शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
3
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
4
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
5
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
6
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
7
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
8
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
9
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
10
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
11
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
12
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
13
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
14
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
15
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
16
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
17
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
18
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
19
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
20
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?

झोपडी भुईसपाट करून साहित्य केले जप्त

By admin | Updated: June 4, 2017 00:17 IST

प्रत्येकाला स्वत:चे घर असावे असे वाटते. परंतु मोलमजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला शासनाचे घरकूल मिळाले नसल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यांनी चंद्रमौळी तयार केली.

सरपंचाचा प्रताप : मोलमजुरी करणारे दाम्पत्य झाले बेघर, सुकळी येथील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला स्वत:चे घर असावे असे वाटते. परंतु मोलमजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला शासनाचे घरकूल मिळाले नसल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यांनी चंद्रमौळी तयार केली. सरपंचाने कोणतीही पूर्वसूचना न देता चंद्रमौळी उद्ध्वस्त करून साहित्यासह गृहोपयोगी सामान जप्त करून ग्रामपंचायतीत जमा केले. दोन लहान लेकरांसह सदर दाम्पत्य बेघर झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही.सुकळी (दे) येथील रहिवासी रविशंकर बोंदरे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. राहायला पक्के घर नाही. ते सध्या भाड्याने राहत होते. आपली किमान झोपडी असावी असा विचार करून रविशंकर, पत्नी सविता यांनी मे महिन्यात गावात मंदिर परिसरात रिकाम्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी तयार केली. सरपंच भाऊलाल बांडेबुचे व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. घरी कुणी नाही अशी संधी साधून संपूर्ण झोपडी उध्वस्त करून भूईसपाट केली. चंद्रमोळीच्या साहित्यासह गृहपयोगी सर्व साहित्य ट्रॅक्टरने ग्रामपंचायतीत नेण्यात आले.झोपडी भूईसपाट करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने बोंदरे कुटुंबियांना काहीच सांगितले नाही. साधा नोटीस दिला नाही. मोलमजुरी करून जेव्हा सायंकाळी घरी आले. तेव्हा त्यांना झोपडी भूईसपाट दिसली. कुठे राहावे असा प्रश्न पडला. किमान चार ते पाच दिवस ग्रामपंचायतीत मुक्काम केला. सध्या तिथून निघून हे कुटुंब गावात पडक्या घरात आश्रयाला आहे. पावसाळा तोंडावर आहे. दोन लहान मुले असून दारिद््रय रेषेखालील कुटुंबावर आभाळाऐवढे संकट कोसळले आहे. दोन दिवसांपूर्वी तुमसरचे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांना भेटून हकीकत सांगितली. त्यांनी ग्रामसेवकांना बोलावून समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. पुन्हा गावात पोहचल्यावर त्यांनी रंग बदलला.सुकळी (दे.) गावात शासकीय जागेवर इतरांनीही अतिक्रमण केले आहेत. परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई सरपंचांनी केली नाही. हेतुपुरस्सर केवळ आमच्यावर कारवाई केली असा आरोप पीडित बोंदरे कुटुंबियांनी लावला आहे. याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा पीडित बोंदरे कुटुंबियांनी दिला आहे.या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे. प्रत्येकाला घर मिळेल असे आश्वासन शासनकडून देण्यात येत आहे. परंतु गावात मात्र वास्तविक स्थिती वेगळीच दिसत आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर गावातील अनेक कार्यक्रम होतात. संपूर्ण गावाचा विरोध होता. साहित्य जप्त केल्यावर ते घेऊन जाण्यास सांगितले आहे. हेतुपुरस्सर कारवाई केली नाही.-भाऊलाल बांडेबुचे,सरपंच, सुकळी (दे.)