शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
3
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
4
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
5
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
6
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
7
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
8
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
9
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
10
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
11
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
12
शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात; Nifty रेड झोनमध्ये, 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी तेजी
13
"एकटीच राहते, मुलगा माझ्यासोबत राहत नाही...", ७९ वर्षीय उषा नाडकर्णी जगताहेत एकाकी जीवन, दुःख व्यक्त करत म्हणाल्या...
14
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
15
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
16
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
17
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
18
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
19
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
20
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ

अल्प बसफेऱ्यामुळे अनेकांची कोंडी

By admin | Updated: August 28, 2015 01:08 IST

इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पाकडे जाणाऱ्या अल्प बसफेऱ्यांमुळे विद्यार्थी, प्रवासी व पर्यटकांची कोंडी होत आहे.

चिचाळ : इंदिरा सागर गोसीखुर्द प्रकल्पाकडे जाणाऱ्या अल्प बसफेऱ्यांमुळे विद्यार्थी, प्रवासी व पर्यटकांची कोंडी होत आहे. अड्याळ गोसे पवनी व गोसे अड्याळ फेऱ्या सुरु करण्याची मागणी या मार्गावरील जनतेनी केली आहे. विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसीखुर्द इंदिरा सागर प्रकल्पावरुन भंडारा गोसे पवनीमार्गे धावणाऱ्या बसेस सकाळी ८.१५ वाजता, दुपारी १२ वाजता व सायंकाळी ६.३० वाजता तर पवनी गोसे भंडारा सकाळी ६.१५, ११.१५ व सायंकाळी ६.३० वाजता बसेस धावतात, या धावणाऱ्या अल्प बसफेऱ्यामुळे शालेय विद्यार्थी व पर्यटकांची गैरसोय होत आहे. या मार्गावरील इटगाव कुर्झा, गोसीखुर्द, गोसे बु., मेंढा, पाथरी व चिचाळ येथील विद्यार्थी शिक्षणासाठी अड्याळ, कोंढा, पवनी, भंडारा जिल्हा व तालुकास्थळ पवनी येथे विद्यार्थ्यांना व नागरीकांना अल्प बस फेऱ्यामुळे त्रास सहन करावा लागतो. सदर मार्गावरील विद्यार्थी अड्याळ येथे शिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जातात. पंरतु शालेय वेळेवर बसेस नसल्याने विद्यार्थी नवेगाव पाले येथे सायकलने प्रवास करुन नवेगाव येथून भंडारा-पवनी राष्ट्रीय मार्गे २७१ वरुन अड्याळला जातात. अड्याळ येथील बसस्थानकावर शाळा संपल्यानंतर नवेगाव येथून सायकलने स्वगावी जावे लागते. अनेकदा भंडारा पवनी मार्गे बसेस उशिरा आल्यास विद्यार्थ्यांना रात्री ७ ते ८ वाजता गावाला जावे लागते. त्या वेळेवर गोसे मार्गे धावणारी एकही बस नाही. विद्यार्थ्यांना अकारण मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. सदर मार्गावर इंदिरा सागर गोसे प्रकल्प असुन येथे नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. मात्र अपुऱ्या बस फेऱ्याने प्रवाशांची व पर्यटकांची गैरसोय होत आहे. सदर मार्गावरुन अगदी १० किमी अंतरावर भंडारा- पवनी राष्ट्रीय महामार्ग क्र. २७१ आहे. या मार्गावरुन पवनी-भंडारा व भंडारा- पवनी बसेसची वर्दळच असते. गोसे मार्गे धावणाऱ्या कुर्झा, इटगाव, गोसे, मेंढा, पाथरी व चिचाळ या गावापासून राष्ट्रीय मार्गावर (नवेगाव) येणाऱ्या अपुऱ्या बसेस असल्याने विद्यार्थ्यांना व प्रवाशांना सायकल, दुचाकीने कोंढा, नवेगाव येथे यावे लागते.एस. टी. महामंडळाने विद्यार्थी, प्रवाशी व पर्यटकांचे गैरसोय बघता अड्याळ गोसे पवनीसाठी दुपारी २ वाजता, सायंकाळी ४ वाजता तर, पवनी गोसे अड्याळसाठी दुपारी १ वाजता, ३ वाजतादरम्यान बसेस सुरु करण्याची मागणी गोसीखुर्द प्रकल्प मार्गावरील विद्यार्थी, पर्यटक व जनतेनी केली आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. (वार्ताहर)