शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंद खोऱ्यात यांत्रिक मळणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

मुखरू बागडे २५ २५ लोक ०९ के पालांदूर चुलबंद खोऱ्यात गत २५ दिवसांपासून उन्हाळी धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम ...

मुखरू बागडे २५

२५ लोक ०९ के

पालांदूर

चुलबंद खोऱ्यात गत २५ दिवसांपासून उन्हाळी धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात आहे. अवकाळी पावसामुळे सर्वांचा हंगाम प्रभावित झाला. नित्याप्रमाणे मजूरटंचाईचा सामना सगळ्यांनाच करावा लागला. मात्र, यांत्रिक मळणी यंत्राने शेतकऱ्यांना आधार दिला असून वेळेची व पैशाची बचत शक्य झालेली आहे.

मजुरांच्या हाताने कापणी, बांधणीचे दर प्रतिएकराला ३०००-३२०० रुपये आहेत. मळणी ६५-७० रुपये प्रतिपोते असे दर आहेत. प्रतिएकरात कापणी, बांधणी, मळणीचा खर्च ४६००- ५००० रुपयांपर्यंतचा आहे. यात जोखीम असून मजूर वेळेत मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. मात्र, यांत्रिक मळणी प्रतिएकर केवळ २५००रुपये एवढ्या दराने केली जात आहे. यात शेतकऱ्याला प्रतिएकर २००० ते २५०० रुपये एवढी बचत शक्य आहे. त्यातल्या त्यात घंटो का काम मिनटोमें होत असल्याने वेळेची बचत होत आहे. शासनसुद्धा यांत्रिक शेतीचे पुरस्कर्ते आहे. शासनाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकरीसुद्धा यांत्रिक होत आहे.

चुलबंद खोऱ्यात उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. ७० टक्के हंगाम आटोपला असून उर्वरित हंगाम हप्ताभरात पार पडण्याची शक्यता आहे. हंगाम मळणी होऊन आधार भाव केंद्राअभावी खासगी वापाऱ्यांच्या आश्रयाने विकला गेला. प्रतिक्विंटल ४५० रुपयांचा तोटा सहन करीत राजकीय लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांला हंगाम विकला.

खरेदी केंद्राचे उद्घाटन नावापुरतेच!

संपूर्ण भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन पार पडले; परंतु जागेअभावी काही खरेदी केंद्रांत अजूनही खरेदीचा मुहूर्त घडलेला नाही. जोपर्यंत बाहेर खुल्या नभाखालील धानाची उचल होणार नाही, तोपर्यंत धान खरेदी शक्य नसल्याची वास्तविक कटुसत्य पुढे आलेले आहे. शासनाची कोठार व्यवस्था पराधीन असल्याने शासन स्वतःच्या भरोशावर अपेक्षित खरेदी करू शकत नाही.

शेतकऱ्यांचा केवळ वापरच!

मी अमक्या पक्षाचा, तो तमक्या पक्षाचा म्हणत शेतकरी अभिमान बाळगतो. लोकशाहीचा आधार शेतकरी स्वतःला समजतो; परंतु प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःची दुकानदारी थाटलेली अनुभवायला मिळत आहे. पाठपीठ कुंभारा आपापली सांभाळा, असे राजकीय पक्षांचे धोरण असून शेतकरी त्यात भरडला जात आहे. नाहक पक्षाशी बांधिलकी शेतकऱ्याच्या अंगलट येत आहे.