शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
2
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
3
Mumbai: भारत- पाकिस्तान युद्धात घाटकोपरमधील जवान शहीद
4
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
5
पाकिस्तानला आणखी एक धक्का; सिंधू कराराबाबत जागतिक बँकेने घेतली भारताची बाजू...
6
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
7
मत्स्यव्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून होणार अंमलबजावणी
8
"राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आले तर आक्षेप नाही; काँग्रेसची भूमिका भारत जोडोची’’, हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया
9
भारताने केलेला ड्रोन हल्ला का रोखला नाही? पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचं संसदेत अजब उत्तर, म्हणाले...  
10
Jalgaon Accident: भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; आजी- आजोबांच्या डोळ्यांदेखत दोन नातवंडांचा मृत्यू
11
अक्षय केळकरनं १० वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 'रमा'सोबत थाटला संसार, पहिला फोटो आला समोर
12
भारत-पाक संघर्षादरम्यान 'या' ड्रोन उत्पादक कंपनीच्या शेअर्सला अपर सर्कीट; तुमच्याकडे आहे का?
13
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
14
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
15
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
16
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
17
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीतील हिस्सा खरेदी करणार
18
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
19
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
20
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!

अल्पवयीन मुलांचा पळून जाण्याचा बेत फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:50 IST

नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले.

ठळक मुद्देभुरळ मायानगरीची : रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने मुलं सुखरूप

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. मुंबईत जाऊन मोठे होण्याच्या बालिश प्रकार रेल्वे पोलिसांच्या चौकस नजरेने हेरले व त्याच्या चौकशी दरम्यान त्यांचे बिंग फुटले. पुन: एकदा रेल्वे सुरक्षा दलाला घरून पळून जाणाऱ्या मुलांना वाचवण्यात यश आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने दोन्ही मुलांचे आयुष्य वाचले.कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी येथील सक्षम नामदेव मोहरकर व समीर रामेश्वर मारवाडे हे गावातील बुटी विद्यालयात ९ व्या वर्गात शिकतात. नियमित शाळेत जाणे व अभ्यासासाठी पालकांनी तगादा लावल्याने त्रस्त झाले. शाळेतही खूप काही अभ्यासात जमत नसल्याने शाळेत त्यांचा मन रमत नव्हते. दोन्ही मित्र असल्याने त्यांनी घरून पळून जाण्याचा बेत आखला. यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. मायानगरीचे आकर्षणाने ते ग्रासले होते. टीव्ही च्या माध्यमातून त्यांना मायानगरीची ओढ निर्माण झाली. मुंबईसारख्या शहरात जाऊन सहज मोठा होता येते हि समज ठेवून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी तयारी केली.मुंबईला जाण्यासाठी लागणारे पैसे गोळा झाल्यावर त्यांनी शाळेतून पळ काढला. शाळेच्या कपड्यावर गावापासून भंडारा रोड रेल्वे स्टेशन असा प्रवास आॅटो रिक्षाने केले. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकस नजरेत पडले. शाळेचा ड्रेस आणि सोबत कुणीही सोबती नसल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबद पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना तत्काळ माहिती दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक विनेक मेश्राम यांनी मुलांना चौकशी करिता ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करताना सदर बालके घरून पळून आल्याचे निदर्शनास आले.दरम्यान पोलिसांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोकुन धरले. याबाबद खमारीच्या मुख्याध्यापकाशी संपर्क करून पालकांना कळवण्यात आले. मूल घरून पळून घेल्याचे धक्याने पालकांनी तत्काळ भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. दरम्यान मुलाची ओळख पटल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पालकाच्या स्वाधीन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. एच. शेंडे., पोलीसउपनिरीक्षक जय सिंग, भूपेश देशमुख व पंकज कुमार उपस्थित होते.