शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

वृक्ष लागवड मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:47 IST

जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे.

ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : भंडारा जिल्ह्याला २० लाखाचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या पावसाळयात भंडारा जिल्ह्यात २० लाख १९ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व विभागांनी वृक्ष लागवड मोहीमेचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहीमेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, पोलीस उपअधीक्षक सुनिल कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी सूर्यवंशी म्हणाले, वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन करून येत्या तीन दिवसात वनविभागाला अहवाल पाठविण्यात यावा. १२ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. यंत्रणांनी वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित कराव्यात. खड्डे खोदण्याचे नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत यांनी मोकळया जागा शोधून त्याठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून लोकांचा सुध्दा आहे. वृक्ष लागवड मोहिमेत सामाजिक संस्थांना सहभागी करावे. मोठया प्रमाणात लोकसहभाग घ्यावा. वृक्ष लावणे सोपे काम असून वृक्षसंवर्धन कठीण काम आहे. वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संगोपनासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. संगोपनासाठी वृक्ष दत्तक योजना राबविल्यास फायदेशिर ठरेल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.मागीलवर्षी जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून १३ लाख ३२ हजार वृक्ष लागवड केली होती. मागील वर्षी ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत जगलेल्या रोपांचा अहवाल तातडीने वन विभागाला पाठविण्याच्या सूचना सुर्यवंशी यांनी केल्या. वृक्ष लागवड मोहीम ही औपचारिकता नसून भविष्याची गरज असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. आपल्या पिढीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड मोहिम गांभिर्याने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विविध विभागानी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.असे आहे लागवडीचे उद्दिष्टभंडारा जिल्ह्याला यावर्षी शासनाने २० लाख १९ हजार १४० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात वनविभाग ९ लाख ३० हजार, सामाजिक वनीकरण ५ लाख, जिल्हा परिषद ग्रामपंचायत ५ लाख ८९ हजार १४० व इतर शासकीय विभागांना १ लाख ९७ हजार १६० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.