शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

अल्पवयीन मुलांचा पळून जाण्याचा बेत फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:50 IST

नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले.

ठळक मुद्देभुरळ मायानगरीची : रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने मुलं सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. मुंबईत जाऊन मोठे होण्याच्या बालिश प्रकार रेल्वे पोलिसांच्या चौकस नजरेने हेरले व त्याच्या चौकशी दरम्यान त्यांचे बिंग फुटले. पुन: एकदा रेल्वे सुरक्षा दलाला घरून पळून जाणाऱ्या मुलांना वाचवण्यात यश आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने दोन्ही मुलांचे आयुष्य वाचले.कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी येथील सक्षम नामदेव मोहरकर व समीर रामेश्वर मारवाडे हे गावातील बुटी विद्यालयात ९ व्या वर्गात शिकतात. नियमित शाळेत जाणे व अभ्यासासाठी पालकांनी तगादा लावल्याने त्रस्त झाले. शाळेतही खूप काही अभ्यासात जमत नसल्याने शाळेत त्यांचा मन रमत नव्हते. दोन्ही मित्र असल्याने त्यांनी घरून पळून जाण्याचा बेत आखला. यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. मायानगरीचे आकर्षणाने ते ग्रासले होते. टीव्ही च्या माध्यमातून त्यांना मायानगरीची ओढ निर्माण झाली. मुंबईसारख्या शहरात जाऊन सहज मोठा होता येते हि समज ठेवून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी तयारी केली.मुंबईला जाण्यासाठी लागणारे पैसे गोळा झाल्यावर त्यांनी शाळेतून पळ काढला. शाळेच्या कपड्यावर गावापासून भंडारा रोड रेल्वे स्टेशन असा प्रवास आॅटो रिक्षाने केले. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकस नजरेत पडले. शाळेचा ड्रेस आणि सोबत कुणीही सोबती नसल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबद पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना तत्काळ माहिती दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक विनेक मेश्राम यांनी मुलांना चौकशी करिता ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करताना सदर बालके घरून पळून आल्याचे निदर्शनास आले.दरम्यान पोलिसांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोकुन धरले. याबाबद खमारीच्या मुख्याध्यापकाशी संपर्क करून पालकांना कळवण्यात आले. मूल घरून पळून घेल्याचे धक्याने पालकांनी तत्काळ भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. दरम्यान मुलाची ओळख पटल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पालकाच्या स्वाधीन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. एच. शेंडे., पोलीसउपनिरीक्षक जय सिंग, भूपेश देशमुख व पंकज कुमार उपस्थित होते.