शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

धान शेतीसाठी यांत्रिकीकरण अत्याआवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 05:00 IST

महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.

ठळक मुद्देहिंदुराव चव्हाण : भंडारा तालुक्यातील जाख येथे प्रात्यक्षिकातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या शेतकऱ्यांना धान शेतीसाठी अधिक खर्च येत असल्याने धानाची शेती परवडेनासी झाली आहे. अनेक कारणांमुळे शेतकरी हतबल होत आहेत. शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत धान शेती फायदेशीर होण्यासाठी विविध पर्याय शोधले जात आहेत. याचाच एक भाग म्हणून भातशेतीत यांत्रिकीकरण करणे आज काळाची गरज असून यांत्रिकीकरणाचा वापर शेतीत वाढल्यास धानशेती शेतकऱ्यांना नक्कीच फायदेशीर ठरणार आहे असे मत भंडाराचे जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व आत्मा यंत्रणेच्या वतीने भंडारा तालुक्यातील जाख येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व कृषी संजीवनी सप्ताहात यांत्रिकीकरण योजनेतून धान लागवडीसाठी यांत्रिकीकरण प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण व श्री पद्धतीने धान लागवड प्रात्यक्षिके अधिकाऱ्यांतर्फे दाखवण्यात आली.यावेळी जिल्हा कृषी अधीक्षक हिंदुराव चव्हाण, तंत्र अधिकारी आरे साहेब, गणेशपुर प्रोड्यूसर कंपनीचे डॉ. संजय एकापूरे, खर्शीपार मुख्यालयाचे कृषी सहाय्यक आनंद मोहतूरे, यांच्यासह जाख परिसरातील शेतकरी उपस्थित होते. शेतकऱ्यांशी बोलताना कृषी सहाय्यक आनंद मोहतुरे यांनी शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणातून धान लागवड केल्यास बियाण्याची बचत होऊन आर्थिक तसेच वेळेची बचत झाल्याने उत्पादनात दुपटीने वाढ होत असून शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याचे सांगितले. यावेळी यांत्रिकीकरण धान लागवडीची प्रात्यक्षिके दाखवली.प्रोडूसर कंपनीचे संजय एकापुरे यांनी ऐन खरीप हंगमात मजुरांचा भासणारा तुटवडा तसेच धान कापणीच्या वेळी ट्रॅक्टर सह मजूर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने अनेक शेतकरी धान लागवड यांत्रिकीकरणाने करणार असल्याचे सांगितले.कृषी विभागाच्या वतीने प्रोडूसर कंपनीच्या मदतीने शासनाच्या विविध योजनेत शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी मिळत असलेल्या कृषि विभाग व शेतकऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी परिसरातील शेतकरी तसेच स्थानिक पदाधिकारी व कृषी विभागाचे भंडारा तालुक्यातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.मजुरांच्या समस्येवर करता येणार मातकृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना पीक लागवडीच्या तसेच पीक काढणीच्या वेळी मजुरांचा भासणारा तुटवडा यावर मात करण्यासाठी यांत्रिकीकरणाने धान लागवड केल्यास मजुरांच्या तुटवड्यावर मात करता येणार आहे. एकाच वेळी अनेक हेक्टर क्षेत्रावर रोवणी तसेच धानाची मशागत व धान कापणी करणे सहज शक्य असल्याने यांत्रिकीकरणाद्वारे धान लागवड केल्यास शेतकऱ्यांना मजुरांच्या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे . त्यामुळे हा आधुनिक प्रयोग पाहण्यासाठी अनेक शेतकरी जमा झाले होते.

टॅग्स :agricultureशेती