शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

वृक्ष लागवड मोहिमेचे सुक्ष्म नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 23:47 IST

जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे.

ठळक मुद्देमनोजकुमार सूर्यवंशी : भंडारा जिल्ह्याला २० लाखाचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जागतिक तापमानात सातत्याने होणारी वाढ, हवामान आणि ऋुतू बदलाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संतुलन व जैवसृष्टीची स्थिरता ठेवण्यासाठी राज्यातील वनक्षेत्र २० टक्क्यावरून ३३ टक्क्यांपर्यंत नेण्याचा शासनाने संकल्प केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यात ५० कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.या पावसाळयात भंडारा जिल्ह्यात २० लाख १९ हजार वृक्ष लागवड करण्याचे उद्दिष्ट आहे. यासाठी सर्व विभागांनी वृक्ष लागवड मोहीमेचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहीमेचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.यावेळी उपवनसंरक्षक विवेक होशिंग, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश बेंडे, पोलीस उपअधीक्षक सुनिल कुलकर्णी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर आडे, समाज कल्याणच्या सहाय्यक आयुक्त आशा कवाडे यांचेसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी सूर्यवंशी म्हणाले, वृक्ष लागवडीचे सुक्ष्म नियोजन करून येत्या तीन दिवसात वनविभागाला अहवाल पाठविण्यात यावा. १२ एप्रिल रोजी विभागीय आयुक्त या मोहिमेचा आढावा घेणार आहेत. यंत्रणांनी वृक्ष लागवडीसाठी जागा निश्चित कराव्यात. खड्डे खोदण्याचे नियोजन करण्यात यावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीसाठी नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी दिले आहेत.जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत यांनी मोकळया जागा शोधून त्याठिकाणी वृक्ष लागवडीचे नियोजन करावे. हा केवळ शासनाचा कार्यक्रम नसून लोकांचा सुध्दा आहे. वृक्ष लागवड मोहिमेत सामाजिक संस्थांना सहभागी करावे. मोठया प्रमाणात लोकसहभाग घ्यावा. वृक्ष लावणे सोपे काम असून वृक्षसंवर्धन कठीण काम आहे. वृक्ष लागवडीसोबत वृक्ष संगोपनासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. संगोपनासाठी वृक्ष दत्तक योजना राबविल्यास फायदेशिर ठरेल, असे सूर्यवंशी यांनी सांगितले.मागीलवर्षी जिल्ह्यात सर्व विभागांनी मिळून १३ लाख ३२ हजार वृक्ष लागवड केली होती. मागील वर्षी ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत जगलेल्या रोपांचा अहवाल तातडीने वन विभागाला पाठविण्याच्या सूचना सुर्यवंशी यांनी केल्या. वृक्ष लागवड मोहीम ही औपचारिकता नसून भविष्याची गरज असल्याचे सुर्यवंशी यांनी सांगितले. आपल्या पिढीसाठी व पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड मोहिम गांभिर्याने राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी विविध विभागानी केलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यात आला.असे आहे लागवडीचे उद्दिष्टभंडारा जिल्ह्याला यावर्षी शासनाने २० लाख १९ हजार १४० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे. यात वनविभाग ९ लाख ३० हजार, सामाजिक वनीकरण ५ लाख, जिल्हा परिषद ग्रामपंचायत ५ लाख ८९ हजार १४० व इतर शासकीय विभागांना १ लाख ९७ हजार १६० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट दिले आहे.