शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात आणखी हुंडाबळी, गरोदर पूजाने उचलले टोकाचे पाऊल; महाळुंगे येथील घटना
2
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
3
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
4
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना
5
एक-एक करत 3 गाड्या उडवल्या; पाकिस्तानी सैन्यावर दहशतवादी हल्ला, 32 जवानांचा मृत्यू
6
Narendra Modi : "ऑपरेशन सिंदूर हे फक्त मिशन नाही, बदलत्या भारताचं चित्र"; पंतप्रधान मोदींनी केलं सैन्याचं कौतुक
7
शनि जयंती: तुमची रास कोणती? राशीनुसार ‘हे’ उपाय करा, शनिच्या अशुभ प्रभावातून मुक्तता मिळवा!
8
Vaishnavi Hagawane Death Case : फरार निलेश चव्हाणसाठी पिंपरी चिंचवड पोलिसांची लुक आऊट नोटीस जारी
9
अरे व्वा! “निकाल पाहताच मी आणि माझे वडील खूप रडलो”; पिकअप ड्रायव्हरची लेक झाली SDM
10
महाराष्ट्राचे नवे EV धोरण लागू! २०३० पर्यंत या महामार्गांवर टोल फ्री; इमारतींमध्ये चार्जिंग पॉईंट बंधनकारक...
11
जगातल्या 'या' ७ देशांमध्ये राहत नाही एकही भारतीय; तिसऱ्या देशाचं नाव ऐकून व्हाल हैराण
12
ऑपरेशन सिंदूरमधून भारतालाही मिळाला धडा, या बाबींमध्ये कराव्या लागणार सुधारणा, संरक्षण तज्ज्ञांनी केली सूचना
13
वैष्णवी मृत्यू प्रकरण : फरार असताना राजेंद्र अन् सुशील हगवणेंनी वापरलेली गाडी जप्त
14
तुमच्या घरातील सोनं झालं अजून महाग! एकाच दिवसात मोठी वाढ, आजचे दर ऐकून बसेल धक्का!
15
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राचे दहशतवाद्यांशी थेट संबंध होते का? पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री होणार आई, सोशल मीडियावर फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
17
"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!
18
'ऑपरेशन सिंदूर' करून घरी परतलेल्या जवानाचा दुर्दैवी मृत्यू; काकाचं श्राद्ध करतानाच आला हृदयविकाराचा झटका  
19
गुंतवणुकीची सुवर्णसंधी! 'या' आठवड्यात ९ कंपन्यांचे IPO बाजारात, तुमच्यासाठी 'कोणता' ठरणार फायदेशीर?
20
"वाचल्यावर सर्व कळेल..!"; परेश रावल यांनी 'हेरा फेरी ३'च्या मेकर्सला दिलं कायदेशीर उत्तर, काय म्हणाले?

बाजारात आंब्याचे दर घटले, तरीही ग्राहक खरेदीसाठी फिरकेनात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:36 IST

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस, कर्नाटकी हापूस हे आंबे खरेदी केले जात नसले तरीही जिल्ह्यात लोकलचे केशर, पायरी, गावरान, ...

