शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

भर पावसात मेरिट बचाव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:14 IST

राज्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले प्रत्येक जण छत्र्या घेऊन होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन कृती समितीचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील ज्वलंत समस्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी येथील सेव्ह मेरिट सेव्ह नेशनच्या वतीने येथील त्रिमूर्ती चौकात भर पावसात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी झालेले प्रत्येक जण छत्र्या घेऊन होते. आंदोलनकर्त्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.सार्वसामान्य वर्गातील नागरिकांसाठी तसेच विविध सामाजिक संस्थांच्या समर्थनार्थ हे आंदोलन करण्यात आले. सर्वौच्च न्यायालयाने १९९२ च्या नयना सहानी प्रकरणात शिक्षण तसेच नोकरीत ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता आणि ५० टक्के वाटा मेरिट, पात्रता, प्रतिभावान विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आला होता. यामागे देशाचा विकास व्हावा हा हेतू होता. महाराष्ट्र शासनाने सर्वसामान्य वर्ग तसेच मेरिट करीत ४८ टक्के पदांमध्ये तूट करून आरक्षण घोषित केले. यामुळे राज्यातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना डावलण्याचा प्रयत्न आहे. यामुळे तरुण मुले मुली नैराश्याच्या छायेत जात आहेत, असे जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.सेव्ह मेरिट, सेव्ह नेशनचा लढा जाती किंवा आरक्षणाविरुद्ध नसून देशात योग्यतेचे महत्व वाचविले पाहिजे यासाठी आहे. या मोहिमेंतर्गत भंडारातील सर्व खुल्या प्रवर्गातील लोकांनी येथील त्रिमूर्ती चौकात एकत्र येऊन अतिरिक्त जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. या भर पावसात या आंदोलनात नागरिक छत्र्या घेऊन सहभागी झाले होते. महिलांची यात लक्षणीय उपस्थिती दिसत होती. तुमसर तालुक्यातील नागरिकही या आंदोलनात सहभागी झाले होते.या आंदोलनाला नागपूर येथील विनोद फाफट, नवीन चांडक, डॉ.अर्चना कोठारी यांनी मार्गदर्शन केले. सेव्ह मेरिट, सेव्ह नेशन भंडारा जिल्हा कृती समितीतर्फे डॉ.गोपाल व्यास, किरिट पटेल, डॉ.मोनिका बत्रा, रामविलास सारडा, जयेश संघानी, दिशा अग्रवाल, तुलसी सारडा, शैला शर्मा, पंकज मुंदडा आदी सहभागी झाले होते.सिंधी समाज, पंजाबी समाज, गुजराती समाज, मारवाडी समाज, ब्राम्हण समाज, माहेश्वरी युवा संघटनेचे विविध पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. भर पावसात झालेल्या या आंदोलनाने भंडाराकरांचे लक्ष वेधून घेतले होते.