शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
2
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
3
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
4
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
5
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
6
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
8
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
9
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
10
'ठरलं तर मग'मध्ये पूर्णा आजींच्या भूमिकेत कोण दिसणार? सुचित्रा बांदेकर म्हणाल्या, "आम्हाला..."
11
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
12
शेवटच्या श्रावण गुरुवारी गुरुपुष्यामृत योग २०२५: सोने खरेदीसाठी शुभ वेळ काय? पाहा, मान्यता
13
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
14
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
15
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
16
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
17
Mumbai Rains: मुंबईत अतिवृष्टीचा धोका; पालकमंत्री लोढांकडून आपत्ती विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश
18
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
19
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
20
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा

नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:43 IST

भंडारा : केंद्र व राज्य शासनामार्फत रिक्त जागा भरण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक तरुणांनी ऑनलाइन अर्जही ...

भंडारा : केंद्र व राज्य शासनामार्फत रिक्त जागा भरण्यासंदर्भात सूचना जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत अनेक तरुणांनी ऑनलाइन अर्जही दाखल केले आहेत. मात्र नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेक तरुणांना लक्षावधी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार आता समोर येत आहे. उल्लेखनीय म्हणजे आता फसवणूक झाली असतानाही अनेक तरुण व तरुणी भीतीपोटी पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्यास घाबरत आहेत.

विद्यमान परिस्थितीत पोस्ट ऑफिस कार्यालय तथा रेल्वे खात्यात या बऱ्याच जागा भरण्यासंदर्भात शासनाने जाहिरात प्रकाशित केली होती. तसेच अन्य विभागातील विविध पदे रिक्त असल्याची माहितीही दलालांमार्फत दिली जात असते. त्याअनुषंगाने अनेक बेरोजगार तरुण-तरुणींनी यासंदर्भात आवेदन (अर्ज) सादर केले आहेत. मात्र ही जागा भरण्यासंदर्भात अनेक दलालही सक्रिय झाले आहेत. भंडारा शहरासह तालुका मुख्यालयात अशा अनेक दलालांनी आपले साम्राज्य पसरविले आहे. भंडारा शहरासह लाखनी, साकोली, पवनी व लाखांदूर तालुक्यात हे दलाल सक्रिय आहेत. उल्लेखनीय म्हणजे यात एक महिलाही मास्टरमाईंडचे काम करीत आहे. नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तरुण-तरुणींकडून ५० हजार ते पंधरा लाखांपर्यंत रक्कम उकळल्याची विश्‍वसनीय माहिती आहे. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिस व रेल्वे खात्यात उच्चपदस्थ अधिकारी आमच्या इशाऱ्यावर काम करतात, असे प्रत्यक्ष सांगून या तरुणांना मोहित केले जाते. त्यांचा विश्वास संपादन करून त्यांच्यामार्फत लक्षावधी रुपये गोळा करण्यात आले आहेत. आता त्यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात येत आहे, त्यामुळे सदर तरुण-तरुणी पैसे परत हवेत यासाठी संबंधित दलालांकडे तगादा लावीत आहेत.

बॉक्स

फोन करून मागविली जातात कागदपत्रे

‘तुम्ही फक्त कागदपत्रे द्या, बाकीचं आम्ही बघून घेतो’, असे दलाल सर्रासपणे बेरोजगार तरुण किंवा तरुणींना सांगतात. त्यांच्या आमिषाला बळी पडून सदर बेरोजगार कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दलालांकडे देतात. मात्र १५ ते २० दिवस लोटल्यावर व पैसे दिल्यावरही नोकरी देण्यासंदर्भात काहीच हालचाल होत नसल्याने, हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येत आहे. कागदपत्रे मागताना, तुम्हाला शंभर टक्के नोकरी मिळेल, असे सांगितले जाते. त्याच विश्वासावर बेरोजगार तरुण-तरुणी कागदपत्रे देत असतात. आता तर पैसे परत न करता टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात आहेत. गतवर्षी अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या १८ तक्रारी जिल्हा पोलीस प्रशासनाकडे दाखल झाल्या होत्या. त्यापैकी १६ तक्रारींचा छडा लावण्यात पोलीस विभागाला यश आले होते.

बॉक्स

सर्वाधिक प्रकार ग्रामीण भागात

जिल्ह्यात पदवीधर शिक्षित बेरोजगारांची मोठी फौज आहे. कुठेही जागा निघाल्यास तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात अर्ज सादर करतात. हीच बाब हेरून अनेक दलाल सक्रिय होत असतात. ग्रामीण भागात याचा सर्वाधिक फायदा उचलला जातो. साध्या-सरळ नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्यामार्फत हा संदेश व्हॉट्स अप किंवा भ्रमणध्वनीवरून एकमेकांना सांगितला जातो. त्याचआधारे तरुणांना संबंधित घराचा किंवा एखाद्या भाड्याने घेतलेल्या कार्यालयाचा पत्ता देऊन तिथे यायला सांगितले जाते. तिथे पैशाचीही देवाण-घेवाण होते. पत्ता माहीत नसेल तर चक्क चारचाकी वाहनाने उमेदवारांना तिथे नेले जाते. तसेच नोकरी मिळेलच, अशी हमखास ग्वाही देण्यात येते. आता आपल्यालाही नोकरी मिळणार, या आशेपोटी अनेक बेरोजगारांनी लक्षावधी रुपये अशा दलालांना दिले आहेत.