शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भरमसाठ वीज बिलाने मोडले नागरिकांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळात आपले जीवन जगत आहे.

ठळक मुद्देघरगुती वीज बिल माफ करा : प्रशासनाला निवेदन, तुमसर-लाखांदुरात वीज ग्राहकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना काळात सरासरी आलेल्या भरमसाठ विजेच्या बिलाचे सध्या विद्युत विभागाकडे नियोजन नसल्याचे समजते. त्यात मागील चार महिन्याचे लागून आलेले बिल व त्यातील भरमसाठ रकमेने सर्व नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात मीटर रिडिंगचे नोंद विभागाने केली नाही. मात्र चालू महिन्यात विद्युत विभागाने सरासरी रिडिंगचे बिल पाठवले आहे. प्रत्येकाच्या बिलातील रक्कम ही किमान दोन हजाराच्या वर दिसून येत आहे. प्रत्येक ग्राहकांची धाव विद्युत कार्यालयाकडे होत आहे.कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळात आपले जीवन जगत आहे.ज्यांची रोजची हातावरची पोट आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न सर्व खाण्यामध्येच खर्च होत असते. जवळ काहीच शिल्लक नसते. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद आहेत. यामुळे या सर्वसामान्य नागरिकांचे खायचे हाल होत असल्याने घरगुती विद्युत बिल माफ करावे तसेच याविषयाची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचा वतीने महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. याविषयी उर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सुधाकर कारेमोरे, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख वामनराव पडोळे, संतोष साखरवाडे, प्रणय त्रिभुवनकर, सतिश बन्सोड, पुष्पक त्रिभुवनकर, दिनेश बन्सोड सह शिवसैनिक उपस्थित होते.लाखांदूर : कोरोनाविषाणू महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी लागू असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. मात्र या संकटाच्या काळात वीज कंपनीने घरगुती वीज ग्राहकांना अवाजवी वीज बिल देऊन जनतेची आर्थिक पिळवणूक चालविण्याचा ठपका ठेवीत लॉकडाऊन मधील घरगुती वीज बिल माफ करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. सदरचे निवेदन २२ जून रोजी जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात येथील तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.सध्या शेती हंगामाला वेगाला असतांना शेतकऱ्यांना विविध संकटाला सामोरे जावे लागत असतांनाच विज कंपनीकडून अवाजवी बिल प्राप्त झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तात्काळ घरगुती वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.लाखांदूरचे नायब तहसीलदार देविदास पाथोडे यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देतेवेळी माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, सुधीर खोब्रागडे, चंद्रशेखर मेश्राम, दिलीप रामटेके, जगदीश बगमारे, सोमा डोंगरे, राहुल लोणारे, वामन शेंडे अरुण घोडीचोर यासह अन्य नागरिक उपस्थित होते.बील भरणे नागरिकांसाठी आव्हानलॉकडाऊन काळात काळात तालुक्यात मजुरीची कामे बंद होती. मजुरीविना कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावेलागले. प्रपंच चालविणे कठीण असताना वीज कंपनीने अवाजवी घरगुती बील पाठविले. तीन महिन्यांचे वीज बिल देताना सरासरी वीज दरानुसार देण्यात आल्याने संबंधित वीज बिलाचा भरणा करणे जनतेपुढे मोठे आव्हान ठरले आहे.

टॅग्स :electricityवीज