शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

माती व शेणखताच्या बिलांची जुळवाजुळव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 01:10 IST

येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवडीत गौडबंगाल असे वृत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात सावरासावर सुरु झाली.गाळयुक्त माती व शेणखताचे बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी वनकार्यालयात श्निवारी एकच धावपळ सुरु होती.

ठळक मुद्देसंडे अँकर । तुमसर वनविभागात खळबळ, ३ लाख २८ हजार वृक्ष लागवडीचे प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : येथील वनपरिक्षेत्र अंतर्गत वृक्ष लागवडीत गौडबंगाल असे वृत ‘लोकमत’मध्ये प्रकाशित होताच वनविभागात सावरासावर सुरु झाली.गाळयुक्त माती व शेणखताचे बिलांची जुळवाजुळव करण्यासाठी वनकार्यालयात श्निवारी एकच धावपळ सुरु होती. गाळयुक्त माती व शेणखतांची येथे निविदा मागविण्यात आल्या होत्या, हे विशेष.तुमसर वनपरिक्षेत्र अंतर्गत २१ साईट वर वृक्ष लागवड करायचे निश्चित करण्यात आले आहे. आतापर्यंत ३ लाख २८ हजार वृक्ष लागवड येथे करण्यात आली. त्याकरिता ६ कोटी खर्च करण्यात आले. येथे ८ लाख २३ हजार ८२३ झाडांची लागवड करायचे आहे. वृक्ष लागवडीकरिता तुमसर वनपरिक्षेत्र कार्यालयाने कंत्राटदाराकडून गाळयुक्त माती व शेणखतांच्या निविदा मागविल्या होत्या. गाळयुक्त माती तलावातून आणावयाची होती. कमी किमतीत पुरवठा करणाऱ्या स्थानिकांकडून गाळयुक्त माती व शेणखत पुरवठा करण्यात आला. स्थानिक लोकांकडून निविदा १ जून २०१९ रोजी जाहीरनामा काढून निविदा ए-वन फॉर्ममध्ये मागविण्यात आले होते. येथे तुलनात्मक तक्ता तयार करण्यात आला. त्यानंतर तुलनात्मक तक्ता भंडारा उपवन् मंजूरीकरिता सादर करण्यात आले.यात गाळयुक्त मातीसाठी ४ लाख १९ हजार तर शेणखतासाठी ११ लाख २० हजार मंजूर करण्यात आले. एकुण किंमत १५ लाख ३९ हजारांची मंजुरी प्रदान करण्यात आली. येथे शेणखत पुरेसे मिळाले नाही अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे यांनी दिली.गाळयुक्त माती तलावातून काढण्यात आली असा कागदी पुरावा येथे आहे, परंतु नियमानुसार महसूल विभाग तथा तलावाची मालकी असलेल्या इतर विभागाकडून मंजुरीची टीपी येथे नाही.वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे म्हणाले, शेणखत व गाळयुक्त मातीकरिता जाहीर सूचना करून ए-वन फॉर्ममध्ये बंद लिफाफ्यात निविदा मागविण्यात आली होती. सर्वात कमी दर असलेल्या स्थानिकांनी येथे शेणखत व पाखण माती पुरविली. तर काँग्रेसचे नेते डॉ. पंकज कारेमोरे म्हणाले, शेणखत व पाखण माती येथे वृक्ष लागवड करताना उपयोग करण्यात आला नाही. गाळयुक्त माती आणल्याची येथे टीपी नाही. शेणखत उपलब्ध न झाल्याने रासायनिक खत घालण्यात आले. असे सांगण्यात येत आहे. वास्तविक येथे कागदोपत्री शेणखत व पाखणमाती घालण्यात आली आहे.मुल्यमापन समितीने केले मुल्यांकनवृक्ष लागवडीनंतर नागपूर येथील मुल्यमापन समिती येथे आली होती. त्यांनी मुल्यांकन केले होते. अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी गोविंद लुचे यांनी दिली. मुल्यांकन समितीचे प्रमुख सीसीएफ दर्जाचे अधिकारी होते. त्यांनी केवळ कागदोपत्री मुल्यांकन केले काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. ३३ कोटी वृक्ष लागवड योजनेंतर्गत भंडारा जिल्ह्यात ५३.९९ लाख वृक्ष लागवडीचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले होते. सदर प्रकारामुळे वृक्ष लागवड मोहिमेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वृक्ष लागवड करणारे मजुरांनी पाखण माती व शेणखताचा वापर चांदपूर बिटमध्ये केला नाहे असे सांगितले. त्यामुळे येथील वृक्ष लागवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. आता याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.