शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गावात येणाऱ्या आमदार, खासदार निधीला विरोध करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:47 IST

चुल्हाड (सिहोरा) : कार्यकर्त्यांना आमदार, खासदार यांच्या स्थानिक निधीअंतर्गत कामे वाटप करण्यात येत आहेत. गावात अनुशेष नसतानाही खैरात वाटली ...

चुल्हाड (सिहोरा) : कार्यकर्त्यांना आमदार, खासदार यांच्या स्थानिक निधीअंतर्गत कामे वाटप करण्यात येत आहेत. गावात अनुशेष नसतानाही खैरात वाटली जात आहे. त्यांच्या स्थानिक निधीतून गोडाऊन बांधकाम मंजूर करण्यात येत नाही. यामुळे धानाची साठवणूक करण्यासाठी शाळा घेण्याची नामुष्की आली आहे. गावात आता फक्त गोडाऊन मंजुरीकरिता स्वाक्षरी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष मोतीलाल ठवकर यांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

गावात या कामाची ओरड नाही. अनुशेष नसतानाही हीच कामे वाटप करण्यात येत असल्याने गावकुशीबाहेर निधी खर्च करण्यात येत आहे. निधी खर्चकरिता लोकेशन शोधले जात आहे. गावात आमदार, खासदारांचे स्थानिक विकास निधीअंतर्गत गोडाऊन मंजूर करण्यात येत नाही. प्रत्येक गावात १० लाखांचे गोडाऊन बांधकाम मंजूर झाल्यास गावांतील शेतकऱ्यांची समस्या निकाली काढली जाऊ शकतो; परंतु या दिशेने प्रयत्न होत नाहीत. गोडाऊन नसल्याने धानाची साठवणूक करण्यासाठी जावई शोध लावले जात आहे. शिक्षणाचे मंदिर ठरणाऱ्या शाळा गोडाऊन म्हणून उपयोगात आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. शाळेत धानाची साठवणूक केल्यास उंदीर आणि घूस भिंती पोखरून काढण्याची भीती पालकांना आहे. याशिवाय अध्यापन कार्यासाठी भीती रंगविल्या असल्याने नुकसान होण्याची भीती पालकांना आहे. शाळेत विद्यार्थी शोभून दिसतात, धान नाही. यामुळे पालक नाराज आहेत.

बॉक्स

समाजमंदिर पोती सुरक्षित ठेवण्यास असमर्थ

गावात ३ लक्ष रुपये खर्चून समाजमंदिर बांधकाम करण्यात आले आहे. गावात शेतकऱ्यांची संख्या मोठी असून धानाचे उत्पादन अधिक होत आहे. धानाची पोती सुरक्षित ठेवण्यासाठी समाजमंदिर अपुरे ठरत आहेत. यामुळे धान खरेदी प्रक्रिया प्रभावित होत आहे. उन्हाळी धानाची खरेदी पावसाळ्यात होत आहे. खरीप हंगामातील धानाच्या पोत्यांना अवकाळी पाऊस झोडपत आहे. दोन्ही बाजूंनी नुकसान शासनाच्या तिजोरीचे होत आहे.

बॉक्स

दोन विभागांची वाताहत

ग्रामीण भागात जनतेची कामे करणारे दोन विभाग उपेक्षित आहेत. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे असे हे विभाग आहेत. विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था व तलाठी कार्यालय या कार्यालयांना इमारत नाही. जागा आहे, पण निधी देणारे नाहीत. १० बाय २० च्या इमारत बांधकामासाठी निधी नसल्याने प्रशासकीय कामकाज करताना वाताहत होत आहे. यात शेतकऱ्यांचे महत्त्वपूर्ण दस्तऐवज असुरक्षित राहत आहेत.