शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

पारा ४१.५ अंशावर

By admin | Updated: March 26, 2017 00:20 IST

वातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे.

उन्हाची दाहकता : रस्त्यावर सामसूम देवानंद नंदेशवर भंडारावातावरणातील गारवा कमी होताच उन्हाचा तडाखा सुरु झाला असून मार्च महिन्याच्या मध्यवर्ती उन्हाचा जोर वाढला आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. पारा ४१.५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे वातावरणात मोठा उष्मा वाढला आहे. दर वर्षी उन्हाची दाहकता वाढत असते. यंदा मात्र दरवर्षीच्या तुलनेत सूर्य जास्तच तापत असल्याने मार्च महिना संपण्याअगोदरच अंगाची लाही लाही होऊ लागली आहे,वाढत्या उन्हामुळे बाजारपेठ, शेतीतील कामे, नागरिकांचे फिरणे या दैनंदिन कामावर परिणाम झाला आहे, वाढत्या उन्हापासून संरक्षण करण्यासाठी वापरल्या जाणारे टोपी,सनकोटची खरेदी वाढली आहे. नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. शीतपेयाची दुकाने गजबजू लागली आहे, थंड पाणी आणि उसाचा रस, कोल्ड्रींग्स, आईस्क्रीम यांची मागणी वाढली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील मुख्य रस्त्यावर रसवंती गृह भर दुपारी गजबजू लागली आहे, रसवंती गृहाच्या ठिकाणी बांधलेल्या घुंगरांचा मंजुळ आवाज परिसरात वातावरण निर्मिती करत आहे. आणि हा मंजुळ आवाज वाटसरूंना उसाच्या रसाची आठवण करून देत आहे. एकंदरीतच वाढत्या उन्हाने माणसाच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला असून वेगवेगळ्या मागार्चा अवलंब करून उन्हापासून बचाव करण्यासाठी परिसरात प्रयत्न सुरु झाल्याचे चित्र दिसत आहे. २४ मार्च रोजी पारा ४१ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आले. आज २५ रोजी कमाल तापमान ४१.५ व किमान तापमान २८ अंश सेल्सीअस नोंदविण्यात आली. मार्च महिन्याच्या तीसऱ्या आठवड्यापासून उष्णतेत वाढ झाली असून येत्या एप्रिल व मे महिन्यामध्ये ही वाढ अधिक होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.