शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचे तुटपुंजे मानधन तेही वेळेत मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:25 IST

भंडारा : राज्यात सांस्कृतिक संचालनालयातर्फे साहित्यिक तसेच वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ज्येष्ठ ...

भंडारा : राज्यात सांस्कृतिक संचालनालयातर्फे साहित्यिक तसेच वृद्ध कलावंतांना मानधन दिले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यातील ज्येष्ठ कलावंतांसह साहित्यात शासनाकडून उपेक्षितच असल्याचे दिसून येत आहे राज्य शासनाकडून दिले जाणारे हे मानधन जरी थेट डीबीटीद्वारे कलावंतांच्या बँक खात्यात जमा होत असले तरी हे मानधन नियमित जमा होत नाही. गेल्या काही महिन्यांपासून कलावंतांचे मानधन शासनाने दिले नसल्याने कलावंतांमध्ये रोष व्यक्त होत आहे. एकीकडे कोरोना परिस्थितीमुळे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर दुसरीकडे शासनाचीही उदासीनता कारणीभूत ठरत आहे. ‘अ’ वर्गातील राष्ट्रीय स्तरावरील कलावंतांना २१०० रुपये मानधन दिले जाते. तर ‘ब’ वर्गातील राज्यस्तरावरील कलावंत साहित्यिकांना अठराशे रुपये मानधन तर ‘क’ वर्गातील जिल्हा पातळीवरील कलाकार, साहित्यिकांना महिन्याला पंधराशे रुपये मानधन दिले जाते. जिल्ह्यात ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील कलावंत साहित्यिक नसले तरी ‘क’ वर्गातील जवळपास साठजणांना हे अनुदान मिळते. मात्र, इतक्या अल्प प्रमाणात मिळणारे पंधराशे रुपयांचे मानधनही वेळेत मिळत नसल्याने कुटुंबाचा खर्च देखील भागू शकत नसल्याचे चित्र आहे. यामुळे कलेच्या माध्यमातून जिल्ह्यातच नाही तर राज्यात नावलौकिक मिळविलेले झाडीपट्टीतील कलाकारांचे दीड हजार रुपयांचे मानधन वाढवून शासनाने किमान २० हजार रुपये प्रतिमहिना मानधन देण्याची मागणी करत आहेत. वृद्ध कलावंत तसेच साहित्यिकांचे मानधन जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे दिले जात होते. मात्र, आता शासनाने कलावंतांचे मानधन डीबीटीद्वारे सांस्कृतिक संचालनालयामार्फत त्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले जाते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून हे अनुदान प्राप्त झालेले नाही विभागामार्फत शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. अनुदान उपलब्ध होताच लाभार्थ्याच्या बँक खात्यावर लवकरच जमा करण्यात येईल.

आशा कवाडे, समाजकल्याण अधिकारी,भंडारा

कलावंतांचे मानधन वेळेवर मिळत नाही. ते तीन महिन्यांपासून अद्यापही मिळालेले नाही. कलावंत, साहित्यिक कुटुंबाचा रोजीरोटीचा प्रश्न यामुळे उभा राहिला आहे. कोरोनानंतर कलाकारांना जगण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत. शासनाने अडचणी सोडविण्याची गरज आहे.

भंडारा

सध्या दिले जाणारे साहित्यिक यांना मानधन अत्यंत तुटपुंजे आहे. या मानधनात शासनाने भरीव वाढ करण्याची गरज आहे. आजही साहित्य व लोककलाकार सामाजिक एक प्रबोधनाचे काम करत आहेत त्यांना शासनाने प्राेत्साहन देण्याची गरज आहे.

नवोदित साहित्यिक गणेशपूर.

छत्रपती शिवाजी महाराज,राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी लोककलेला,लोककलावंतांना खऱ्या अर्थाने आश्रय दिला.

मात्र त्याच पुरोगामी महाराष्ट्रात आज वृद्ध कलाकार व साहित्यिकांची होणारी परवड शासनाने लक्षात घेऊन मानधन वाढविण्याची गरज आहे.

कल्याणी निखाडे,लेखिका तथा सामाजिक कार्यकर्त्या, ठाणा.