शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

भरमसाठ वीज बिलाने मोडले नागरिकांचे कंबरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 05:00 IST

कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळात आपले जीवन जगत आहे.

ठळक मुद्देघरगुती वीज बिल माफ करा : प्रशासनाला निवेदन, तुमसर-लाखांदुरात वीज ग्राहकांमध्ये रोष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कोरोना काळात सरासरी आलेल्या भरमसाठ विजेच्या बिलाचे सध्या विद्युत विभागाकडे नियोजन नसल्याचे समजते. त्यात मागील चार महिन्याचे लागून आलेले बिल व त्यातील भरमसाठ रकमेने सर्व नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. कोरोना काळात मीटर रिडिंगचे नोंद विभागाने केली नाही. मात्र चालू महिन्यात विद्युत विभागाने सरासरी रिडिंगचे बिल पाठवले आहे. प्रत्येकाच्या बिलातील रक्कम ही किमान दोन हजाराच्या वर दिसून येत आहे. प्रत्येक ग्राहकांची धाव विद्युत कार्यालयाकडे होत आहे.कोरोना प्रादूभार्वाच्या संकटकाळात केंद्र सरकार आणि राज्य शासनाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे राज्यातील कष्टकरी नागरिक दिनांक २४ मार्चपासून आज जवळपास तीन महिने घरी बसून आहेत. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्गच बंद आहेत, काहीतरी मार्ग काढून या संकटाच्या काळात आपले जीवन जगत आहे.ज्यांची रोजची हातावरची पोट आहेत, ज्यांचे मासिक उत्पन्न सर्व खाण्यामध्येच खर्च होत असते. जवळ काहीच शिल्लक नसते. त्यांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद आहेत. यामुळे या सर्वसामान्य नागरिकांचे खायचे हाल होत असल्याने घरगुती विद्युत बिल माफ करावे तसेच याविषयाची दखल घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अशा आशयाचे निवेदन शिवसेनेचा वतीने महावितरण उपविभागीय कार्यालयाचे उपकार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले. याविषयी उर्जामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे सुधाकर कारेमोरे, सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष तथा शिवसेना विभाग प्रमुख अमित एच. मेश्राम, उपजिल्हा संघटक जगदीश त्रिभुवनकर, शाखा प्रमुख वामनराव पडोळे, संतोष साखरवाडे, प्रणय त्रिभुवनकर, सतिश बन्सोड, पुष्पक त्रिभुवनकर, दिनेश बन्सोड सह शिवसैनिक उपस्थित होते.लाखांदूर : कोरोनाविषाणू महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आले. या काळात सर्वत्र संचारबंदी व जमावबंदी लागू असल्याने ग्रामीण भागातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. मात्र या संकटाच्या काळात वीज कंपनीने घरगुती वीज ग्राहकांना अवाजवी वीज बिल देऊन जनतेची आर्थिक पिळवणूक चालविण्याचा ठपका ठेवीत लॉकडाऊन मधील घरगुती वीज बिल माफ करण्याचे निवेदन देण्यात आले आहे. सदरचे निवेदन २२ जून रोजी जिल्हा परिषदेचे माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांच्या नेतृत्वात येथील तहसीलदारांमार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.सध्या शेती हंगामाला वेगाला असतांना शेतकऱ्यांना विविध संकटाला सामोरे जावे लागत असतांनाच विज कंपनीकडून अवाजवी बिल प्राप्त झाल्याने सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर परिस्थितीची दखल घेऊन शासनाने तात्काळ घरगुती वीज बिल माफ करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले.लाखांदूरचे नायब तहसीलदार देविदास पाथोडे यांच्यामार्फत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना निवेदन देतेवेळी माजी सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे, सुधीर खोब्रागडे, चंद्रशेखर मेश्राम, दिलीप रामटेके, जगदीश बगमारे, सोमा डोंगरे, राहुल लोणारे, वामन शेंडे अरुण घोडीचोर यासह अन्य नागरिक उपस्थित होते.बील भरणे नागरिकांसाठी आव्हानलॉकडाऊन काळात काळात तालुक्यात मजुरीची कामे बंद होती. मजुरीविना कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावेलागले. प्रपंच चालविणे कठीण असताना वीज कंपनीने अवाजवी घरगुती बील पाठविले. तीन महिन्यांचे वीज बिल देताना सरासरी वीज दरानुसार देण्यात आल्याने संबंधित वीज बिलाचा भरणा करणे जनतेपुढे मोठे आव्हान ठरले आहे.

टॅग्स :electricityवीज