लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. मुंबईत जाऊन मोठे होण्याच्या बालिश प्रकार रेल्वे पोलिसांच्या चौकस नजरेने हेरले व त्याच्या चौकशी दरम्यान त्यांचे बिंग फुटले. पुन: एकदा रेल्वे सुरक्षा दलाला घरून पळून जाणाऱ्या मुलांना वाचवण्यात यश आले. रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने दोन्ही मुलांचे आयुष्य वाचले.कारधा पोलीस स्टेशन हद्दीतील खमारी येथील सक्षम नामदेव मोहरकर व समीर रामेश्वर मारवाडे हे गावातील बुटी विद्यालयात ९ व्या वर्गात शिकतात. नियमित शाळेत जाणे व अभ्यासासाठी पालकांनी तगादा लावल्याने त्रस्त झाले. शाळेतही खूप काही अभ्यासात जमत नसल्याने शाळेत त्यांचा मन रमत नव्हते. दोन्ही मित्र असल्याने त्यांनी घरून पळून जाण्याचा बेत आखला. यासाठी त्यांनी मुंबईला जाण्याचे ठरवले. मायानगरीचे आकर्षणाने ते ग्रासले होते. टीव्ही च्या माध्यमातून त्यांना मायानगरीची ओढ निर्माण झाली. मुंबईसारख्या शहरात जाऊन सहज मोठा होता येते हि समज ठेवून मुंबईला जाण्यासाठी त्यांनी तयारी केली.मुंबईला जाण्यासाठी लागणारे पैसे गोळा झाल्यावर त्यांनी शाळेतून पळ काढला. शाळेच्या कपड्यावर गावापासून भंडारा रोड रेल्वे स्टेशन असा प्रवास आॅटो रिक्षाने केले. मुंबईला जाण्यासाठी रेल्वे स्थानकावर प्रतीक्षा करीत असताना रेल्वे सुरक्षा दलाच्या चौकस नजरेत पडले. शाळेचा ड्रेस आणि सोबत कुणीही सोबती नसल्याचे लक्षात येताच सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबद पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांना तत्काळ माहिती दिली. यावरून पोलीस उपनिरीक्षक विनेक मेश्राम यांनी मुलांना चौकशी करिता ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस करताना सदर बालके घरून पळून आल्याचे निदर्शनास आले.दरम्यान पोलिसांनी त्यांना मुंबईला जाण्यापासून रोकुन धरले. याबाबद खमारीच्या मुख्याध्यापकाशी संपर्क करून पालकांना कळवण्यात आले. मूल घरून पळून घेल्याचे धक्याने पालकांनी तत्काळ भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले. दरम्यान मुलाची ओळख पटल्यावर रेल्वे सुरक्षा दलाने त्यांना पालकाच्या स्वाधीन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक बी. एच. शेंडे., पोलीसउपनिरीक्षक जय सिंग, भूपेश देशमुख व पंकज कुमार उपस्थित होते.
अल्पवयीन मुलांचा पळून जाण्याचा बेत फसला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:50 IST
नियमित शाळा व पालकांचा अभ्यासा करिता तगादा यामुळे त्रस्त दोन बालकांनी मुंबईच्या मायानगरीत मोठे होण्याचे स्वप्न रंगवले. त्रासाला कंटाळून कसेबसे पैसे जमवून शाळेतून मायानगरी गाठण्यासाठी भंडारा रोड रेल्वे स्टेशन गाठले.
अल्पवयीन मुलांचा पळून जाण्याचा बेत फसला
ठळक मुद्देभुरळ मायानगरीची : रेल्वे सुरक्षा दलाच्या सतर्कतेने मुलं सुखरूप