शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

चुलबंद खोऱ्यात यांत्रिक मळणी जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:36 IST

पालांदूर : चुलबंद खोऱ्यात गत २५ दिवसांपासून उन्हाळी धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात आहे. अवकाळी पावसामुळे सर्वांचा ...

पालांदूर : चुलबंद खोऱ्यात गत २५ दिवसांपासून उन्हाळी धान कापणी, बांधणी, मळणीचा हंगाम जोमात आहे. अवकाळी पावसामुळे सर्वांचा हंगाम प्रभावित झाला. नित्याप्रमाणे मजूर टंचाईचा सामना सगळ्यांनाच करावा लागला. मात्र, यांत्रिक मळणी यंत्राने शेतकऱ्यांना आधार दिला असून वेळेची व पैशांची बचत शक्य झालेली आहे.

मजुरांच्या हाताने कापणी, बांधणीचे दर प्रति एकराला ३,०००-३,२०० रुपये आहेत. मळणी ६५-७० रुपये प्रति पोते असे दर आहेत. प्रति एकरात कापणी, बांधणी, मळणीचा खर्च ४,६००- ५,००० रुपयांपर्यंतचा आहे. यात जोखीम असून मजूर वेळेत मिळत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. मात्र, यांत्रिक मळणी प्रति एकर केवळ २,५००रुपये एवढ्या दराने केली जात आहे. यात शेतकऱ्याला प्रति एकर २,००० ते २,५०० रुपये एवढी बचत शक्य आहे. त्यातल्या त्यात घंटो का काम मिनटोमें होत असल्याने वेळेची बचत होत आहे. शासन सुद्धा यांत्रिक शेतीचे पुरस्कर्ते आहे. शासनाच्या महाडीबीटी योजनेंतर्गत शेतकरी सुद्धा यांत्रिक होत आहे.

चुलबंद खोऱ्यात उन्हाळी धानाचा हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे. ७० टक्के हंगाम आटोपला असून उर्वरित हंगाम हप्ता भरात पार पडण्याची शक्यता आहे. हंगाम मळणी होऊन आधार भाव केंद्र अभावी खासगी व्यापाऱ्यांच्या आश्रयाने विकला गेला. प्रतिक्विंटल ४५० रुपयांचा तोटा सहन करीत राजकीय लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती कमी पडल्याने शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्याला हंगाम विकला.

खरेदी केंद्राचे उद्घाटन नावापुरतेच !

संपूर्ण भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी आधारभूत धान खरेदी केंद्रांचे उद्घाटन पार पडले ; परंतु जागेअभावी काही खरेदी केंद्रांत अजूनही खरेदीचा मुहूर्त घडलेला नाही. जोपर्यंत बाहेर खुल्या नभाखालील धानाची उचल होणार नाही, तोपर्यंत धान खरेदी शक्य नसल्याची वास्तविक कटू सत्य पुढे आलेले आहे. शासनाची कोठार व्यवस्था पराधीन असल्याने शासन स्वतःच्या भरोशावर अपेक्षित खरेदी करू शकत नाही.

शेतकऱ्यांचा केवळ वापरच !

मी अमक्या पक्षाचा, तो तमक्या पक्षाचा म्हणत शेतकरी अभिमान बाळगतो. लोकशाहीचा आधार शेतकरी स्वतःला समजतो ; परंतु प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींनी केवळ स्वतःची दुकानदारी थाटलेली अनुभवायला मिळत आहे. पाठपीठ कुंभारा आपापली सांभाळा, असे राजकीय पक्षांचे धोरण असून शेतकरी त्यात भरडला जात आहे. नाहक पक्षाशी बांधिलकी शेतकऱ्याच्या अंगलट येत आहे.