शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी अळींचे आक्रमण; धानपीक धोक्यात

By admin | Updated: August 21, 2016 00:24 IST

पावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे व हवामानातील बदलाने धान पिकावर लष्करी अळीचे जोरदार आक्रमण केले आहे.

मंडळ कृषी अधिकाऱ्यांची शिवारफेरी : अळीच्या नियंत्रणाकरिता मार्गदर्शन, निंबोळी अर्काचे वाटपमुखरु बागडे पालांदूरपावसाच्या दीर्घ विश्रांतीमुळे व हवामानातील बदलाने धान पिकावर लष्करी अळीचे जोरदार आक्रमण केले आहे. यामुळे धानपिक संकटात सापडले आहे. शेतकरी घाबरला असून त्यांच्या मदतीकरिता मंडळ कृषी कार्यालयाची चमू थेट बांधावर फेरी घालत अळींच्या नियंत्रणाकरिता मार्गदर्शन करीत आहे.ग्रामपंचायत व बैठकीच्या ठिकाणी चर्चासत्राचे नियोजन सुरू झाले आहे. शेतकऱ्यांनी न घाबरता अळींच्या नियंत्रणाचे आवाहन प्रभारी मंडळ कृषी अधिकारी अनिल शहारे यांनी केले आहे.१५ दिवसांपासून पाऊस बेपत्ता असून तापमानात वाढ झाली आहे. यामुळे हवामानात बदल येऊन लष्करी अळी, खोडकिडी, गादमाशीला पोषक वातावरण तयार झाल्याने अळींचे वाढतच चालले आहे. ज्या भागात रोवणी उशिरा झाली. पाऊस कमी पडता किंवा बांध्यात पाणी नसल्या ठिकाणी अळीने आक्रमण करुन धानपिक नष्ट केले आहे. शिवारफेरीत नुकसानग्रस्त शेतकरी जगदीश हटवार यांच्या शेतात लष्करी अळीचे जोरदार आक्रमण आढळले. पाणी नसल्याने समस्या आणखी वाढली. कृषी पर्यवेक्षक अरुण रामटेके, कृषी सहायक श्रीकांत सपाटे, भगीरथ सपाटे, परसराम भुते, नंदनवार यांनी अभ्यास केला. अळी नियंत्रणाकरिता डायक्लोरोव्हास ७६ ईसी १० लीटर पाण्यात १२.५ मि.मी. किंवा क्लोरोफारॉफॉस यांचे मिश्रण २५ एमएल १० लीटर पाण्यात म्हणजे १५ लिटर पाण्यात ३५ मिली औषधाची मात्रा स्वच्छ पाण्यातून फवारणी करावी. बांध्या स्वच्छ ठेवावे, पिकांवर नियंत्रित लक्ष ठेवून मंडळ कृषी कार्यालयाला भेट देत समस्यांशी निगडीत चर्चा करण्याचे आवाहन केले महागाईचा सामना करताना शेतकरी कमी पडत आहे. कृषी केंद्रातून किटकनाशक खरेदी करताना मोठी रक्कम मोजावी लागते. नेमक्या औषधींने किड नियंत्रणात येताना दिसत नाही. एका सोबत २ ते ३ औषधांचे मिश्रण फवारावे लागते. तेव्हा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानावर मोफत किटकनाशक उपलब्ध करून देण्याची व्यवस्था त्वरीत करावी.- जगदीश हटवार, नुकसानग्रस्त शेतकरी, पालांदूर.