शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

झोपडी भुईसपाट करून साहित्य केले जप्त

By admin | Updated: June 4, 2017 00:17 IST

प्रत्येकाला स्वत:चे घर असावे असे वाटते. परंतु मोलमजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला शासनाचे घरकूल मिळाले नसल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यांनी चंद्रमौळी तयार केली.

सरपंचाचा प्रताप : मोलमजुरी करणारे दाम्पत्य झाले बेघर, सुकळी येथील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला स्वत:चे घर असावे असे वाटते. परंतु मोलमजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला शासनाचे घरकूल मिळाले नसल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यांनी चंद्रमौळी तयार केली. सरपंचाने कोणतीही पूर्वसूचना न देता चंद्रमौळी उद्ध्वस्त करून साहित्यासह गृहोपयोगी सामान जप्त करून ग्रामपंचायतीत जमा केले. दोन लहान लेकरांसह सदर दाम्पत्य बेघर झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही.सुकळी (दे) येथील रहिवासी रविशंकर बोंदरे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. राहायला पक्के घर नाही. ते सध्या भाड्याने राहत होते. आपली किमान झोपडी असावी असा विचार करून रविशंकर, पत्नी सविता यांनी मे महिन्यात गावात मंदिर परिसरात रिकाम्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी तयार केली. सरपंच भाऊलाल बांडेबुचे व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. घरी कुणी नाही अशी संधी साधून संपूर्ण झोपडी उध्वस्त करून भूईसपाट केली. चंद्रमोळीच्या साहित्यासह गृहपयोगी सर्व साहित्य ट्रॅक्टरने ग्रामपंचायतीत नेण्यात आले.झोपडी भूईसपाट करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने बोंदरे कुटुंबियांना काहीच सांगितले नाही. साधा नोटीस दिला नाही. मोलमजुरी करून जेव्हा सायंकाळी घरी आले. तेव्हा त्यांना झोपडी भूईसपाट दिसली. कुठे राहावे असा प्रश्न पडला. किमान चार ते पाच दिवस ग्रामपंचायतीत मुक्काम केला. सध्या तिथून निघून हे कुटुंब गावात पडक्या घरात आश्रयाला आहे. पावसाळा तोंडावर आहे. दोन लहान मुले असून दारिद््रय रेषेखालील कुटुंबावर आभाळाऐवढे संकट कोसळले आहे. दोन दिवसांपूर्वी तुमसरचे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांना भेटून हकीकत सांगितली. त्यांनी ग्रामसेवकांना बोलावून समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. पुन्हा गावात पोहचल्यावर त्यांनी रंग बदलला.सुकळी (दे.) गावात शासकीय जागेवर इतरांनीही अतिक्रमण केले आहेत. परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई सरपंचांनी केली नाही. हेतुपुरस्सर केवळ आमच्यावर कारवाई केली असा आरोप पीडित बोंदरे कुटुंबियांनी लावला आहे. याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा पीडित बोंदरे कुटुंबियांनी दिला आहे.या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे. प्रत्येकाला घर मिळेल असे आश्वासन शासनकडून देण्यात येत आहे. परंतु गावात मात्र वास्तविक स्थिती वेगळीच दिसत आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर गावातील अनेक कार्यक्रम होतात. संपूर्ण गावाचा विरोध होता. साहित्य जप्त केल्यावर ते घेऊन जाण्यास सांगितले आहे. हेतुपुरस्सर कारवाई केली नाही.-भाऊलाल बांडेबुचे,सरपंच, सुकळी (दे.)