शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
2
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
3
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
4
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
5
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
6
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
7
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
8
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
9
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
10
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
11
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
12
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
13
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
14
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
15
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
16
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
17
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
18
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
19
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, न्याय विभागाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
20
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईलधारकांनी ‘लोटा’ सोडावा

By admin | Updated: March 15, 2017 00:21 IST

शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे.

सुधाकर आडे : देव्हाडी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी साधला संवादभंडारा : शहर ते ग्रामीण भागात नागरिकांनी मोबाईलचा वापर करून जगाला हातात धरले आहे. त्याद्वारे दैनंदिन व्यवहारात मोबाईलचे महत्त्व वाढले आहे. परंतु त्याच हातात ग्रामीण भागात उघडयावर शौचास जाण्यासाठी टमरेलचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल पकडणाऱ्या हाताला टमरेलमुक्त करण्यासाठी स्थानिक पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे यांनी केले. तुमसर तालुक्यातील देव्हाडी ग्रामपंचायत येथे हागणदारीमुक्त गाव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सरपंच रिता मसरके, ग्राम विकास अधिकारी व्ही. बी. बावनकुळे, उपसरपंच विरेंद्र दमाहे, सदस्य सुधीर मसरके, संजय बिरनवारे, मुकेश मुटकूरे, रंजना नागपूरे, आशा दमाहे, इंदू लिल्हारे, विस्तार अधिकारी घटारे, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभने, माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश येरणे, गट समन्वयक पल्लवी तिडके, रोजगारसेवक किरण दमाहे, आशा सेविका लिना बघोले, आॅपरेटर सुनिल लिल्हारे ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.यावेळी आडे यांनी, तालुक्यात इतर गावांपेक्षा देव्हाडीची आदर्श म्हणून वेगळी ओळख निर्माण करायची आहे. त्याकरिता विचारसरणी स्विकारावी लागेल. मोबाईलच्या द्वारे जगाला हातात धरण्याची क्षमता ज्या नागरिकांच्या हातात आहे, त्याच हातात टमरेल दिसून येणे हे मानवांसाठी दुर्देवाची बाब आहे. गावातील उघड्या हागणदारीचे चित्र नाहिसे करणे स्थानिक पदाधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. जिवनात एखाद्या शब्दानेही बदल घडविता येते परंतु तो शब्द मानवांच्या अंतकरणाला भिडला पाहिजे. त्याकरिता सामजिक दबाव महत्वाचा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेला समाज जिवन घडविण्याचे अधिकार बहाल करण्यात आले आहेत. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून ते घडविता येवू शकते. नागरिकांना मुलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कुटुंबाशी जुळावे लागेल. संवाद साधून संधीचे सोने करावे लागेल असे सांगितले व २० मार्च २०१७ पर्यंत वॉर्ड व गाव हागणदारीमुक्त करण्याचे आवाहन केले. सर्वप्रथम गावाबाबतची शौचालय बांधकामाची स्थिती जाणून घेतली व सदस्य, वॉर्ड, दिवस निहाय नियोजन करून ग्रामपंचायत सदस्यांनी अंमलबजावणी करावी व उघड्या हागणदारीचे समुह उच्चाटन करावे, असे सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी विविध प्रश्न विचारुन शंकांचे निरसन केले. हागणदारीमुक्त गाव करून तुमसर तालुक्यात देव्हाडीची वेगळी ओळख निर्माण करण्याचे अभिवचन यावेळी उपस्थितांनी दिले. (शहर प्रतिनिधी)