शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

भंडारा : केंद्र व राज्य शासनामार्फत रिक्त जागा भरण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक तरुणांनी ऑनलाइन अर्जही ...

भंडारा : केंद्र व राज्य शासनामार्फत रिक्त जागा भरण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक तरुणांनी ऑनलाइन अर्जही दाखल केले आहेत. मात्र नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांना लक्षावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार आता समोर येत आहे. उल्लेखनीय म्हणजे आता फसवणूक झाली असतानाही अनेक तरुण व तरुणी भीतीपोटी पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्यास घाबरत आहेत.

विद्यमान परिस्थितीत पोस्ट ऑफिस कार्यालय तथा रेल्वे खात्यात या बऱ्याच जागा भरण्यासंदर्भात शासनाने जाहिरात प्रकाशित केली होती. तसेच अन्य विभागातील विविध पदे रिक्त असल्याची माहितीही दलालांमार्फत दिली जात असते. त्याअनुषंगाने अनेक बेरोजगार तरुण-तरुणींनी यासंदर्भात आवेदन (अर्ज) सादर केले आहेत. मात्र ही जागा भरण्यासंदर्भात अनेक दलालही सक्रिय झाले आहेत. भंडारा शहरासह तालुका मुख्यालयात अशा अनेक दलालांनी आपले साम्राज्य पसरविले आहे. भंडारा शहरासह लाखनी, साकोली, पवनी व लाखांदूर तालुक्यात हे दलाल सक्रिय आहेत. उल्लेखनीय म्हणजे यात एक महिलाही मास्टरमाईंडचे काम करीत आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुण-तरुणींकडून ५० हजार ते पंधरा लाखांपर्यंत रक्कम उकळल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस व रेल्वे खात्यात उच्चपदस्थ अधिकारी आमच्या इशाऱ्यावर काम करतात, असे प्रत्यक्ष सांगून या तरुणांना मोहित केले जाते. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यामार्फत लक्षावधी रुपये गोळा करण्यात आले आहेत. आता त्यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात येत आहे, त्यामुळे सदर तरुण-तरुणी पैसे परत हवेत यासाठी संबंधित दलालांकडे तगादा लावीत आहेत.

बॉक्स

फोन करून मागविली जातात कागदपत्रे

‘तुम्ही फक्त कागदपत्रे द्या, बाकीचं आम्ही बघून घेतो’, असे दलाल सर्रासपणे बेरोजगार तरुण किंवा तरुणींना सांगतात. त्यांच्या आमिषाला बळी पडून सदर बेरोजगार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दलालांकडे देतात. मात्र १५ ते २० दिवस लोटल्यावर व पैसे दिल्यावरही नोकरी देण्यासंदर्भात काहीच हालचाल होत नसल्याने, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येत आहे. कागदपत्रे मागताना, तुम्हाला शंभर टक्के नोकरी मिळेल, असे सांगितले जाते. त्याच विश्वासावर बेरोजगार तरुण-तरुणी कागदपत्रे देत असतात. आता तर पैसे परत न करता टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. गतवर्षी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या १८ तक्रारी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १६ तक्रारींचा छडा लावण्यात पोलीस विभागाला यश आले होते.

बॉक्स

सर्वाधिक प्रकार ग्रामीण भागात

जिल्ह्यात पदवीधर शिक्षित बेरोजगारांची मोठी फौज आहे. कुठेही जागा निघाल्यास तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करतात. हीच बाब हेरून अनेक दलाल सक्रिय होत असतात. ग्रामीण भागात याचा सर्वाधिक फायदा उचलला जातो. साध्या-सरळ नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फत हा संदेश व्हॉट्स अप किंवा भ्रमणध्वनीवरून एकमेकांना सांगितला जातो. त्याचआधारे तरुणांना संबंधित घराचा किंवा एखाद्या भाड्याने घेतलेल्या कार्यालयाचा पत्ता देऊन तिथे यायला सांगितले जाते. तिथे पैशाचीही देवाण-घेवाण होते. पत्ता माहीत नसेल तर चक्क चारचाकी वाहनाने उमेदवारांना तिथे नेले जाते. तसेच नोकरी मिळेलच, अशी हमखास ग्वाही देण्यात येते. आता आपल्यालाही नोकरी मिळणार, या आशेपोटी अनेक बेरोजगारांनी लक्षावधी रुपये अशा दलालांना दिले आहेत.