भंडारा : येथील स्वाभिमानी शेतकरी संघटना स्थानिक विश्राम भवन येथे सभा घेण्यात आली. त्याध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा विदर्भ अध्यक्ष देवेंंद्र भुयार व संदीप खडसे नगरसेवक, उमेश डबरासे भंडारा जिल्ह्यामध्ये संघटन मजबुत करण्याकरिता आले असता त्यांनी आपल्या संघटेनची भूमिका मांडली. लोकसभेच्या निवडणुकीपुर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजु शेट्टी यांनी भाजपाच्या नेत्याशी चर्चा करताना स्वामिनाथन आयोग तसेच राष्ट्रीय दुष्काळ निवारण आयोग लागू करण्याची अट घातली होती.सदर आयोग लागू करण्याचे आश्वासन दिल्यानंतरच भाजपशी युती केली होती. हे दोन आयोग लागू करण्याकरिता आमचे प्रयत्न सुरू आहेत आम्ही भावनेच्या नाही तर शेतकऱ्यांच्या अर्थकरणावर युती केला असून सामान्य नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असे देवेंद्र भुयार यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्विकरिता सचिन एस. मेश्राम, राकेश चोपकर, नितीन बेदरकर, प्रविण मेहर, राकेश बागडे, प्रमोद कावळे व जाहिद शेख यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सभा
By admin | Updated: September 3, 2016 00:25 IST