शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

चुलबंद खोऱ्यात यांत्रिक मळणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:35 IST

मुखरू बागडे २५ २५ लोक ०९ के पालांदूर चुलबंद खोऱ्यात गत २५ दिवसांपासून उन्हाळी धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम ...

मुखरू बागडे २५

२५ लोक ०९ के

पालांदूर

चुलबंद खोऱ्यात गत २५ दिवसांपासून उन्हाळी धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात आहे. अवकाळी पावसामुळे सर्वांचा हंगाम प्रभावित झाला. नित्याप्रमाणे मजूरटंचाईचा सामना सगळ्यांनाच करावा लागला. मात्र, यांत्रिक मळणी यंत्राने शेतकऱ्यांना आधार दिला असून वेळेची व पैशाची बचत शक्य झालेली आहे.

मजुरांच्या हाताने कापणी, बांधणीचे दर प्रतिएकराला ३०००-३२०० रुपये आहेत. मळणी ६५-७० रुपये प्रतिपोते असे दर आहेत. प्रतिएकरात कापणी, बांधणी, मळणीचा खर्च ४६००- ५००० रुपयांपर्यंतचा आहे. यात जोखीम असून मजूर वेळेत मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. मात्र, यांत्रिक मळणी प्रतिएकर केवळ २५००रुपये एवढ्या दराने केली जात आहे. यात शेतकऱ्याला प्रतिएकर २००० ते २५०० रुपये एवढी बचत शक्य आहे. त्यातल्या त्यात घंटो का काम मिनटोमें होत असल्याने वेळेची बचत होत आहे. शासनसुद्धा यांत्रिक शेतीचे पुरस्कर्ते आहे. शासनाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत शेतकरीसुद्धा यांत्रिक होत आहे.

चुलबंद खोऱ्यात उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. ७० टक्के हंगाम आटोपला असून उर्वरित हंगाम हप्ताभरात पार पडण्याची शक्यता आहे. हंगाम मळणी होऊन आधार भाव केंद्राअभावी खासगी वापाऱ्यांच्या आश्रयाने विकला गेला. प्रतिक्विंटल ४५० रुपयांचा तोटा सहन करीत राजकीय लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांला हंगाम विकला.

खरेदी केंद्राचे उद्घाटन नावापुरतेच!

संपूर्ण भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन पार पडले; परंतु जागेअभावी काही खरेदी केंद्रांत अजूनही खरेदीचा मुहूर्त घडलेला नाही. जोपर्यंत बाहेर खुल्या नभाखालील धानाची उचल होणार नाही, तोपर्यंत धान खरेदी शक्य नसल्याची वास्तविक कटुसत्य पुढे आलेले आहे. शासनाची कोठार व्यवस्था पराधीन असल्याने शासन स्वतःच्या भरोशावर अपेक्षित खरेदी करू शकत नाही.

शेतकऱ्यांचा केवळ वापरच!

मी अमक्या पक्षाचा, तो तमक्या पक्षाचा म्हणत शेतकरी अभिमान बाळगतो. लोकशाहीचा आधार शेतकरी स्वतःला समजतो; परंतु प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःची दुकानदारी थाटलेली अनुभवायला मिळत आहे. पाठपीठ कुंभारा आपापली सांभाळा, असे राजकीय पक्षांचे धोरण असून शेतकरी त्यात भरडला जात आहे. नाहक पक्षाशी बांधिलकी शेतकऱ्याच्या अंगलट येत आहे.