर्ड, दिवस निहाय नियोजन करून ग्रामपंचायत सदस्यांनी अंमलबजावणी करावी व उघड्या हागणदारीचे समुह उच्चाटन करावे, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रश्न विचारुन शंकांचे निरसन केले. हागणदारीमुक्त गाव करून तुमसर तालुक्यात देव्हाडीची वेगळी ओळख निर्माण करण्याचे अभिवचन यावेळी उपस्थितांनी दिले. (शहर प्रतिनिधी)