शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समितीची सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:29 IST

भंडारा : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला योग्य न्याय मिळावा तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व गुणवत्ता विकास व्हावा, ...

भंडारा : शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक घटकाला योग्य न्याय मिळावा तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक, सामाजिक व गुणवत्ता विकास व्हावा, या उदात्त हेतूने भंडारा जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या १६ संघटनांनी एकत्रित येत ‘भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समिती’चे गठन केले आहे.

शिक्षण क्षेत्रात काम करीत असताना विविध समस्या उद्भवत असतात. त्यातच शिक्षक/कर्मचारी यांच्यावर होणारे अन्याय दूर करण्याकरिता समन्वय समिती कटिबद्ध असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलताना डॉ. उल्हास फडके यांनी व्यक्त केले. भंडारा जिल्हा शालेय शिक्षण कर्मचारी समन्वय समितीची सभा नूतन महाराष्ट्र विद्यालय भंडारा येथे आयोजित करण्यात आली होती. सदर सभेत विविध विषयांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. त्यात एसजीएसपी योजनेचा लाभ वेतन घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणे, प्रलंबित सेवानिवृत्ती प्रकरणे, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयके, भविष्य निर्वाह निधी अंमित परतावा प्रकरणे, भविष्य निर्वाह निधी आकस्मिक उचल प्रकरणे, सेवानिवृत्ती मुख्याध्यापक/कर्मचारी यांचे रजा रोखीकरण देयके व महत्त्वाच्या समस्यांवर चर्चा करून संबंधित समस्यांचे निराकरण न झाल्यास याच महिन्यात एक मोठे आंदोलन उभारण्याचा निर्णय सभेत सर्वानुमते घेण्यात आला. सदर समितीमध्ये विमाशि संघ, शिक्षक भारती संघ, शिक्षक परिषद संघ, राष्ट्रवादी शिक्षक संघ, भाजप शिक्षक संघ, मुख्याध्यापक संघ, विज्युक्टा संघ, काँग्रेस शिक्षक सेल, शिक्षकेत्तर कर्मचारी संघ, जुनी पेन्शन हक्क संघ, प्रहार आश्रमशाळा संघ, विनाअनुदानित शाळा कृती समिती, खाजगी प्राथ. शि. संघ, जि. प. माध्य. शि. संघ, न. प. माध्य. व उच्च शि. संघ, सीबीएससी शिक्षक संघ या संघटनांचा समावेश आहे.सभेत नवीन कार्यकारिणी विस्ताराबाबत चर्चा करून अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, कार्यवाह प्रवीण गजभिये, कार्याध्यक्ष विनोद किंर्देले, मुख्य मार्गदर्शक राजेश धुर्वे, अंगेश बेहलपाडे, मार्तंड गायधने, उपाध्यक्ष राजू बांते, चंद्रशेखर रहांगडाले, जीवन सार्वे, सैंग कोहपरे, कोषाध्यक्ष सैनपाल वासनिक, सहकार्यवाह सचिन तिरपुडे, नरेश फेंडरकर, संतोष मडावी, किशोर देशमुख, प्रसिद्धी प्रमुख विलास खोब्रागडे, गंगाधर भदाडे, सदस्य प्रमोद धार्मिक, अशोक वैद्य, राजेंद्र दोनोडकर, सुधाकर देशमुख, दारासिंग चव्हाण, गंगाधर मुळे, उमेश मेश्राम, उमेश पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सभेचे सूत्रसंचालन प्रवीण गजभिये यांनी केले तर सचिन तिरपुडे यांनी आभार व्यक्त केले.