शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

‘फेक’ योजनांचा अनेकांना भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2019 22:14 IST

सध्या जिल्हाभर बेटी बचाव, बेटी पढाव या केंद्र सरकारच्या न असलेल्या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होत आहे. यात ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी भागातील सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत.

ठळक मुद्दे'बेटी बचाव, बेटी पढाव' योजना : नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : सध्या जिल्हाभर बेटी बचाव, बेटी पढाव या केंद्र सरकारच्या न असलेल्या योजनेचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार होत आहे. यात ग्रामीण भागातील नव्हे तर शहरी भागातील सुशिक्षित नागरिकही बळी पडत आहेत. या योजनेचा लाभ मिळावा म्हणून असंख्य मुली, त्यांचे पालक तहसील कार्यालयात उत्पन्नाच्या प्रमाणपत्राकरिता, तर परिपूर्ण भरलेले फार्म पोस्ट आॅफिसमध्ये फार्मवर नमूद पत्त्यावर पाठविण्याकरिता गर्दी करीत आहेत. या 'फेक' योजनेमुळे अनेक नागरिकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.असाच प्रकार भंडारा येथे घडल्यामुळे अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनी पोस्टमास्तर, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यपालन अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारीयांना तत्काळ पत्र लिहून बेटी बचाव बेटी पढाव या योजने अंतर्गत लाभ मिळण्यासाठीचे फार्म भरण्यासाठी पोस्ट आॅफिस येथे नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. फार्म नमुना भरल्यानंतर एक मुलीच्या शिक्षणाकरिता दोन लाख मिळणार असल्याची खोटी माहिती सोशल मिडियावर आली आहे. त्याद्वारे सामान्य जनतेची फसवणूक, आर्थिक गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पोस्ट आॅफिस समोर सुचना फलक तातडीने लावण्यात यावे, सामान्य जनतेला त्याची माहिती होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र लिहून घडणारा प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचे पत्र असतानाही पोस्ट कार्यालयामार्फत अधिनस्त असलेल्या तालुका, शहर व गाव पातळीवरील पोस्ट कार्यालयात तशी माहिती दिली नाही.शुक्रवारपर्यत पवनी येथील पोस्ट कार्यालयात बेटी बचाव बेटी पढाव या खोट्या योजनेचे फार्म भरून पोस्टाद्वारे नोंदणीकृत डाकेने पाठविण्याचे कार्य सुरू होते.या प्रकाराची माहिती प्रशांत पिसे, प्रकाश पचारे यांना कळताच पोस्ट आॅफिसमध्ये जावून सदरच्या नोंदणीकृत डाक घेवू नये, अशी मागणी केली. मात्र पोस्ट मास्तर यांनी आम्हाला असे कोणत्याही प्रकारचे आदेश नसल्यामुळे व पोस्ट आॅफिसचे कामच असल्यामुळे आम्ही अर्ज असलेले पॉकीट घेत आहोत. विभागीय कार्यालयाकडून आदेश येईल तेव्हाच आम्ही हे काम थांबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे घडणाऱ्या प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेवून प्रशांत पिसे यांनी जिल्ह्यातील संबंधित पत्रकारांना माहिती देवून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांचेशी दुरध्वनीवर चर्चा केली मुख्य पोस्ट आॅफिस येथील पोस्टमास्तरला दुरध्वनीवर बोलून तात्काळ कार्यवाही करून बाहेर बोर्डावर सुचना लिहिण्यास सांगितले.जिल्ह्यातील तालुका, शहर व गावपातळीवर असलेल्या पोस्ट आॅफिसला आदेश देवून बेटी बचाव बेटी पढाव या 'फेक' योजनेला लगाम लावण्याचा प्रयत्न केला. शेवटी दुपारी १२ वाजता पासून पवनी येथील पोस्ट आॅफिसमध्ये बेटी बचाव बेटी पढाव या 'फेक' योजनेचे दिल्ली करिता नोंदणीकृत डाक घेणे पोस्ट कार्यालयाने थांबविल्यामुळे अनेक गोरगरीबांचा आर्थिक पिळवणूक थांबणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी अशा बनावट योजनेपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.