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रत्नागिरी हापूस, कर्नाटकी हापूस हे आंबे खरेदी केले जात नसले तरीही जिल्ह्यात लोकलचे केशर, पायरी, गावरान, दशरी, लंगडा यासारख्या आंब्यांना दरवर्षीच प्रचंड मागणी असते, मात्र यावर्षी ग्राहकांनी कोरोनामुळे सावध पवित्रा घेतला असल्याने आंब्याचे दरही गडगडले आहेत, तर दुसरीकडे ग्राहक बाजारात फिरकत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे विक्रेत्यांसह आंबा उत्पादकांना कोरोना व अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. राज्यात मे महिन्यात संचारबंदीचे चित्र दिसून येत असतानाच मध्यंतरी एप्रिल महिन्यात सर्वच फळांची मागणी प्रचंड वाढली होती. त्यामुळे दरही गगनाला भिडले होते, मात्र काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत असल्याने आंब्यासोबत इतर फळांच्या दरात किंचित घट झाली आहे. बाजारात असलेला आंबा हा खराब होण्याच्या मार्गावर आहे. आंबा जास्त दिवस टिकत नसल्याने खरेदी केलेला आंबा आहे त्या किमतीत तरी विकला पाहिजे ही चिंता आंबा विक्रेत्यांना सतावत आहे. सध्या रत्नागिरी हापूस आंब्याचे बाजारातील दर ९०० ते १००० रुपये प्रतिडझन आहेत, तर केशर १२० ते दीडशे रुपये किलो, दशरी साठ रुपये, लंगडा आंबा साठ रुपये तसेच इतर जातीचे गावराण आंबे ६० ते ८० रुपयांच्या दरम्यान आहेत. कडक निर्बंध लागू केल्याने फळ विक्रेते दररोज लागणारा मोजकाच आंबा बोलावत आहेत. दररोज ११ वाजेनंतर दुकाने बंद करावी लागत असल्याने म्हणावा तसा व्यवसाय होत नसल्याचे फळ विक्रेते रोशन दिवटे, खुशाल हटवार यांनी सांगितले. प्रशासनाने १५ मेनंतर निर्बंध हटविल्यास त्यापुढे आंबा विक्री व्यवसायाला गती मिळेल, अशी अपेक्षाही यावेळी अनेकांनी व्यक्त केली.

बॉक्स

अवकाळी पावसाने लोकल आंब्यांचे नुकसान

जिल्ह्यात गत चार दिवसांपासून सातत्याने अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळे वादळ वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंबा उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. आजही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत. त्यातच आंब्याचे उत्पन्नही अनेकजण घेतात. मात्र आठवडाभरापासून अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्याने आंबा उत्पादकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने मदत देण्याची गरज आहे.

बॉक्स

घरपोहोच डिलिव्हरीची सोय

जिल्ह्यात काही मोजकेच ग्राहक हापूस आंब्याची मागणी करतात. विक्रेत्यांनी घरपोहोच डिलिव्हरीची सोयही उपलब्ध केली आहे. मात्र विशेषकरून रत्नागिरीच्या हापूस आंब्याचे दर अद्यापही नऊशे ते हजार रुपये डझनच्या आसपास आहेत. त्या तुलनेत लोकल आंब्याला अनेकांची मागणी आहे.

कोट

जिल्ह्यात फळबागलागवडीसाठी पोषक वातावरण आहे. भंडारा तालुक्यातही फळबागलागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबागलागवड तसेच एमआरजीएस अंतर्गतही शेतकऱ्यांना फळबागलागवडीची कृषी विभागाची योजना आहे. याचा अनेक शेतकरी लाभ घेत आहेत.

विजय हुमणे, भंडारा मंडळ कृषी अधिकारी, भंडारा

कोट

अनेक ग्राहकांकडून केशर, दशेरी, लंगड्या व लोकल आंब्याला मागणी आहे. मात्र संचारबंदीमुळे व कोरोनामुळे ग्राहकांची संख्या कमी आहे. नगर परिषदेने आम्हाला थोडी शिथिलता द्यायला हवी.

रोशन दिवटे, फळ विक्रेता, भंडारा

कोट

आंबा उत्पादक शेतकरी संकटात

दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी आंब्याची झाडे फळांनी लदबदली होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच झालेल्या वादळी वाऱ्याने अडीच एकरातील आंबे जमीनदोस्त होत मोठे नुकसान झाले. शासनाने मदत करण्याची गरज आहे.

कवळू शांतलवार, आंबा उत्पादक शेतकरी, माडगी

कोट

मी दरवर्षी जिल्ह्यात तसेच नागपूरला आंबा विक्री करतो. मात्र यावर्षी आंब्याला विशेष अशी मागणी नाही. त्यातच कोरोनाचे संकट असल्यानेही अनेक व्यापारी खरेदीसाठी आलेच नाही.

बाबूराव गिऱ्हेपुंजे, आंबा उत्पादक शेतकरी, खरबी