शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:47 IST

जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे.

ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : भंडारा जिल्ह्याला २० लाखाचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या पावसाळयात भंडारा जिल्ह्यात २० लाख १९ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व विभागांनी वृक्ष लागवड मोहीमेचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहीमेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, पोलीस उपअधीक्षक सुनिल कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी सूर्यवंशी म्हणाले, वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन करून येत्या तीन दिवसात वनविभागाला अहवाल पाठविण्यात यावा. १२ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. यंत्रणांनी वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित कराव्यात. खड्डे खोदण्याचे नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत यांनी मोकळया जागा शोधून त्याठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून लोकांचा सुध्दा आहे. वृक्ष लागवड मोहिमेत सामाजिक संस्थांना सहभागी करावे. मोठया प्रमाणात लोकसहभाग घ्यावा. वृक्ष लावणे सोपे काम असून वृक्षसंवर्धन कठीण काम आहे. वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संगोपनासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. संगोपनासाठी वृक्ष दत्तक योजना राबविल्यास फायदेशिर ठरेल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.मागीलवर्षी जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून १३ लाख ३२ हजार वृक्ष लागवड केली होती. मागील वर्षी ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत जगलेल्या रोपांचा अहवाल तातडीने वन विभागाला पाठविण्याच्या सूचना सुर्यवंशी यांनी केल्या. वृक्ष लागवड मोहीम ही औपचारिकता नसून भविष्याची गरज असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. आपल्या पिढीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड मोहिम गांभिर्याने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विविध विभागानी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.असे आहे लागवडीचे उद्दिष्टभंडारा जिल्ह्याला यावर्षी शासनाने २० लाख १९ हजार १४० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात वनविभाग ९ लाख ३० हजार, सामाजिक वनीकरण ५ लाख, जिल्हा परिषद ग्रामपंचायत ५ लाख ८९ हजार १४० व इतर शासकीय विभागांना १ लाख ९७ हजार १६० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.