शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

झोपडी भुईसपाट करून साहित्य केले जप्त

By admin | Updated: June 4, 2017 00:17 IST

प्रत्येकाला स्वत:चे घर असावे असे वाटते. परंतु मोलमजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला शासनाचे घरकूल मिळाले नसल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यांनी चंद्रमौळी तयार केली.

सरपंचाचा प्रताप : मोलमजुरी करणारे दाम्पत्य झाले बेघर, सुकळी येथील प्रकारलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : प्रत्येकाला स्वत:चे घर असावे असे वाटते. परंतु मोलमजुरी करणाऱ्या एका दाम्पत्याला शासनाचे घरकूल मिळाले नसल्याने शासकीय जागेवर अतिक्रमण करून त्यांनी चंद्रमौळी तयार केली. सरपंचाने कोणतीही पूर्वसूचना न देता चंद्रमौळी उद्ध्वस्त करून साहित्यासह गृहोपयोगी सामान जप्त करून ग्रामपंचायतीत जमा केले. दोन लहान लेकरांसह सदर दाम्पत्य बेघर झाले आहे. याप्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी न्याय दिला नाही.सुकळी (दे) येथील रहिवासी रविशंकर बोंदरे हे मोलमजुरी करून उदरनिर्वाह चालवितात. राहायला पक्के घर नाही. ते सध्या भाड्याने राहत होते. आपली किमान झोपडी असावी असा विचार करून रविशंकर, पत्नी सविता यांनी मे महिन्यात गावात मंदिर परिसरात रिकाम्या शासकीय जागेवर अतिक्रमण करून झोपडी तयार केली. सरपंच भाऊलाल बांडेबुचे व अन्य दोन ग्रामपंचायत सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. घरी कुणी नाही अशी संधी साधून संपूर्ण झोपडी उध्वस्त करून भूईसपाट केली. चंद्रमोळीच्या साहित्यासह गृहपयोगी सर्व साहित्य ट्रॅक्टरने ग्रामपंचायतीत नेण्यात आले.झोपडी भूईसपाट करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने बोंदरे कुटुंबियांना काहीच सांगितले नाही. साधा नोटीस दिला नाही. मोलमजुरी करून जेव्हा सायंकाळी घरी आले. तेव्हा त्यांना झोपडी भूईसपाट दिसली. कुठे राहावे असा प्रश्न पडला. किमान चार ते पाच दिवस ग्रामपंचायतीत मुक्काम केला. सध्या तिथून निघून हे कुटुंब गावात पडक्या घरात आश्रयाला आहे. पावसाळा तोंडावर आहे. दोन लहान मुले असून दारिद््रय रेषेखालील कुटुंबावर आभाळाऐवढे संकट कोसळले आहे. दोन दिवसांपूर्वी तुमसरचे खंडविकास अधिकारी विजय झिंगरे यांना भेटून हकीकत सांगितली. त्यांनी ग्रामसेवकांना बोलावून समस्या निकाली काढण्याचे निर्देश दिले. पुन्हा गावात पोहचल्यावर त्यांनी रंग बदलला.सुकळी (दे.) गावात शासकीय जागेवर इतरांनीही अतिक्रमण केले आहेत. परंतु त्यांचेवर कोणतीच कारवाई सरपंचांनी केली नाही. हेतुपुरस्सर केवळ आमच्यावर कारवाई केली असा आरोप पीडित बोंदरे कुटुंबियांनी लावला आहे. याप्रकरणी आत्मदहनाचा इशारा पीडित बोंदरे कुटुंबियांनी दिला आहे.या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, खंडविकास अधिकारी, तहसीलदार यांचेकडे करण्यात आली आहे. प्रत्येकाला घर मिळेल असे आश्वासन शासनकडून देण्यात येत आहे. परंतु गावात मात्र वास्तविक स्थिती वेगळीच दिसत आहे.शासकीय जागेवर अतिक्रमण केले होते. या जागेवर गावातील अनेक कार्यक्रम होतात. संपूर्ण गावाचा विरोध होता. साहित्य जप्त केल्यावर ते घेऊन जाण्यास सांगितले आहे. हेतुपुरस्सर कारवाई केली नाही.-भाऊलाल बांडेबुचे,सरपंच, सुकळी (दे.)