शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समिती ठरली शेतकऱ्यांसाठी निकामी

By admin | Updated: December 21, 2014 22:54 IST

वार्षिक लाखांच्या घरात उत्पन्न मात्र गचाळ कारभारामुळे परवानाधारक अडते व धान्यविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने लक्षाधीश बाजार

लाखांदूर : वार्षिक लाखांच्या घरात उत्पन्न मात्र गचाळ कारभारामुळे परवानाधारक अडते व धान्यविक्रीसाठी आलेल्या शेतकऱ्यांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध नसल्याने लक्षाधीश बाजार समिती शेतकऱ्यांसाठी निकामी ठरली आहे.तालुक्यात धानपिकाचे क्षेत्र सर्वात जास्त आहेत. जास्तीत जास्त शेतकरी धान्य व कठाण माल विक्रीसाठी बाजार समितीमध्ये धान्य आणतात. परंतु धान्य ठेवण्यासाठी योग्य जागा, सुरक्षित गोडावून तसेच अडत्यांना बसण्यासाठी पर्यायी व्यवस्था नसल्याने उघड्यावर धान्य ठेवल्याशिवाय पर्याय नाही. काबाडकष्ट करून पिकविलेले धान्य बाजार समितीच्या परिसरात ठेवून चोरीला जाण्याची भीती सध्या शेतकऱ्यांसाठी नित्याची झाली आहे. सदर बाजार समितीमध्ये धान्य खरेदी कारखाने अडते उघड्यावर बसून धान्य खरेदी करतात. पावसात मोठी समस्या निर्माण होत असून धान्य खरेदीसाठी अडचणींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. प्रसाधनगृह नाही. बसण्या व आराम करण्यासाठी जागा नाही. अडत्यांसाठी विद्युत दिव्यांची सोय नाही. शेतकऱ्यांना येण्याजाण्यासाठी रस्ते बरोबर नाही. डांबरीकरणाची मागणी धुळखात पडली आहे. शेड नसल्याने धान्याची नासाडी होते.अडत्यांचे व्यवहार दररोज लाखांच्या घरात असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने स्वतंत्र व्यवस्था केली गेली नसल्याने रक्कम चोरीला गेल्याची तक्रारी पोलीस ठाण्यात आहेत. तसेच शेतकऱ्यांच्या धान्याच्या देखभालीसाठी चौकीदाराची नेमणूक केली नसल्याने दिवसा व रात्री धान्य चोरीला गेल्याचे प्रकार उजेडात आले होते. मागील वर्षी बाजार समितीच्या प्रशासनाने नोकरभरती करून प्रशासन चालविण्यासाठी पुढाकार घेतला. मात्र नोकर भरती झाली. प्रशासनात सुधारणा झाल्याचे दिसून आले नाही. एकूणच बाजार समिती प्रशासन शेतकरी व अडत्यांना सोयी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरली असून केवळ कागदाचे घोडे नाचवत असल्याचा आरोप केला जात आहे.बाजार समितीचे वार्षिक उत्पन्न लाखोच्या घरात आहे. सोबतच शासनाचा मिळणारा विकास निधी योग्य प्रकारे नियोजनातून केल्या जात नसल्याने मागील एक वर्षापासून सोयी सुविधांचे बांधकाम धुळखात पडले आहे. आठवडी बाजार समिती परिसरातच भरला जातो. यातून आठवड्याकाठी हजारोची रक्कम जमा होते. कंत्राट पद्धत बंद करून भाजी विक्रेत्याकडूनच बाजार समितीने स्वत:चे कर्मचारी वसुली अधिकारी म्हणून नेमणे मात्र यातून जमा रकमेचा हिशोब संशयास्पद आहे. बैल बाजार मोठा मानला जातो. तो सुद्धा दर आठवड्यातून दोनदा भरतो. येथून सुद्धा आवक लाखोच्या घरात जाते. हे दोन्ही कंत्राट बाजार समिती प्रशासनाने स्वत:कडे ठेवल्याने वसुलीचा ताळमेळ जुळत नाही. एकूणच नियोजनशून्य कारभार व प्रशासनावर वचक नसल्याने दर्जा खालावत जात असल्याचे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. काही दिवसापूर्वी सभापतीवर अविश्वास ठराव पारित करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या होत्या. मात्र काही संचालकांनी अविश्वास प्रस्ताव हाणून पाडला. सदर बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव दिला जात असल्याची ओरड असली तरी धान्य साठवणूक ठेवण्याची व्यवस्था बाजार समितीने करावी, धान्याच्या वजनात मोठी तुट येत असल्याने इलेक्ट्रीक काट्याची बाजार समितीने व्यवस्था करावी, या मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)